शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

कासवांची तस्करी करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 15:55 IST

कल्याण वनविभागाची मोठी कारवाई

कल्याण : कासवांची तस्करी करण्यासाठी बिहारहून कल्याणमध्ये आलेल्या एका तरुणाला कल्याण वन विभागाने काल रात्री अटक केली. कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील एका लॉजजवळ सापळा रचून या तरुणाला अटक करण्यात आली. दिलशान अहमद असे या तरुणाचे नाव असून त्याच्याकडून ५० कासवे हस्तगत करण्यात आली. यामधील ४६ कासव जिवंत तर चार मृत असल्यची माहिती वनविभागाने दिली. बिहार राज्यातील पाटना दानापूर येथे राहणारा दिलशान अहमद ५० कासवे घेऊन काल रात्री पाटलीपुर एक्स्प्रेसने कल्याण रेल्वे स्थानक येथे उतरला. तो कल्याण रेल्वे स्थानकासमोरील महाराष्ट्र गेस्टहाऊसमध्ये थांबला होता. दिलशान कासवांची तस्करी करण्यासाठी कल्याणमध्ये आल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल -बेलापूर, तसेच आर एफ ओ एस. एस कंक यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण वनविभागचे वनपाल मुरलीधर जागकर आणि संपूर्ण टीम आणि सर्पमित्र योगेश कांबळे व वन्यजीव अभ्यासक सुहास पवार यांनी सापळा रचून काल रात्री दीडच्या सुमारास दिलशानला अटक केली त्याच्याकडून ५० ब्लॅक पौंड टर्टल प्रजातींची कासवे जप्त करण्यात आली. दिलशान कासवांची ऑनलाईन तस्करी करत होता. याबाबत वनविभागाची पुढील चौकशी सुरू असून कासवांना लवकर त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.कासवांचे मांस खाल्ल्याने वाताचे आजार बरे होतात. घरात रोगराई व साथीचे आजार येत नाही, अशा प्रकारचे भ्रामक गैरसमज लोकांमध्ये आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कासवांची खरेदी केली जाते. भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ च्या परिशिष्ट एकच्या भाग दोननुसार भारतातील प्रत्येक कासव अनुसूची एकमध्ये संरक्षित केला गेला आहे. या कायद्याचे उल्लंघन करून कासव पाळणे, शिकार करणे, तस्करी करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ३ ते ७ वर्षांचा कारावास आणि २५,००० रुपये दंड अशी जबर शिक्षा आहे. या शिक्षेची तरतूद असतानाही आजही सर्रासपणे कासवाची खरेदी विक्री सुरु असल्याचे दिसून येते.  

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हा