शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

खंडणीसाठी मुलाचे अपहरण करुन हत्या केल्याप्रकरणी दोघांना अटक, पवई पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 20:57 IST

मुंबईतील पवई येथून खंडणीसाठी अपहरण केलेल्या १० वर्षाच्या मुलाची भार्इंदरच्या आझादनगर भागात महापालिका मैदानात आणून हत्या केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.

मीरारोड : मुंबईतील पवई येथून खंडणीसाठी अपहरण केलेल्या १० वर्षाच्या मुलाची भार्इंदरच्या आझादनगर भागात महापालिका मैदानात आणून हत्या केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.पवई साकी विहार मार्गावर तुंगा गावातील करुणानगर मध्ये राहणारे बबलु सिंग यांचा १० वर्षांचा मुलगा रितेश हा रविवार १२ नोव्हेंबर रोजी दुपारपासून बेपत्ता झाला होता. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार करण्यात आली होती.बबलु यांचा सख्खा चुलत भाऊ संतोष सिंग सोबत काम करणारा अमर सिंग (२०) याने त्याला खेळण्यासाठी म्हणून नेले होते. पण श्रीराम मात्र मुलाला आपण घरा जवळच सोडले असा कांगावा केला. दरम्यान पोलिसांना अंधेरी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज मध्ये रितेशला घेऊन जाताना अमर व सोबत असलेला लालु ननकु सिंग (२१) रा. भार्इंदर हे दोघे आढळून आले.विशेष म्हणजे मुलाला शोधताना अमर देखील नातलग व पोलीसां सोबतच होता. पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने लालु सोबत मिळून रितेशची हत्या केल्याचे कबूल केले. आज मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास पवई पोलिसांच्या पथकाने नवघर पोलिसांच्या मदतीने आझाद नगर येथील महापालिकेच्या मैदानात टाकलेला रितेशचा मृतदेह ताब्यात घेतला.लालु हा भार्इंदर येथे स्टील बफिंग कारखान्यात काम करतो. अमर देखील त्याच्या सोबतच भार्इंदर येथे काम करायचा.अमरचे बबलुच्या घरी येणे जाणे होते. त्याने बबलुला पैसे मोजताना पाहिले होते. त्यातुनच रितेशचे अपहरण करुन बबलुकडून मोठी रक्कम उकळण्याचे त्याच्या डोक्यात आले. त्याने लालुला सोबत घेतले.रितेशचे अपहरण केल्यावर त्याला रीक्षाने अंधेरी रेल्वे स्थानक व तेथुन भार्इंदर येथे आणले. परंतु बबलूने अमर याला फोन करुन रितेश कुठे असल्या बद्दल विचारणा केल्याने अमर हा हादरला. त्यातुनच अमर व लालुने भार्इंदरच्या आझाद नगर मधील पालिका मैदानात काळोख व झाडी असल्याने तेथे त्याची गळा दाबून व दगड मारुन त्याची हत्या केली.महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे दुसरी हत्यासदर मैदान हे महापालिकेच्या मालकीचे असून येथे भंगाराची गोदामे, झोपडया आदी अतिक्रमण झाले आहे. तर काही भागात झाडी वाढली असुन अंधार असतो. त्यामुळे उनाड, गर्दुल्ले आदींचा राबता असतो. एक वर्षापूर्वी याच भागातील एका ६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. स्थानिक नगरसेविका तारा घरत यांनी वारंवार पत्र देऊन, धरणं धरुन अतिक्रमण हटवा व मैदान विकसीत करण्याची मागणी चालवली होती. पण पालिकेने सातत्याने दुर्लक्षच केले. 

टॅग्स :Crimeगुन्हा