शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मुंबईतील १३ कामगारांना घेऊन जाणारे दोन ट्रक ठाण्याच्या वाहतूक शाखेने पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 21:17 IST

एकीकडे परराज्यातील मजूरांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आहे तिथेच रहावे. त्यांची सर्व जबाबदारी राज्य सरकारकडून घेतली जाईल, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तर दुसरीकडे मुंबईतून मालवाहू वाहनांमधून आपआपल्या राज्यांमध्ये परतण्यासाठी मजूरांकडून प्रयत्न केले जात आहेत. अशाच १३ मजूरांना दोन वाहनांमधून पळ काढतांना ठाण्याच्या वाहतूक शाखेने मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांची आता निवारा केंद्रात रवानगी झाली आहे.

ठळक मुद्देदोन चालकांना अटक१३ कामगारांची निवारा केंद्रात रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंबईतून कल्याणकडे जाणाऱ्या कंटेनरसह दोन वेगवेगळया वाहनांना ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री पकडले. यातील आठ कामागारांची नौपाडा येथील निवारा केंद्रात रवानगी केली असून दोन्ही वाहनांच्या चालकांना अटक केली आहे.मुंबईतील गोरेगाव भागातून कल्याणकडे जाणा-या एका कंटेनरमधून आठ कामगारांना नेण्यात येत होते. तर गोवंडीतून कल्याणकडे जाणाºया लहान टेम्पोमधून पाच कामगारांना नेले जात होते. या दोन्ही वाहनांना ठाण्यातील नितीन कंपनीजवळ ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांच्या गस्तीवरील पथकाने २१ एप्रिल रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पकडले. पहिल्या कंटेनरमधून आठ कामगार हे मध्यप्रदेशात जाणार होते. ते या कंटेनरमधून कल्याणपर्यंत गेल्यानंतर तिथून अन्य वाहनाने ते जाणार होते. तर दुस-या फळे आणि भाजी घेऊन जाणाºया अत्यावश्यक सेवेतील टेम्पातून पाच कामगारही कल्याणला जाण्यासाठी टेम्पोमध्ये गोवंडीतून बसले होते. कोरोनामुळे केलेल्या संचारबंदीमध्ये रोजच्या जेवणाचे प्रचंड हाल होत असल्यामुळे आपण मुळगावी जात असल्याचे या कामगारांनी पोलिसांना सांगितले. दोन्ही वाहनांच्या चालकांविरुद्ध साथ प्रतिबंधक कायदा १८८ तसेच रोगराई पसरविण्यास मदत करण्याच्या कलम २६९ नुसार नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही दोन्ही वाहने जप्त करण्यात आली असून या सर्व कामगारांची नौपाडयातील निवारा केंद्रात तात्पूरती सोय केल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस