शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

heatstroke:तीव्र उन्हाळ्याच्या मुक्या प्राण्यांनाही झळा, उष्माघाताने ठाण्यात दोन श्वानांचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 05:56 IST

Thane News: तापमानाच्या वाढत्या पाऱ्याचा तडाखा प्राणी, पक्ष्यांनाही बसला आहे. उन्हाच्या त्रासामुळे ठाणेकरांची  दवाखान्यांत जशी गर्दी दिसून येत आहे तसेच प्राणी, पक्ष्यांनाही रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : तापमानाच्या वाढत्या पाऱ्याचा तडाखा प्राणी, पक्ष्यांनाही बसला आहे. उन्हाच्या त्रासामुळे ठाणेकरांची  दवाखान्यांत जशी गर्दी दिसून येत आहे तसेच प्राणी, पक्ष्यांनाही रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे.

१५ दिवसांत १७ पक्ष्यांना उष्माघाताचा फटका बसला असून, ते एसपीसीए रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत, तर कँप  फाउंडेशनला आठवड्याला ३५ आजारी पशू-पक्षी आढळत आहेत. यात मुख्यत्वे श्वान आणि मांजरींचा समावेश आहे. उष्माघातामुळे दोन श्वानांचा मृत्यूही झाल्याचे फाउंडेशनने सांगितले.

मार्च महिन्यात ठाण्यात तापमानाने चाळिशी गाठली असल्याने पक्षी व प्राण्यांना उष्माघाताचा फटका बसला. त्यांना पाणी सहज उपलब्ध होत नसल्याने पिण्याच्या पाण्याच्या शोधत असताना पोटातील पाणी कमी होऊन त्यांना चक्कर येऊन ते बेशुद्ध पडतात. पक्ष्यांच्या पंखांना जखम होण्याचे प्रमाण अधिक असते.

१५ दिवसांत एसपीसीए रुग्णालयात १७ पक्षी उपचारासाठी दाखल झाले. यात पाच घार, पाच घुबड, चार ससाणे, दोन कावळे आणि एक कोकिळा यांचा समावेश आहे. कँप फाउंडेशनकडे ठाणे, मुलुंड, भांडुप, कळवा, भिवंडी येथून मांजर आणि श्वानांना उष्माघाताचा त्रास झाल्याचे फोन येत आहेत.ज्यांच्या घरात पाळीव प्राणी आहेत त्यांनी उन्हामुळे त्यांचे पूर्ण केस काढले असतील तर उलट प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ शकतो. त्यांच्या शरीराला चटके लागून त्यांना उष्माघाताचा झटका येऊ शकतो. उन्हात बाहेर पडल्याने प्राणी बेशुद्ध पडल्याच्या दोन घटना घडल्याचे फाउंडेशनचे सुशांक तोमर यांनी सांगितले. रस्त्यांत जाताना सुद्धा एखादा पक्षी आजारी दिसल्यास नागरिकांनी फाउंडेशनला कळवावे, असे आवाहन केले आहे.प्राणी, पक्ष्यांसाठी हे अवश्य कराप्राणी, पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यात स्वच्छ पाणी ठेवावे. प्राण्यांना सावलीत जागा द्यावी. त्यांची विशेष काळजी घ्यावी.गेल्या १५ मार्चपासून उन्हाचा तडाखा वाढल्यापासून पक्ष्यांचे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.  त्यांना सलाईनद्वारे, तोंडावाटे औषधे दिले जात आहे. जखमींचे ड्रेसिंग केले जात आहे. - डॉ. सुहास राणे, एसपीसीए रुग्णालय

कँप फाउंडेशनकडे दिवसाला चार ते पाच म्हणजेच आठवड्याला ३५ फोन येत आहेत. यात पाणी न मिळाल्याने दोन श्वानांचा मृत्यू झाला आहे. उन्हाळा वाढल्याने पाळीव प्राण्यांना बाहेर काढू नये. ठिकठिकाणी त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि त्यांना सावलीत बसण्यासाठी जागा द्यावी.- सुशांक तोमर, कँप फाउंडेशन.

टॅग्स :weatherहवामानthaneठाणे