शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

भिवंडीतील वऱ्हाळ तलावात बुडून दोन बालकांचा मृत्यू, परिसरात हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 21:07 IST

दुपारी दोन तासांच्या शोधमोहिमेत अमन चौऊस याचा मृतदेह हाती लागला तर रात्री आठ वाजता अमान अन्सारी याचा मृतदेह सापडला.

भिवंडीभिवंडी शहरातील वऱ्हाळ तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. अमन आरिफ चौऊस वय १३ व अमान सरफराज अन्सारी वय १५ असे पाण्यात बुडवून मृत्यू पावलेल्या बालकांची नावे आहेत.

सध्या उष्णतेचा कहर असताना भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड अमन आरिफ चौऊस व अमान सरफराज खान हे दोघे आपल्या इतर चार मित्रांसह कामतघर वऱ्हाळ तलाव येथे दुपारी तीन वाजता फिरत फिरत आले. त्यानंतर अमन आरिफ चौऊस व अमान सरफराज खान असे दोघे पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता ते दोघे बुडू लागताच त्यांच्या सोबत आलेले चार मित्रांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. स्थानिकांनी या घटनेची महिती पोलिसांसह अग्निशामक दलास दिली असता अग्निशामक दलाचे जवान तात्काळ  घटनास्थळी दाखल होत शोध मोहीम सुरू केली.

दोन तासांच्या शोधमोहिमेत अमन चौऊस याचा मृतदेह हाती लागला .त्या नंतर अंधार पडू लागल्याने शोध थांबवित असताना रात्री ८ वाजता अमान अन्सारी याचा मृतदेह हाती लागला आहे. स्थानिक शहर पोलीस ठाण्यात या बाबत अपघात मृत्यूची नोंद करीत दोन्ही मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदना साठी पाठविण्यात आले आहेत.ऐन रमजान महिन्यात दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडवून दुदैवी मृत्यू झाल्याने पटेल कंपाऊंड परिसरात शोककळा पसरली आहे. तर वऱ्हाळ देवी तलाव परिसरात सुरक्षेच्या साधनांचा व सुरक्षा रक्षकांचा अभाव असल्याने मनपाच्या नाकर्तेपणा व दुर्लक्षित कारभारामुळे या दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची संतप्त भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीDeathमृत्यू