शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

दिवसातून दोन वेळाच जेवा... तीन महिन्यात वजन घटेल, डायबेटिस पळेल : डाॅ. जगन्नाथ दीक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 16:03 IST

वजन कमी करण्याचा सुप्रसिद्ध डायट सल्लागार डाॅ. जगन्नाथ दीक्षित यांनी कानमंत्र ठाणेकरांना दिला. 

ठळक मुद्देअवघ्या तीन महिन्यात वजन कमी होईलपोटाचा घेर कमी होईल, डायबेटिस दूर होईल डायट सल्लागार डाॅ. जगन्नाथ दीक्षित यांची जाहीर हमी

ठाणे : दिवसातून फक्त दोन वेळा जेवा अवघ्या तीन महिन्यात वजन कमी होईल, पोटाचा घेर कमी होईल, डायबेटिस दूर होईल, अशी जाहीर हमी सुप्रसिद्ध डायट सल्लागार डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिली आहे. आपल्या 'वेट लॉस प्लॅन'मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले आणि सध्या सोशल मिडियावर सर्वाधिक लाईक्स मिळविणाऱ्या डॉ. दीक्षित यांनी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफले. त्यावेळी "स्थूलत्व आणि मधुमेह मुक्ती" या विषयावर ते बोलत होते. 

कडक भूक लागेल तेव्हा खा, दिवसातून फक्त दोन वेळा जेवणाचा आनंद घ्या, अगदी पिझ्झासकट काहीही, कितीही खा, एक पदार्थ खा किंवा दहा पदार्थ खा काहीही फरक पडत नाही, मन मारू नका - हवे ते खा, दोन वेळच्या जेवणाचे स्वतःचे पॅटर्न ठरवा, फक्त 55 मिनिटांच्या आत मात्र जेवण संपवा, जेवणात गोड कमी खा, साखर-गूळ-मध याचे व्यसन लावू नका, नारळ पाणी प्या पण नारळातली तसेच दुधावरची मलई खाऊ नका, भरपूर पाणी प्या, दुधाचा चहा प्यायचा असेल तर 25 टक्के दूध व 75 टक्के पाणी टाकून प्या पण शक्यतो बिनसाखरेचा चहा घ्या, ग्रीन टी- ब्लॅक टी प्या,  दोन वेळच्या जेवणाच्या मध्ये भूक लागली तर एखादा टोमॅटो खा, 45 मिनिटात 4.5 मिनिटे चाला, अशा अनेक मोलाच्या टिप्स डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिल्या. सवय नसल्याने सुरुवातीला याचा त्रास होईल पण आठवडाभर नियमितपणे दिवसभरात दोन वेळेच्या जेवणाचे पॅटर्न पाळले की याचीही सवय होईल आणि अवघ्या तीन महिन्यात वजन किमान 8 किलो कमी होईल, पोटाचा घेर किमान 2 इंचाने कमी होईल, टाईप टू चा डायबेटिस दूर होईल, असे त्यांनी अगदी खात्रीपूर्वक सांगितलं. 

जेवण वाया कसं काय घालवायचं?, अशा विचारामुळे आपल्या देशाच्या महिला लठ्ठ झाल्या आहेत. आपण घरातल्या डस्टबीनची काळजी करता पण शरीराचे डस्टबीन होत आहेत त्याची काळजी करत नाही. यामुळेच अनावश्यक वजन वाढते, पोटाचा घेर वाढतो, गुडघेदुखी, स्नायुदुखीचा त्रास उद्भवतो. या चुकीच्या आहारामुळे आता लहान मुलांना टाईप वन चा डायबेटिस होतो तर ज्येष्ठांना टाईप टू चा डायबेटिस होत आहे. भारतात  20 टक्के लोकांना डायबेटिस आहे. बिनकामाचे इन्शुलिन्स निर्माण झाल्यामुळे डायबेटिस होतो. इन्शुलिन्सची लेव्हल वाढली की शरीरातील पेशी विरोध करतात. यामुळे इन्शुलिन्सचे योग्य माप शरीरात निर्माण व्हायला हवे. माप रिकामे झाले की भरायला  55 मिनिटे जातात. रक्तातले ग्लुकोज पेशीत पोहोचते, पेशी ग्लुकोज साठवतात आणि अनावश्यक चरबीच्या स्‍वरूपात निर्माण झालेल्या फॅटी सीडला रोखण्याचे काम करतात. वारंवार खात राहिलात तर इन्शुलिन्स लेव्हल वाढेल. यामुळे दोन वेळा जेवा आणि खाणे-पिणे  55  मिनिटात आटोपा. 6 ते 8 तास झोप घेतल्यावर दिवसातून दोन वेळा जेवताना जेवणाआधी एक तास अगोदर पाणी प्या, जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्या, गरज वाटलीच तर जेवताना घोटघोट पाणी प्या, जेवल्यानंतर एक तास झोपू नये, दुपारी अर्ध्या तासापेक्षा जास्त झोपू नये, दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्या, दिवसातून सव्वा ते दीड लिटर लघवी होईल इतके पाणी प्या, असा सल्ला डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिला. 

आपल्याकडे दोनवेळच्या जेवणाची प्रथा होती. आपणाकडे कधीही नाश्ता करण्याची पद्धत नव्हती. राम-कृष्ण नाश्ता करत असल्याचा उल्लेख पुराणात नाही. आपले पूर्वज नाश्ता करत असल्याचा कोणताही उल्लेख वेदात नाही की ग्रंथात नाही. नाश्ता हा प्रकार ब्रिटिशांनी आणला त्यांनी चहा आणला आणि फुकट वाटला. तेव्हापासून चहा-नाश्ता हा प्रकार सुरु झाला. दिवसातून दोन वेळा जेवा असा उल्लेख आयुर्वेदत आहे. दोन वेळा जेवा पुण्य मिळेल असे आयुर्वेदात म्हटले आहे. जैन धर्मात बेसना ही पद्धत आहे. म्हणजे दोन वेळा बसून जेवा. गौतम बुद्धांनी तर एकदाच जेवा, रात्री जेवू नका असे म्हटले आहे. ग्रीक मधील नागरिक सर्वात तंदुरुस्त समजले जात. कारण ते दोनदाच जेवत. आपल्याकडे संतांनी सांगितले आहे की एक वेळा जेवणारा योगी, दोन वेळा जेवणाच भोगी, तीन वेळा जेवणारा रोगी व चार वेळा जेवणारा महारोगी. आता यातून योग्य तो बोध घ्या, असे सांगून डॉ. दीक्षित म्हणाले की, अधिकचे खाण्याने जास्त लोक मरतात पण उपाशी राहिल्याने कोणी मरत नाही. आपण  60 दिवस उपाशी राहू शकतो. आपले पूर्वज शिकार मिळायची तेव्हाच खायचे नाहीतर उपाशी रहायचे. 

शालेय विद्यार्थी जागृती अभियानाद्वारे आठवी, नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना, "चार वेळा खा, गोड कमी खा, कोल्ड्रींग पिऊ नका, मोबाईलवर फुटबॉल न खेळता मैदानावर खेळा, असे विद्यार्थ्यांना सांगत आहोत तर डायबेटिस रिव्हर्स सेंटर द्वारे ठाण्यात दर गुरुवारी सकाळी  8 ते 12 यावेळेत सहयोग हॉल, घंटाळी येथे मोफत सल्ला केंद्र सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.  डॉ. श्रीकांत जिचकार यांच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली आणि श्रीकांत जिचकार यांनी सुरू केलेला हा प्रयोग आपण पुढे नेत आहोत, अशी कृतज्ञता व्यक्त करुन, तुमचं आरोग्य तुमच्या हाती आहे. मानवतेच्या सेवेसाठी दिवसातून दोन वेळा जेवणाचा प्रयोग सुरु करा, असे आवाहन शेवटी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले. 

टॅग्स :diabetesमधुमेहHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स