शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

ठाणे शहरातून दहा दिवसांमध्ये दोघे बेपत्ता: गूढ वाढले

By जितेंद्र कालेकर | Updated: April 21, 2021 23:43 IST

ठाणे शहरातील वेगवेगळया भागातून प्रदिप पांडूरंग पालकर (५५) आणि रोशन बनारसी बेनबन्सी (२३) हे दोघे गेल्या दहा दिवसांमध्ये बेपत्ता झाले आहेत. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी त्यांच्या कुटूंबीयांनी तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्दे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा पोलिसांची विशेष पथके

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहरातील वेगवेगळया भागातून प्रदिप पांडूरंग पालकर (५५) आणि रोशन बनारसी बेनबन्सी (२३) हे दोघे गेल्या दहा दिवसांमध्ये बेपत्ता झाले आहेत. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी त्यांच्या कुटूंबीयांनी तक्रार दाखल केली असून या दोघांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.खोपट, सिंगनगर भागातील रहिवाशी प्रदिप हे ९ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास सिंगनगर चाळ क्रमांक पाच येथील आपल्या घरातून निघून गेले. घरातून बाहेर पडतांना त्यांनी कोणालाही काहीही माहिती दिली नाही. दोन दिवस उलटूनही ते घरी न परतल्यामुळे ते बेपत्ता झाल्याची तक्रार पालकर कुटूंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ११ एप्रिल रोजी केली. अर्थात २० एप्रिलपर्यंतही त्यांचा शोध लागू शकलेला नाही. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.दरम्यान, पालकर यांच्यापाठोपाठ नौपाडा भागातील अन्य एक रहिवाशी रोशन बनारसी बेनबन्सी (२३) हा तरुणही १२ एप्रिल २०२१ पासून दुपारी १२ वाजल्यापासून बेपत्ता झाला आहे. तो नौपाडयातील विवाह नोंदणी कार्यालय येथे त्याच्या पालकांना १२ एप्रिल रोजी दिसला होता. त्यावेळी ते त्याला भेटण्यासाठी गेले. मात्र, तेंव्हापासून तो बेपत्ता झाल्याचे रोशनचे वडिल बनारसी यांनी पोलिसांना सांगितले. रोशन याचाही शोेध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी सांगितले.*हिरेन प्रकरणामुळे बेपत्ता व्यक्तींबाबत अधिक सतर्कतामनसुख हिरेन बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत आढळला होता. त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचे आढळले. हिरेन प्रकरणामुळे आता कोणीही बेपत्ता झाले तरी पोलीस अधिक सतर्क होऊन बारकाव्याने तपास करीत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.* अशी आहेत कारणे-लॉकडाऊनमुळे घरात आर्थिक अडचण, कुटूंबात होणारे वाद, पती पत्नींमधील कलह, कामधंदा नसणे, कर्जबाजारीपणा किंवा प्रेमप्रकरण अशा अनेक कारणांमुळे घरातून कोणालाही काही न सांगता बेपत्ता होण्याचे प्रमाणही वाढले असल्याची माहिती एका पोलीस अधिकाºयाने दिली. अनेकदा घरगुती कारणातून किंवा तणावातूनही बेपत्ता झालेल्या व्यक्ती कालांतराने मिळतात. परंतू, त्या मिळेपर्यंत कुटूंबातील इतर व्यक्ती तणावाखाली असतात, असेही या अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी