शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

खंडणीसाठी मुलाचे अपहरण करुन हत्या केल्याप्रकरणी दोघांना अटक, पवई पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 20:57 IST

मुंबईतील पवई येथून खंडणीसाठी अपहरण केलेल्या १० वर्षाच्या मुलाची भार्इंदरच्या आझादनगर भागात महापालिका मैदानात आणून हत्या केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.

मीरारोड : मुंबईतील पवई येथून खंडणीसाठी अपहरण केलेल्या १० वर्षाच्या मुलाची भार्इंदरच्या आझादनगर भागात महापालिका मैदानात आणून हत्या केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.पवई साकी विहार मार्गावर तुंगा गावातील करुणानगर मध्ये राहणारे बबलु सिंग यांचा १० वर्षांचा मुलगा रितेश हा रविवार १२ नोव्हेंबर रोजी दुपारपासून बेपत्ता झाला होता. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार करण्यात आली होती.बबलु यांचा सख्खा चुलत भाऊ संतोष सिंग सोबत काम करणारा अमर सिंग (२०) याने त्याला खेळण्यासाठी म्हणून नेले होते. पण श्रीराम मात्र मुलाला आपण घरा जवळच सोडले असा कांगावा केला. दरम्यान पोलिसांना अंधेरी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज मध्ये रितेशला घेऊन जाताना अमर व सोबत असलेला लालु ननकु सिंग (२१) रा. भार्इंदर हे दोघे आढळून आले.विशेष म्हणजे मुलाला शोधताना अमर देखील नातलग व पोलीसां सोबतच होता. पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने लालु सोबत मिळून रितेशची हत्या केल्याचे कबूल केले. आज मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास पवई पोलिसांच्या पथकाने नवघर पोलिसांच्या मदतीने आझाद नगर येथील महापालिकेच्या मैदानात टाकलेला रितेशचा मृतदेह ताब्यात घेतला.लालु हा भार्इंदर येथे स्टील बफिंग कारखान्यात काम करतो. अमर देखील त्याच्या सोबतच भार्इंदर येथे काम करायचा.अमरचे बबलुच्या घरी येणे जाणे होते. त्याने बबलुला पैसे मोजताना पाहिले होते. त्यातुनच रितेशचे अपहरण करुन बबलुकडून मोठी रक्कम उकळण्याचे त्याच्या डोक्यात आले. त्याने लालुला सोबत घेतले.रितेशचे अपहरण केल्यावर त्याला रीक्षाने अंधेरी रेल्वे स्थानक व तेथुन भार्इंदर येथे आणले. परंतु बबलूने अमर याला फोन करुन रितेश कुठे असल्या बद्दल विचारणा केल्याने अमर हा हादरला. त्यातुनच अमर व लालुने भार्इंदरच्या आझाद नगर मधील पालिका मैदानात काळोख व झाडी असल्याने तेथे त्याची गळा दाबून व दगड मारुन त्याची हत्या केली.महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे दुसरी हत्यासदर मैदान हे महापालिकेच्या मालकीचे असून येथे भंगाराची गोदामे, झोपडया आदी अतिक्रमण झाले आहे. तर काही भागात झाडी वाढली असुन अंधार असतो. त्यामुळे उनाड, गर्दुल्ले आदींचा राबता असतो. एक वर्षापूर्वी याच भागातील एका ६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. स्थानिक नगरसेविका तारा घरत यांनी वारंवार पत्र देऊन, धरणं धरुन अतिक्रमण हटवा व मैदान विकसीत करण्याची मागणी चालवली होती. पण पालिकेने सातत्याने दुर्लक्षच केले. 

टॅग्स :Crimeगुन्हा