शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

खासगी रुग्णालयांमध्ये उपचार न मिळाल्याने दोन बालकांचा मृत्यू; पालकांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 18:47 IST

मुलांच्या मृत्यूस उपचार न करणारे आठही खासगी रुग्णालये जबाबदार असून या रुग्णालयांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

भिवंडी : कोरोना संकटात खासगी रुग्णालयांमध्ये वेळीच उपचार न मिळाल्याने अनेक नागरिकांना आला जीव गमवावा लागला होता. यानंतर राज्य शासनाने खासगी रुग्णालयांना रुग्णांवर उपचार करण्याचे सक्त निर्देश दिले. मात्र राज्य शासनाच्या या निर्देशांकडे खासगी रुग्णालये आजही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र भिवंडीत समोर आले आहे. 

खासगी रुग्णालयांच्या या मनमानी कारभारामुळे भिवंडीतील दोन बालकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी (7 ऑगस्ट) रोजी शहरातील कल्याणरोड येथील अफसरा टॉकीज परिसरात असलेल्या फिजा बेकरी येथे राहणाऱ्या जमशेद अंसारी यांचा 14 महिन्यांचा मुलगा हाशिर हा पाण्याच्या टबमध्ये पडल्याने त्याला दुखापत झाली होती. तर याच दिवशी याच परिसरात राहणारे गौस शेख यांचा 3 महिन्यांचा मुलगा सैफ याची मालिश करताना त्याने दुधाची उल्टी केली. त्यामुळे 14 महिन्यांच्या हाशिर व अवघ्या 3 महिन्यांचा सैफ या दोघांनाही त्यांच्या पालकांनी शहरातील विविध आठ खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी फिरवले. मात्र, एकाही खासगी रुग्णालयाने या मुलांना उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. 

यादरम्यान काही खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन नसल्याचे कारण दिले तर काहींनी रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा नसल्याचे कारण दिले . शेवटी खासगी रुग्णालयांचे उंबरठे झिजविण्यात या दोन्ही परिवारांचा वेळ गेला . त्यानंतर रात्री 12 वाजे दरम्यान या दोन्ही बालकांना त्यांच्या नातेवाईकांनी धामणकर नाका येथे महापालिकेने ताब्यात घेतलेल्या ऑरेंज या खासगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी या दोन्ही बालकांना मृत घोषित केले. 

खासगी रूग्णालयांचे उंबरठे झिजविल्याने आपल्या मुलांचा जीव गेल्याची भावना या दोन्ही मुलांच्या नातेवाईकांना झाल्याने मुलांच्या मृत्यूस उपचार न करणारे आठही खासगी रुग्णालये जबाबदार असून या रुग्णालयांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत बालकांच्या नातेवाईकांनी केली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान महामारीच्या संकटात रुग्णांवर उपचार करण्याचे निर्देश असूनही खासगी रुग्णालयांना या बालकांवर उपचार केले नाही ही गंभीर बाब असून महापालिकेने या आठही रुग्णालयांवर त्वरित कारवाई करून पीडित कुटुंबीयांना न्याय द्यावा अन्यथा महापालिकेविरीधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या भिवंडी शहर अध्यक्षा स्वाती कांबळे यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.  

टॅग्स :bhiwandiभिवंडीhospitalहॉस्पिटल