शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

अंधारात अडकलेल्या २ तरुणांची सातपाटी-शिरगावमधील दोन जिगरबाज तरुणांनी केली सुखरूप सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2022 14:47 IST

पालघर पूर्वेकडील नवली भागातील 6 मुले शुक्रवारी संध्याकाळी शिरगाव बीचवर खूबऱ्या(शंख)वेचायला गेले होते.

- हितेंन नाईक

पालघर- शिरगाव(उसबाव)च्या समुद्र किनारी शंख शिंपल्याच्या शोधार्थ फिरत असताना उधाणाच्या पाण्याच्या चक्रव्यूहात अडकुन नाका-तोंडा पर्यंत पाणी जाऊन बुडण्याच्या अवस्थेत एका खडकावर जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या नवली(पालघर)मधील दोन 18-20 वर्षीय तरुणांचे जीव वाचविण्यात सातपाटी-शिरगाव मधील मच्छिमार प्रितम मेहेर आणि संदीप पाडेकर याना यश आले.जीव वाचलेली दोन्ही मुले आपल्या कुटुंबातील एकुलती एक अपत्ये आहेत.

पालघर पूर्वेकडील नवली भागातील 6 मुले शुक्रवारी संध्याकाळी शिरगाव बीचवर खूबऱ्या(शंख)वेचायला गेले होते. दोन गटात विभागलेल्या ह्या तरुणांना खडकात सापडत असलेले नानाविध खेकडे,मासे,शिंपले त्यांना आकर्षित करीत होते.त्यांच्या शोधार्थ ओमकार घरत आणि रोहन भैसकर ही 20 वर्षीय तरुण खूबऱ्याच्या शोधार्थ दूरवर निघून गेले. ह्यावेळी अंधार दाटून आल्याने त्यांनी घरी जाण्यासाठी निघण्याची तयारी केली असता आपल्याला चोहोबाजूंनी उधानाच्या पाण्याने घेरल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यांनी अनेक भागातून किनाऱ्यावर पोहचण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने त्यांनी आपल्या जवळील मोबाईल वरून आपल्या सहकाऱ्यांना संपर्क साधला. मात्र नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही. 

दोन्ही तरुणांनी पोहता येत नसल्याने आपला जीव वाचविण्यासाठी एका उंच दगडावर उभे राहत मोबाईल मधील बॅटरीच्या सहाय्याने मदतीसाठी प्रयत्न सुरू केले.परंतु रात्र झाल्याने निर्मनुष्य असलेल्या ह्या भागातून मदत मिळण्याचे त्याचे प्रयत्न फोल ठरले. ह्याच वेळी त्याचे चार मित्र आपल्या घरी गेल्यावर आपल्या सोबत गेलेले दोन मित्र अजून घरी पोहचले नसल्याचे त्यांना कळले.तात्काळ त्यांनी आपल्या अन्य मित्र आणि नातेवाईकासोबत पुन्हा शिरगाव चा किनारा गाठल्यावर मोबाईल च्या बॅटरीच्या सहाय्याने समुद्रात दूरवर आपले मित्र मदत मागत असल्याचे त्यांना दिसले परंतु सर्वत्र पसरलेला अंधार आणि समुद्राच्या उसळणाऱ्या मोठ्या लाटांमुळे ते त्याच्या पर्यंत मदत पोचविण्यात अपयशी ठरले.

सातपाटी मधील प्रीतम मेहेर व त्याचे भावोजी संदीप पाडेकर हे दोघे आपल्या होडीतून मासेमारी साठी उसबाव च्या समुद्रात उभे होते.आपले वावरी नावाचे जाळे त्यांनी समुद्रात टाकून ते त्या जाळ्याला लागलेले मासे काढीत असताना त्याचे लक्ष दूरवरून मदती साठी कोणीतरी इशारे करीत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ आपले जाळे तसेच समुद्रात सोडून आपली होडी त्या दिशेने वळविली.त्यावेळी दोन तरुण खडकावर आपटल्याने जायबंदी अवस्थेत एका खडकावर उभे असून त्याच्या नाका-तोंडात पाणी जाऊन अर्धमेल्या अवस्थेत मदतीच्या प्रतीक्षेत उभे असल्याचे दिसले.

दोन्ही मच्छिमार तरुणांनी तात्काळ पाण्यात झेप घेत एकेक करीत त्यांना आपल्या छोट्याश्या होडीत घेतले.आपल्या छोट्याश्या होडीत चार लोक बसू शकणार नाहीत हे त्याच्या लक्षात आल्यावर वादळी हवामान आणि बोचरी थंडी ह्या अवस्थेत त्या दोन्ही जिगरबाज मच्छिमार तरुणांनी स्वतः पोहत आपल्या होडीतून त्यां दोघांना सुखरूप किनाऱ्यावर आणले.आपले मित्र सुखरूप असल्याचे पाहिल्यावर सर्वांनी देवदूत बनून आलेल्या दोन्ही जिगरबाज मच्छिमार तरुणांचे मनःपूर्वक आभार मानीत त्यांना कडकडून मिठी मारली.

टॅग्स :palgharपालघरSea Routeसागरी महामार्ग