शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

Ulhasnagar: खिडकीचे गज वाकवून ठोकली धूम; शासकीय निरीक्षण गृहातून ८ मुली पळाल्या

By सदानंद नाईक | Updated: January 9, 2025 20:51 IST

उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात शांतीभवन येथे शासकीय मुलीचे निरीक्षणगृह आहे. याठिकाणी घरातून पळून आलेल्या मुली, रेल्वे, बस स्थानक आदी ठिकाणी सापडलेल्या अल्पवयीन मुली ठेवण्यात येतात. 

उल्हासनगर : शहरातील शासकीय मुलीच्या निरीक्षणगृहातून मंगळवारी पहाटे ३ वाजता ८ मुली पळून गेल्याची घटना घडली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पथकाने कल्याण व विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान पळून गेलेल्या ८ पैकी ७ मुलीचा शोध घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात शांतीभवन येथे शासकीय मुलीचे निरीक्षणगृह आहे. याठिकाणी घरातून पळून आलेल्या मुली, रेल्वे, बस स्थानक आदी ठिकाणी सापडलेल्या अल्पवयीन मुली ठेवण्यात येतात. 

चौघींनी खिडकीचे गज वाकवले अन्...

मंगळवारी पहाटे ३ वाजता एकूण ८ मुलींनी संगणमत करून खिडकीचे लोखंडी गज वाकून निरीक्षणगृहातून पळ काढला. मुली पळून गेल्याची माहिती रात्री निरीक्षणगृहाच्या सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्यावर, त्यांनी हिललाईन पोलीस ठाण्याला माहिती दिली. 

घटनेचे गांभीर्य बघून पोलिसांनी गुन्हा दाखल करून, पोलीस पथके मुलीच्या शोधार्थ पाठविले होते. पोलीस पथकाने कल्याण व विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान ८ पैकी ७ मुलीला शोधण्यात यश आले. मात्र ऐक मुलगी पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली. 

निरीक्षण गृहातून मुली पळून का गेल्या?

फरार मुलीचा शोध पोलीस पथक घेत असून सापडलेल्या ७ मुली पुन्हा मुलीच्या निरीक्षणगृहात पोलीस बंदोबस्तात ठेवल्या आहेत.

शासकीय मुलीचे निरीक्षणगृहाच्या अधिक्षिका व्हीव्हीएन सिल्व्हर यांनी निरीक्षणगृहातून पळून गेलेल्या मुली सापडल्याची माहिती दिली. सर्व मुली उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आदी ठिकाणच्या रहिवासी असून त्यांच्या घराचा पत्ता शोधण्याचे काम पोलीस करीत आहेत. 

पळून गेलेल्या मुलींना घरी जायचे होते. म्हणून त्या पळून गेल्याची माहिती सिल्व्हर यांनी दिली. तर हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या चौकशीत मुलीना सुखसुविधा व जेवण नियमित तसेच चांगले दिले जात नाही म्हणून पळून गेल्याचे म्हटले. 

महिला केअरटेकर, महिला पोलीस बंदोबस्त निरीक्षणगृहाला २४ तास असताना मुली पळून गेल्याची घटना घडल्याने, मुलीच्या निरीक्षणगृहाच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला