शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

साडेचार हजार धोकादायक इमारतीत अडीच लाख रहिवाशांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पावासाळा सुरू झाला की धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न दरवर्षी ठाणे शहराला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : पावासाळा सुरू झाला की धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न दरवर्षी ठाणे शहराला सतावत असतो. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी इमारतींचा सर्व्हे केला जात असतो. त्यानुसार ठाणे महापालिका हद्दीत सध्या चार हजार ५२२ इमारती या धोकादायक आहेत. यामध्ये ७३ इमारती या अतिधोकादायक असून त्यातील ३० इमारती खाली करून तोडल्या आहेत. परंतु, या धोकादायक इमारतींमध्ये सध्याच्या घडीला तब्बल दोन लाख ५० हजार रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. एकीकडे कोरोनाचे सावट दुसरीकडे मरणाची भीती. परंतु, पावसाळ्यात इमारत खाली करून जायचे तरी कुठे असा प्रश्न या रहिवाशांना पडला आहे.

पावसाळा जवळ आला की महापालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन कशा पद्धतीने सज्ज आहे, याचा आढावा घेतला जातो. तसेच पावसाळ्यात जुन्या इमारती पडण्याचा प्रश्न अधिक प्रमाणात सतावत असतो. त्यामुळे अशा इमारतींचा सर्व्हे करून कोणत्या इमारती तत्काळ पाडणे गरजेचे आहे, कोणत्या इमारतींची डागडुजी होऊ शकते. याचा अभ्यास केला जातो. त्यानुसार महापालिकेने घोषित केलेल्या धोकादायक इमारतींपैकी सी-१ अर्थात अति धोकादायक इमारतीचा प्रकार असून अशी इमारत नोटीस बजावल्यानंतर काही कालावधीनंतर ती जमिनदोस्त केली जाते. तर सी- १- ए मधील म्हणजे धोकादायक इमारती रिकाम्या करून त्याचे संरचनात्मक परीक्षण केले जाते. यंदा केलेल्या सर्वेक्षणात ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समितीमधील चार हजार ५२२ धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये अतिधोकादायक ७३ इमारतींचा समावेश आहे. त्याचबरोबर सी- २ ए मध्ये १५४ इमारतींचा समावेश आहे. तर सी २ बी मध्ये २४१६ आणि सी ३ मध्ये १८७९ इमारतींचा समावेश आहे. या इमारतींची दुरुस्ती करता येणे शक्य आहे. त्यामुळे या इमारतधारकांनादेखील नोटिसा बजावल्या असून त्यानुसार दुरुस्ती करण्याचे सूचित केल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यानुसार नोटिसा बजावून शहरातील ७३ पैकी ३० इमारतींवर आतापर्यंत हातोडा टाकला आहे. तरी सुद्धा सध्याच्या घडीला उर्वरित इमारतींमध्ये तब्बल दोन लाख ५० हजार नागरिक जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. या इमारतींमधील रहिवाशांना एकतर भाड्याच्या इमारतीत किंवा रहिवाशांना स्वत:च आपला राहण्याचा बंदोबस्त करावा असेही सांगण्यात आले आहे.

पावसाळ्यात होणारी हानी टाळण्यासाठी पहिल्या टप्यात महापालिकेच्या माध्यमातून अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांना नोटिसा बजावल्या जातात. त्यानंतर त्या इमारतींवर कारवाई केली जाते. तसेच ज्या इमारती दुरुस्त करण्यायोग्य असतील अशा इमारतधारकांना तशा प्रकारच्या नोटिसा बजावल्या जातात.

(अशोक बुरपुल्ले - उपायुक्त, अतिक्रमण - ठामपा)

कोरोनामुळे आधीच कंबरडे मोडले आहे, त्यात आता महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. परंतु, एवढे मोठे कुटुंब घेऊन जायचे कुठे, असा प्रश्न आहे. पालिकेकडून भाड्याची घरे दिली जात आहेत. परंतु, त्याठिकाणी आम्ही ८ ते १० जणांनी कसे राहायचे.

(रवी निकम - रहिवासी)

इमारत धोकादायक झाली आहे, हे आम्हाला दिसत आहे. परंतु, एवढी वर्षे येथे काढल्यानंतर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहता येईल का? आणि आता नवे घर घेणे देखील परवडणारे नाही. त्यामुळे आहे त्याच घरात राहून संसार चालवायचा पुढचे पुढे बघता येईल.

(रुपेश जाधव - रहिवासी)

कोरोनाची परिस्थिती असल्याने सध्या इमारती खाली करण्यास रहिवासी तयार नाहीत. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून अशा रहिवाशांना वारंवार नोटिसा बजावल्या आहेत. पावसाळ्यात जर काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी ही पालिकेवरच येत असते. वास्तविक पाहता येथील रहिवाशांनी नियमानुसार इमारती खाली करणे गरजेचे आहे. परंतु, त्यांनादेखील राहण्याची व्यवस्था होत नसल्याने ऐन पावसाळ्यात दुसरे घर शोधायचे कुठे असा पेच त्यांच्यापुढे असतो. त्यामुळेच तेदेखील तितकेच या घटनेला जबाबदार असू शकणार आहेत.

शहरातील धोकादायक इमारतींची संख्या - ४५२२

इमारतीमधील रहिवाशांची संख्या - २ लाख ५० हजार

प्रभाग समितीनिहाय धोकादायक इमारतींची यादी

कोपरी नौपाडा - ४५३

उथळसर - १३४

वागळे - १०८६

लोकमान्यनगर - २१७

वर्तकनगर - ५४

माजिवडा- मानपाडा - १९३

कळवा - १९३

मुंब्रा - १४१९

दिवा - ८४१

--------------------

४५२२