शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील आगीच्या दोन घटना, डार्इंग व दुचाकी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 18:18 IST

भिवंडी : भिवंडीत आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गोदाम पट्ट्यातील आगीच्या घटना ताज्या असतानाच भिवंडी-कल्याण मार्गावरील सरवली एमआयडीसी ...

ठळक मुद्देसरवली एमआयडीसी येथील उजागर प्रिंटिंग अँड प्रोसेसिंग डार्इंग कंपनीस आगनारपोली वहातूक पोलीस कार्यालयामागील दुचाकी व रिक्षा जळून खाक दोन्ही आगीच्या घटना संशयाच्या घे-यात

भिवंडी : भिवंडीतआगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गोदाम पट्ट्यातील आगीच्या घटना ताज्या असतानाच भिवंडी-कल्याण मार्गावरील सरवली एमआयडीसी येथील उजागर प्रिंटिंग अँड प्रोसेसिंग या डार्इंग कंपनीस व अंजूरफाटा येथे नारपोली वहातूक पोलीस कार्यालयामागे दुचाकी व रिक्षा जळून खाक झाल्या आहेत.सरवली एमआयडीसीमध्ये कापडावर प्रक्रिया करणाऱ्या उजागर प्रिंटिंग व प्रोसेसिंग प्रा.ली. या बंद कंपनीत साडेपाच वाजता लागलेली आग आतल्या आत धुमसत होती. सुमारे एक तासाने या घटनेची माहिती कोनगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाºयांना मिळाल्यानंतर त्यांनी भिवंडी व कल्याण अग्निशामक दलास दिल्यानंतर दिड-दोन तासांनी घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या . तोपर्यंत तळमजल्यावर लागलेल्या आगीने उग्र रूप धारण केले आणि आगीच्या ज्वाला कंपनीच्या तीन मजली इमारतीत पसरल्या.पाण्याचा मारा वरच्या मजल्या पर्यंत मारणे जवानांना शक्य होत नसल्याने या मजल्यावरील कापड जळून खाक झाले. सुदैवाने एमआयडीसीतील इतर कंपनीमधून पाण्याची उपलब्धता होत असल्याने या आगीवर सतत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात ठेवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले.तरी देखील दुपारी एक वाजेपर्यंत आग आटोक्यात आली नाही. संपुर्ण आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे पाच ते सात तासाचा वेळ लागणार असल्याची माहिती अग्निशामक दलाचे कल्याणचे अधिकारी चौधरी यांनी दिली आहे. सदर कंपनी बंद असताना अचानकपणे आग लागल्याने संशय व्यक्त केला जात आहे.तर दुसरी घटना अंजूरफाटा येथील नारपोली वहातूक शाखेच्या कार्यालयामागे घडली. त्यामध्ये ६ दुचाकी ,१ रिक्षा व त्या जवळील झाडाला काल रात्री दरम्यान अचानकपणे आग लागली. ही आग जवळच असलेल्या मनपाच्या अंजूरफाटा अग्निशामकदलाच्या जवानांनी विझविली. या घटनेप्रकरणी वहातूक पोलीसांनी नारपोली पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या बेवारस व भंगार सहा दुचाकी व एक रिक्षा गेल्या काही वर्षापासून कार्यालयामागे खितपत पडल्या होत्या. मात्र पोलीसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. वास्तविक महानगरपालिका आयुक्त,सहाय्यक पोलीस आयुक्त व वहातूक पोलीस यांची संयुक्त बैठक होऊन बेवारस वहाने पालिकेकडे जमा करण्यासाठी मोहिम सुरू केली होती. परंतू या मोहिमेकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे या घटनेवरून सिध्द झाले आहे. तसेच पोलिसांच्या आवारातील जप्त केलेल्या गाड्या जर सुरक्षीत नसतील तर शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या दुचाक्या कश्या सुरक्षीत राहतील?अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. दरम्यान वहातूक पोलीसांनी ही वहाने बेवारस असल्याचे सांगत ही वहाने जाळणा-या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून आपली सुटका करून घेतली आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीfireआग