शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

भिवंडीतील आगीच्या दोन घटना, डार्इंग व दुचाकी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 18:18 IST

भिवंडी : भिवंडीत आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गोदाम पट्ट्यातील आगीच्या घटना ताज्या असतानाच भिवंडी-कल्याण मार्गावरील सरवली एमआयडीसी ...

ठळक मुद्देसरवली एमआयडीसी येथील उजागर प्रिंटिंग अँड प्रोसेसिंग डार्इंग कंपनीस आगनारपोली वहातूक पोलीस कार्यालयामागील दुचाकी व रिक्षा जळून खाक दोन्ही आगीच्या घटना संशयाच्या घे-यात

भिवंडी : भिवंडीतआगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गोदाम पट्ट्यातील आगीच्या घटना ताज्या असतानाच भिवंडी-कल्याण मार्गावरील सरवली एमआयडीसी येथील उजागर प्रिंटिंग अँड प्रोसेसिंग या डार्इंग कंपनीस व अंजूरफाटा येथे नारपोली वहातूक पोलीस कार्यालयामागे दुचाकी व रिक्षा जळून खाक झाल्या आहेत.सरवली एमआयडीसीमध्ये कापडावर प्रक्रिया करणाऱ्या उजागर प्रिंटिंग व प्रोसेसिंग प्रा.ली. या बंद कंपनीत साडेपाच वाजता लागलेली आग आतल्या आत धुमसत होती. सुमारे एक तासाने या घटनेची माहिती कोनगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाºयांना मिळाल्यानंतर त्यांनी भिवंडी व कल्याण अग्निशामक दलास दिल्यानंतर दिड-दोन तासांनी घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या . तोपर्यंत तळमजल्यावर लागलेल्या आगीने उग्र रूप धारण केले आणि आगीच्या ज्वाला कंपनीच्या तीन मजली इमारतीत पसरल्या.पाण्याचा मारा वरच्या मजल्या पर्यंत मारणे जवानांना शक्य होत नसल्याने या मजल्यावरील कापड जळून खाक झाले. सुदैवाने एमआयडीसीतील इतर कंपनीमधून पाण्याची उपलब्धता होत असल्याने या आगीवर सतत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात ठेवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले.तरी देखील दुपारी एक वाजेपर्यंत आग आटोक्यात आली नाही. संपुर्ण आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे पाच ते सात तासाचा वेळ लागणार असल्याची माहिती अग्निशामक दलाचे कल्याणचे अधिकारी चौधरी यांनी दिली आहे. सदर कंपनी बंद असताना अचानकपणे आग लागल्याने संशय व्यक्त केला जात आहे.तर दुसरी घटना अंजूरफाटा येथील नारपोली वहातूक शाखेच्या कार्यालयामागे घडली. त्यामध्ये ६ दुचाकी ,१ रिक्षा व त्या जवळील झाडाला काल रात्री दरम्यान अचानकपणे आग लागली. ही आग जवळच असलेल्या मनपाच्या अंजूरफाटा अग्निशामकदलाच्या जवानांनी विझविली. या घटनेप्रकरणी वहातूक पोलीसांनी नारपोली पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या बेवारस व भंगार सहा दुचाकी व एक रिक्षा गेल्या काही वर्षापासून कार्यालयामागे खितपत पडल्या होत्या. मात्र पोलीसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. वास्तविक महानगरपालिका आयुक्त,सहाय्यक पोलीस आयुक्त व वहातूक पोलीस यांची संयुक्त बैठक होऊन बेवारस वहाने पालिकेकडे जमा करण्यासाठी मोहिम सुरू केली होती. परंतू या मोहिमेकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे या घटनेवरून सिध्द झाले आहे. तसेच पोलिसांच्या आवारातील जप्त केलेल्या गाड्या जर सुरक्षीत नसतील तर शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या दुचाक्या कश्या सुरक्षीत राहतील?अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. दरम्यान वहातूक पोलीसांनी ही वहाने बेवारस असल्याचे सांगत ही वहाने जाळणा-या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून आपली सुटका करून घेतली आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीfireआग