शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

खंडणीसाठी मुलाचे अपहरण करुन हत्या केल्याप्रकरणी दोघांना अटक, पवई पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 20:57 IST

मुंबईतील पवई येथून खंडणीसाठी अपहरण केलेल्या १० वर्षाच्या मुलाची भार्इंदरच्या आझादनगर भागात महापालिका मैदानात आणून हत्या केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.

मीरारोड : मुंबईतील पवई येथून खंडणीसाठी अपहरण केलेल्या १० वर्षाच्या मुलाची भार्इंदरच्या आझादनगर भागात महापालिका मैदानात आणून हत्या केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.पवई साकी विहार मार्गावर तुंगा गावातील करुणानगर मध्ये राहणारे बबलु सिंग यांचा १० वर्षांचा मुलगा रितेश हा रविवार १२ नोव्हेंबर रोजी दुपारपासून बेपत्ता झाला होता. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार करण्यात आली होती.बबलु यांचा सख्खा चुलत भाऊ संतोष सिंग सोबत काम करणारा अमर सिंग (२०) याने त्याला खेळण्यासाठी म्हणून नेले होते. पण श्रीराम मात्र मुलाला आपण घरा जवळच सोडले असा कांगावा केला. दरम्यान पोलिसांना अंधेरी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज मध्ये रितेशला घेऊन जाताना अमर व सोबत असलेला लालु ननकु सिंग (२१) रा. भार्इंदर हे दोघे आढळून आले.विशेष म्हणजे मुलाला शोधताना अमर देखील नातलग व पोलीसां सोबतच होता. पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने लालु सोबत मिळून रितेशची हत्या केल्याचे कबूल केले. आज मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास पवई पोलिसांच्या पथकाने नवघर पोलिसांच्या मदतीने आझाद नगर येथील महापालिकेच्या मैदानात टाकलेला रितेशचा मृतदेह ताब्यात घेतला.लालु हा भार्इंदर येथे स्टील बफिंग कारखान्यात काम करतो. अमर देखील त्याच्या सोबतच भार्इंदर येथे काम करायचा.अमरचे बबलुच्या घरी येणे जाणे होते. त्याने बबलुला पैसे मोजताना पाहिले होते. त्यातुनच रितेशचे अपहरण करुन बबलुकडून मोठी रक्कम उकळण्याचे त्याच्या डोक्यात आले. त्याने लालुला सोबत घेतले.रितेशचे अपहरण केल्यावर त्याला रीक्षाने अंधेरी रेल्वे स्थानक व तेथुन भार्इंदर येथे आणले. परंतु बबलूने अमर याला फोन करुन रितेश कुठे असल्या बद्दल विचारणा केल्याने अमर हा हादरला. त्यातुनच अमर व लालुने भार्इंदरच्या आझाद नगर मधील पालिका मैदानात काळोख व झाडी असल्याने तेथे त्याची गळा दाबून व दगड मारुन त्याची हत्या केली.महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे दुसरी हत्यासदर मैदान हे महापालिकेच्या मालकीचे असून येथे भंगाराची गोदामे, झोपडया आदी अतिक्रमण झाले आहे. तर काही भागात झाडी वाढली असुन अंधार असतो. त्यामुळे उनाड, गर्दुल्ले आदींचा राबता असतो. एक वर्षापूर्वी याच भागातील एका ६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. स्थानिक नगरसेविका तारा घरत यांनी वारंवार पत्र देऊन, धरणं धरुन अतिक्रमण हटवा व मैदान विकसीत करण्याची मागणी चालवली होती. पण पालिकेने सातत्याने दुर्लक्षच केले. 

टॅग्स :Crimeगुन्हा