शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

ठाण्यात उपचाराअभावी मुरबाड येथे दोन बालकांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणेचा बेजबाबदारपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 10:08 IST

सर्पदंश झालेल्या व नवजात बालकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुरबाड : तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे सर्पदंश झालेल्या व नवजात बालकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तालुक्यातील वैशाखरे प्रधानपाडा येथील दोन वर्षांच्या बालकाला रात्री सर्पदंश झाल्याचे पालकांना समजले. त्यांनी तो साप सोबत घेऊन बालकाला टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु, रात्रीच्या वेळी तेथील गेट बंद असल्याने गेट उघडायला १५ ते २० मिनिटे लागली. त्यानंतर डॉक्टरांनी त्या सापाचे निरीक्षण करण्यास २० मिनिटे लावली. तो साप बिनविषारी आहे, असे सांगितले. बालकाची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांनी त्याला उल्हासनगर येथे हलविले. तेथे जाताना धोकादायक रस्त्यामुळे बराच अवधी निघून गेला. त्या डाॅक्टरांनी कळवा येथे हलविले. मात्र रस्त्यात बालकाने प्राण सोडला.

दुसऱ्या घटनेत जांभुर्डे येथील रेश्मा भोईर ही गर्भवती प्रसूतीसाठी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात आली होती. तिची प्रसूती नैसर्गिकरीत्या झाली असताना, बाळाची तब्येत बिघडली. परंतु, मुरबाड रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ नसल्याने त्याला उपचारासाठी उल्हासनगरला हलविण्यात आले. वेळीच उपचार न मिळाल्याने  जीव गमवावा लागला. आरोग्य व्यवस्थेच्या बेजबाबदारपणामुळे बाळाचा बळी गेल्याची तक्रार गुरुनाथ शेलवले यांनी वरिष्ठांकडे केली आहे.

मुरबाड ग्रामीण रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ मिळाले, तर त्यांच्या सल्ल्यानुसार बालकांवर प्राथमिक उपचार करता येतील. - डॉ. संग्राम डांगे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, मुरबाड.

टॅग्स :thaneठाणेDeathमृत्यू