शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

ठाणे शहरातून दहा दिवसांमध्ये दोघे बेपत्ता: गूढ वाढले

By जितेंद्र कालेकर | Updated: April 21, 2021 23:43 IST

ठाणे शहरातील वेगवेगळया भागातून प्रदिप पांडूरंग पालकर (५५) आणि रोशन बनारसी बेनबन्सी (२३) हे दोघे गेल्या दहा दिवसांमध्ये बेपत्ता झाले आहेत. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी त्यांच्या कुटूंबीयांनी तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्दे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा पोलिसांची विशेष पथके

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहरातील वेगवेगळया भागातून प्रदिप पांडूरंग पालकर (५५) आणि रोशन बनारसी बेनबन्सी (२३) हे दोघे गेल्या दहा दिवसांमध्ये बेपत्ता झाले आहेत. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी त्यांच्या कुटूंबीयांनी तक्रार दाखल केली असून या दोघांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.खोपट, सिंगनगर भागातील रहिवाशी प्रदिप हे ९ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास सिंगनगर चाळ क्रमांक पाच येथील आपल्या घरातून निघून गेले. घरातून बाहेर पडतांना त्यांनी कोणालाही काहीही माहिती दिली नाही. दोन दिवस उलटूनही ते घरी न परतल्यामुळे ते बेपत्ता झाल्याची तक्रार पालकर कुटूंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ११ एप्रिल रोजी केली. अर्थात २० एप्रिलपर्यंतही त्यांचा शोध लागू शकलेला नाही. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.दरम्यान, पालकर यांच्यापाठोपाठ नौपाडा भागातील अन्य एक रहिवाशी रोशन बनारसी बेनबन्सी (२३) हा तरुणही १२ एप्रिल २०२१ पासून दुपारी १२ वाजल्यापासून बेपत्ता झाला आहे. तो नौपाडयातील विवाह नोंदणी कार्यालय येथे त्याच्या पालकांना १२ एप्रिल रोजी दिसला होता. त्यावेळी ते त्याला भेटण्यासाठी गेले. मात्र, तेंव्हापासून तो बेपत्ता झाल्याचे रोशनचे वडिल बनारसी यांनी पोलिसांना सांगितले. रोशन याचाही शोेध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी सांगितले.*हिरेन प्रकरणामुळे बेपत्ता व्यक्तींबाबत अधिक सतर्कतामनसुख हिरेन बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत आढळला होता. त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचे आढळले. हिरेन प्रकरणामुळे आता कोणीही बेपत्ता झाले तरी पोलीस अधिक सतर्क होऊन बारकाव्याने तपास करीत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.* अशी आहेत कारणे-लॉकडाऊनमुळे घरात आर्थिक अडचण, कुटूंबात होणारे वाद, पती पत्नींमधील कलह, कामधंदा नसणे, कर्जबाजारीपणा किंवा प्रेमप्रकरण अशा अनेक कारणांमुळे घरातून कोणालाही काही न सांगता बेपत्ता होण्याचे प्रमाणही वाढले असल्याची माहिती एका पोलीस अधिकाºयाने दिली. अनेकदा घरगुती कारणातून किंवा तणावातूनही बेपत्ता झालेल्या व्यक्ती कालांतराने मिळतात. परंतू, त्या मिळेपर्यंत कुटूंबातील इतर व्यक्ती तणावाखाली असतात, असेही या अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी