शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

आताची शिक्षणपद्धती चरितार्थ चालवू शकत नाही; उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 05:41 IST

‘आंतर भारती’ आणि ‘ग्राममंगल’ची शिक्षण परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : विद्यार्थ्यांना सध्या दिल्या जाणाऱ्या शिक्षणामुळे ते स्वत:चा चरितार्थ चालवू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपली शिक्षणपद्धती ही अधिक प्रगल्भ कशी होईल, याचा विचार आम्ही करण्याची गरज आहे, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. 

‘आंतर भारती’ आणि ‘ग्राममंगल’च्या वतीने रविवारी गडकरी रंगायतनमध्ये ‘ग्राममंगल’ या संस्थेच्या कार्याची ४० वर्षे व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांची वयाची ८० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व शिक्षण परिषद पार पडली. सामंत म्हणाले की, शिक्षण परिषद हा कार्यक्रम शासनाने घेतला पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण, त्यांची अंमलबजावणी यातून भावी पिढीला काय द्यायचे, याचा विचार शासनाने करावा. ऑनलाइन परीक्षा घेण्याचे ठरविले तेव्हा मी सर्व विद्यार्थ्यांसाठी देवमाणूस ठरलाे, पण ऑफलाइन परीक्षा जाहीर करताच राक्षस झालो. शिक्षण ऑफलाइन चालेल, पण परीक्षा ऑनलाइन घ्या, असे विद्यार्थी सांगतात तेव्हा चिंता वाटते.  

समुद्र आणि त्यातील जीवसृष्टीचा अभ्यास करणारे विद्यापीठ तयार करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातील आपली शिक्षण पद्धत वेगळी आणि सुदृढ ठरावी की, परदेशातून शैक्षणिक संस्थांनी आपल्याकडे येउन तिचा अभ्यास करावा. त्यानुसार देशासाठी आदर्श पॅटर्न ठरेल असे काम शालेय व उच्च शिक्षणात राज्य शासन करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. डाॅ. अनिल काकोडकर आणि इतर ज्येष्ठ शिक्षण मंडळी नवीन शिक्षण धोरणाचा अहवाल मांडत असतील तर तो स्वीकारलाच पाहिजे. यापुढे होणाऱ्या शिक्षण परिषदेला मी श्रोता म्हणून बसेन. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा कोकणपट्ट्यात बालशिक्षणाची गरज आहे. याची सुरुवात माझ्या क्षेत्रात, विभागात करता येते का, याचा प्रथम विचार करेन, असेही ते म्हणाले.

पानसे यांच्यासोबतच्या भेटीची चर्चा

- मनसेचे नेते अभिजित पानसे हे सामंतांना नुकतेच भेटले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. - त्यावर सामंत म्हणाले, पानसे सामंत यांच्याकडे आले काय आणि सामंत पानसे यांच्याकडे आले काय, याने काय फरक पडताे. दाेघे भेटले तर चांगलेच आहे ना, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी दिली.

आपले मत काय आहे? 

शिक्षणमंत्र्यांच्या या विधानाविषयी आपल्याला काय वाटते? आपण आपले मत आम्हाला ९५९४०५७४५५ या क्रमांकावर कळवावे. यानिमित्ताने या विषयावर समूळ चर्चा व्हावी अशी ‘लाेकमत’ची भूमिका आहे. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंत