शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

भाजप प्रवेशासाठी अर्जुन काळेच्या मृत्यू प्रकरण्यात अडकविण्याचा प्रयत्न - भारत गंगोत्री

By सदानंद नाईक | Updated: June 6, 2023 20:39 IST

उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील भाटिया चौकात १७ मे रोजी रात्री साडे अकरा वाजता अर्जुन काळे यांच्या गाडीला अपघात होऊन, गंभीर जखमी झाला होता. त्याचा साथीदार मात्र घरी पळून गेला होता.

उल्हासनगर : भाजप प्रवेशासाठी अर्जुन काळे मृत्यू प्रकरणी अडकविण्याचा प्रयत्न कलानी पितापुत्र करीत असल्याचा आरोप भारत गंगोत्री यांनी प्रसिद्धपत्रकात करून खळबळ उडून दिली. तसेच शिवसेना शिंदेगट कारवाईसाठी दबाव आणत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील भाटिया चौकात १७ मे रोजी रात्री साडे अकरा वाजता अर्जुन काळे यांच्या गाडीला अपघात होऊन, गंभीर जखमी झाला होता. त्याचा साथीदार मात्र घरी पळून गेला होता. जखमी काळे यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा २२ मे रोजी मृत्यू झाला. अर्जुन काळे यांच्या मृत्यूला भारत गंगोत्री यांच्यासह त्याचे साथीदार जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यांनीच त्याला मारल्याने, मृत्यू झाल्याचे म्हटले.

अर्जुन काळे याने साथीदारांसह मोबाईल हिसकावून पळून जात असताना अपघात होऊन जखमी झाल्याचे स्पष्टीकरण गंगोत्री यांनी दिले. तसेच पोलिसांनी अर्जुन काळे यांच्यासह साथीदारकडून चोरलेले मोबाईल हस्तगत केले असून शवविच्छेदन अहवालात अपघाताने मृत्यू झाल्याचे नमूद आहे. असे गंगोत्री यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले. मयत अर्जुन काळे याचे नातेवाईक व जखमी मित्राला कलानी महल मध्ये कलानी पितापुत्र बोलावून माझ्या विरोधात कटकारस्थान रचत असल्याचेही गंगोत्री यांचे म्हणणे आहे. 

दरम्यान गेल्या आठवड्यात नेताजी गार्डन येथे राष्ट्रवादी पदाधिकारी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला भारत गंगोत्री यांना आमंत्रित केले नसल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर आला. पदाधिकारी शिबीर बैठकीत माजीमंत्री व पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सिंधीं समाजाबाबत काढलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडीओ गंगोत्री यांनीच प्रथम सोशल मीडियावर टाकला.

त्यानंतर शिवसेना व भाजपने कारवाईसाठी आंदोलन केल्यावर आव्हाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याच वादाचा फायदा कलानी कुटुंब यांनी घेऊन माझ्या विरोधात कटकारस्थान करीत असल्याचे गंगोत्री यांचे म्हणणे आहे. अर्जुन काळे याच्या मृत्यू प्रकरणात अडकविण्याची भीती दाखवून भाजप प्रवेशासाठी दबाव टाकला जात आहे. यासाठी शिंदे गट कारवाईसाठी सक्रिय झाल्याचे गंगोत्री यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले.

गंगोत्रीच्या प्रसिद्धीपत्रकाने खळबळ भारत गंगोत्री यांनी कलानी कुटुंबासह शिवसेना शिंदे गट व भाजपवर टीका केल्याने, एकच खळबळ उडाली. अर्जुन काळे मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीची मागणी होत आहे.

टॅग्स :BJPभाजपा