शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

मध्यप्रदेशातील दोन वॉन्टेड खून्यांना ठाण्यातून अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: May 15, 2019 23:40 IST

एका खून प्रकरणात गेल्या नऊ महिन्यांपासून पसार असलेल्या दोन खून्यांना ठाणे आणि मध्यप्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाईमध्ये नुकतीच अटक केली आहे. १५ लाखांच्या खंडणीसाठी एका मुलाचे त्यांनी अपहरण केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. याच प्रकरणाच्या तपासातून त्यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देमध्यप्रदेश आणि ठाणे गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई प्रत्येकी दहा हजारांचे दोघांवर होते इनाम मुलाचे अपहरण करुन केली १५ लाखांची मागणी

ठाणे: मध्यप्रदेशात खून करुन पसार झाल्याने दहा हजारांचे बक्षिस जाहिर झालेल्या पुष्पेद्रसिंह परमार (३१, रा. दिवा, ठाणे) आणि शिवम सिंग (२२, रा. दिवा, मुळ रा. दोघेही मंध्यप्रदेश) यांना मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने नुकतीच अटक केली. या दोघांनाही आता मध्यप्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.मध्यप्रदेश राज्यातील दतिया पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका अपहरण झालेल्या मुलाचा आणि संशयित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मध्यप्रदेशचे पोलीस उपनिरीक्षक वैभव गुप्ता यांचे पथक ठाण्यात आले होते. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या पथकाला मदतीसाठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांचे पथक नेमले. या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दिवा रेल्वे स्थानक परिसरात वास्तव्यास असलेल्या पुष्पेद्रसिंह परमार (रा. ओमसाई चाळ, रुम क्र. १६, दिवा रेल्वे स्थानक) आणि शिवम सिंग (रा. सुरेश अपार्टमेंट, रुम क्र. ३०४, दिवा रेल्वे स्टेशन जवळ) यांची शोध मोहीम घेऊन या दोघांना ११ मे रोजी दिवा रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. दवोह पोलीस ठाणे (मध्यप्रदेश) याठिकाणी दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल असून दोघेही गेल्या वर्षभरापासून वॉन्टेड आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्रत्येकी दहा हजारांचे बक्षिस मध्यप्रदेश सरकारने जाहिर केले होते. या दोघांनाही आता मध्यप्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्यांना ठाणे न्यायायालयातून ट्रान्सिस्ट कस्टडी घेण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, उपनिरीक्षक कैलास सोनावणे आणि हवालदार प्रकाश कदम आदींच्या पथकाने ही कारवाई केली...........................१५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण!मध्यप्रदेशातील दतिया पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील राजप्रताप चौव्हाण (१६) या मुलाचे अलिकडेच अपहरण झाले आहे. त्याच्या अपहरणानंतर राजप्रतापचा मामा असलेल्या पुष्पेंद्रसिंह याने आपल्याच मेव्हण्याकडे (राजप्रतापच्या वडीलांकडे) १५ लाखांच्या खंडणीची मागणी केली. याची तक्रार दतिया पोलीस ठाण्यात दाखल झालेली आहे. ज्या मोबाईलद्वारे ही खंडणीची रक्कम मागण्यात आली, त्या क्रमांकाच्या आधारे उपनिरीक्षक वैभव गुप्ता यांनी ठाण्यापर्यंतचा माग काढला. त्यानंतर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाच्या मदतीने या दोघांनाही उचलण्यात आले. आता त्यांनी ज्याचे अपहरण केले त्या राजप्रताप याचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्यांनी हे अपहरण केले की नाही, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.चौकटयाच अपहरणाच्या आधी म्हणजे सप्टेंबर २०१८ मध्ये नरेंद्र परमार, पुष्पेंद्रसिंह परमार आणि शिवम या तिघांनी मिळून भेंड जिल्हयातील देवरी गावात एका वादातून अजय दुबे (२७) याच्यावर गोळीबार करुन खून केला होता. या खूनानंतर गोळीबार करणारा नरेंद्र याला पोलिसांनी अटक केली होती. तो अद्यापही कारागृहात आहे. तर पुष्पेंद्रसिंह आणि शिवम हे दोघे मात्र तेंव्हापासून फरार झाले होते. आता खंडणी आणि अपहरण प्रकरणामुळे ते ठाणे पोलिसांच्या मदतीने पुन्हा हाती लागल्याचे दवोह पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नविन यादव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक