शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

ठाण्यात उपचाराअभावी मुरबाड येथे दोन बालकांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणेचा बेजबाबदारपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 10:08 IST

सर्पदंश झालेल्या व नवजात बालकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुरबाड : तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे सर्पदंश झालेल्या व नवजात बालकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तालुक्यातील वैशाखरे प्रधानपाडा येथील दोन वर्षांच्या बालकाला रात्री सर्पदंश झाल्याचे पालकांना समजले. त्यांनी तो साप सोबत घेऊन बालकाला टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु, रात्रीच्या वेळी तेथील गेट बंद असल्याने गेट उघडायला १५ ते २० मिनिटे लागली. त्यानंतर डॉक्टरांनी त्या सापाचे निरीक्षण करण्यास २० मिनिटे लावली. तो साप बिनविषारी आहे, असे सांगितले. बालकाची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांनी त्याला उल्हासनगर येथे हलविले. तेथे जाताना धोकादायक रस्त्यामुळे बराच अवधी निघून गेला. त्या डाॅक्टरांनी कळवा येथे हलविले. मात्र रस्त्यात बालकाने प्राण सोडला.

दुसऱ्या घटनेत जांभुर्डे येथील रेश्मा भोईर ही गर्भवती प्रसूतीसाठी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात आली होती. तिची प्रसूती नैसर्गिकरीत्या झाली असताना, बाळाची तब्येत बिघडली. परंतु, मुरबाड रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ नसल्याने त्याला उपचारासाठी उल्हासनगरला हलविण्यात आले. वेळीच उपचार न मिळाल्याने  जीव गमवावा लागला. आरोग्य व्यवस्थेच्या बेजबाबदारपणामुळे बाळाचा बळी गेल्याची तक्रार गुरुनाथ शेलवले यांनी वरिष्ठांकडे केली आहे.

मुरबाड ग्रामीण रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ मिळाले, तर त्यांच्या सल्ल्यानुसार बालकांवर प्राथमिक उपचार करता येतील. - डॉ. संग्राम डांगे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, मुरबाड.

टॅग्स :thaneठाणेDeathमृत्यू