शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

दोन महिला आरोपींची अटक ठरविली अवैध, ठाणे पोलिसांना दुसरा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 05:37 IST

पोलीस ठाण्यात येऊन पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणाºया दोन महिलांना मुंब्रा पोलिसांनी केलेली अटक न्यायालयाने शनिवारी अवैध ठरवली. या दोन्ही महिलांची तातडीने सुटका करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. नजिकच्या काळात सलग दोनवेळा पोलिसांना अशी नामुष्की सहन करावी लागली.

ठाणे - पोलीस ठाण्यात येऊन पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणाºया दोन महिलांना मुंब्रा पोलिसांनी केलेली अटक न्यायालयाने शनिवारी अवैध ठरवली. या दोन्ही महिलांची तातडीने सुटका करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. नजिकच्या काळात सलग दोनवेळा पोलिसांना अशी नामुष्की सहन करावी लागली.मुंब्रा येथील मुस्तफा चाळीमध्ये ३१ मार्च रोजी दोन शेजाºयांमध्ये वाद झाला. दिलनशीन फातिमा सैय्यद ह्या या प्रकरणाची तक्रार घेऊन मुंब्रा पोलीस ठाण्यात गेल्या. त्यांच्यासोबत दुसरी शेजारी महिला दिलशाद खान आणि फातिमा शेख यादेखील पोलीस ठाण्यात गेल्या. पोलिसांना त्यांना बाहेर थांबण्यास सांगितले. त्यावरून पोलीस ठाण्यात वाद झाला. दिलशाद खान आणि फातिमा शेख यांनी ठाणे अंमलदाराशी हुज्जत घालून, एका महिला शिपायास शिविगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या आरोपाखाली पोलिसांनी दोन्ही महिलांविरूद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल भादंविचे कलम ३५३ आणि ५0४ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक करून प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी पी.एल. गुप्ता यांच्या न्यायालयासमोर हजर केले. यावेळी आरोपींच्या अटकेस त्यांच्या वकिलांनी विरोध दर्शविला. आरोपींच्या अटकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन पोलिसांनी केले नाही. आरोपींना अटक करण्यापूर्वी भादंविच्या कलम ‘४१अ आणि ४१ड’ची पूर्तता पोलिसांनी केली नाही. आरोपींच्या वकिलांचे युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून दोन्ही आरोपींची तातडीने सुटका करण्याचे आदेश पोलिसांना दिले. आरोपींच्या अटकेसंदर्भात सर्व नियमांचे पालन केल्याचा दावा तपास अधिकाºयाने न्यायालयासमोर केला. परंतु, तसा पुरावा सादर करण्यास तपास अधिकारी अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने आरोपींची अटक अवैध ठरवली. आरोपींची अटक अवैध असली तरी त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गुंडाळण्याचे किंवा तपास थांबवणे आवश्यक नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.गेल्या महिन्यात सीडीआर प्रकरणात वकील रिझवान सिद्दीकी यांना पोलिसांनी १६ मार्च रोजी अटक केली होती. त्यांच्या अटकेबाबतही भादंविच्या कलम ‘४१अ’मध्ये नमुद केलेल्या तरतुदींचे पालन पोलिसांनी केले नसल्याचा ठपका मुंबई उच्च न्यायालयाने ठेवला होता.न्यायालयाच्या आदेशानुसार शासकीय कामात अडथळा आणणाºया दोन्ही महिला आरोपींची सुटका करण्यात आली. मात्र, या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. आवश्यकेनुसार आरोपींविरुद्ध कारवाई नक्की केली जाईल.- किशोर पासाळकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,मुंब्रा पोलीस स्टेशन

टॅग्स :Policeपोलिसthaneठाणे