शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

मध्यप्रदेशातील दोन वॉन्टेड खून्यांना ठाण्यातून अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: May 15, 2019 23:40 IST

एका खून प्रकरणात गेल्या नऊ महिन्यांपासून पसार असलेल्या दोन खून्यांना ठाणे आणि मध्यप्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाईमध्ये नुकतीच अटक केली आहे. १५ लाखांच्या खंडणीसाठी एका मुलाचे त्यांनी अपहरण केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. याच प्रकरणाच्या तपासातून त्यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देमध्यप्रदेश आणि ठाणे गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई प्रत्येकी दहा हजारांचे दोघांवर होते इनाम मुलाचे अपहरण करुन केली १५ लाखांची मागणी

ठाणे: मध्यप्रदेशात खून करुन पसार झाल्याने दहा हजारांचे बक्षिस जाहिर झालेल्या पुष्पेद्रसिंह परमार (३१, रा. दिवा, ठाणे) आणि शिवम सिंग (२२, रा. दिवा, मुळ रा. दोघेही मंध्यप्रदेश) यांना मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने नुकतीच अटक केली. या दोघांनाही आता मध्यप्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.मध्यप्रदेश राज्यातील दतिया पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका अपहरण झालेल्या मुलाचा आणि संशयित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मध्यप्रदेशचे पोलीस उपनिरीक्षक वैभव गुप्ता यांचे पथक ठाण्यात आले होते. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या पथकाला मदतीसाठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांचे पथक नेमले. या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दिवा रेल्वे स्थानक परिसरात वास्तव्यास असलेल्या पुष्पेद्रसिंह परमार (रा. ओमसाई चाळ, रुम क्र. १६, दिवा रेल्वे स्थानक) आणि शिवम सिंग (रा. सुरेश अपार्टमेंट, रुम क्र. ३०४, दिवा रेल्वे स्टेशन जवळ) यांची शोध मोहीम घेऊन या दोघांना ११ मे रोजी दिवा रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. दवोह पोलीस ठाणे (मध्यप्रदेश) याठिकाणी दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल असून दोघेही गेल्या वर्षभरापासून वॉन्टेड आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्रत्येकी दहा हजारांचे बक्षिस मध्यप्रदेश सरकारने जाहिर केले होते. या दोघांनाही आता मध्यप्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्यांना ठाणे न्यायायालयातून ट्रान्सिस्ट कस्टडी घेण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, उपनिरीक्षक कैलास सोनावणे आणि हवालदार प्रकाश कदम आदींच्या पथकाने ही कारवाई केली...........................१५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण!मध्यप्रदेशातील दतिया पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील राजप्रताप चौव्हाण (१६) या मुलाचे अलिकडेच अपहरण झाले आहे. त्याच्या अपहरणानंतर राजप्रतापचा मामा असलेल्या पुष्पेंद्रसिंह याने आपल्याच मेव्हण्याकडे (राजप्रतापच्या वडीलांकडे) १५ लाखांच्या खंडणीची मागणी केली. याची तक्रार दतिया पोलीस ठाण्यात दाखल झालेली आहे. ज्या मोबाईलद्वारे ही खंडणीची रक्कम मागण्यात आली, त्या क्रमांकाच्या आधारे उपनिरीक्षक वैभव गुप्ता यांनी ठाण्यापर्यंतचा माग काढला. त्यानंतर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाच्या मदतीने या दोघांनाही उचलण्यात आले. आता त्यांनी ज्याचे अपहरण केले त्या राजप्रताप याचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्यांनी हे अपहरण केले की नाही, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.चौकटयाच अपहरणाच्या आधी म्हणजे सप्टेंबर २०१८ मध्ये नरेंद्र परमार, पुष्पेंद्रसिंह परमार आणि शिवम या तिघांनी मिळून भेंड जिल्हयातील देवरी गावात एका वादातून अजय दुबे (२७) याच्यावर गोळीबार करुन खून केला होता. या खूनानंतर गोळीबार करणारा नरेंद्र याला पोलिसांनी अटक केली होती. तो अद्यापही कारागृहात आहे. तर पुष्पेंद्रसिंह आणि शिवम हे दोघे मात्र तेंव्हापासून फरार झाले होते. आता खंडणी आणि अपहरण प्रकरणामुळे ते ठाणे पोलिसांच्या मदतीने पुन्हा हाती लागल्याचे दवोह पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नविन यादव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक