शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेलगावातील खरे लाभार्थी मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:50 IST

मुरबाडची घटना : किरकोळ नुकसान झालेल्यांना झाला फायदा

मुरबाड : वादळी पावसामुळे शेलगाव परिसरात लाखो रूपयांचे नुकसान झाले. वादळात दहा ते पंधरा गावातील घरावरील छप्पर उडून गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. या घटनेतील बाधितांना सरकारच्या वतीने तहसीलदार अमोल कदम यांनी मदत वाटप केली,मात्र यात खरे बाधित वंचित तर ज्यांचे किरकोळ नुकसान झाले त्यांना मात्र मदत दिली आहे .

तालुक्यातील शेलगाव व शिरोशी परिसरात १० जून रोजी वादळी पावसाने चांगलीच दैना केली होती. या परिसरात शेलगाव, शिरोशी, शाई, वनोटे, वेळूक, मांदोशीसह २० ते २५ गावात चक्र ीवादळात घरांची छप्परे उडाली. अनेकांच्या घरातील वस्तू , धान्य पाण्यात भिजले. यात विशेष म्हणजे शेलगाव येथील चंद्रकांत सासे, शिवाजी मुरेकर, मधुकर मुरेकर, कल्पना मुकणे, करीम शेख, इस्माईल बाबू शेख यांच्यासह जेमतेम चार ते पाच घरे वगळता संपूर्ण गावातील घरांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित अहवाल तहसीलदार कार्यालयात पाठवावे असे आदेश आमदार किसन कथोरे व तहसीलदार अमोल कदम यांनी तलाठी, सर्कल यांना दिले.

या आदेशानुसार मंडळ अधिकारी व तलाठी हे शेलगाव येथे जाऊन त्यांनी तेथील जमीन खरेदी- विक्र ीचा व्यवसाय करणाऱ्यांचे घर गाठले तेथे बसून सरपंच, पोलीस पाटील यांच्याकडून नावे घेऊन पंचनामे केले. यामध्ये चंद्रकांत सासे यांच्यासह वरील कुटुंबांचे लाखाहून अधिक नुकसान झाले. तर काहींचे जेमतेम पाच पंचवीस कौले फुटलेली. मात्र पंचनामा करताना त्यांचेही नुकसान जास्त झाल्याचे दाखवले गेले. या सर्व नुकसानग्रस्तांना सरासरी सहा हजाराचे मदतीचे धनादेश दिले गेले. यामुळे ज्यांना जास्त मदतीची गरज होती त्यांच्यावर एकप्रकारे अन्याय झाला आहे.

ज्यांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सीताराम निमसे यांनी केली आहे.

१० जून रोजी शिरोशी परिसरात अचानक आलेल्या वादळाने शेलगाव, शाई या गावातील अनेक घरांचे पत्रे, कौले उडून नुकसान झाले आहे. हे खरे आहे. त्यांना प्रत्येक कुटुंबाला सहा हजार आर्थिक मदत दिलेली आहे. ही मदत सरकारच्या धोरणाप्रमाणे वाटप केली आहे.- अमोल कदम, तहसीलदार, मुरबाड.

शेलगाव, शाई व परिसरातील गावात वादळी पावसाने अनेक घरांची मोठी हानी झाली आहे. सरकारने त्या नुकसानग्रस्तांना योग्य ती मदत द्यायला हवी होती; परंतु सहा हजार तुटपुंजी मदत देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. यात काही कुटुंबांचे खूप नुकसान झाले आहे. त्यांच्यावर हा अन्याय असून त्यांना योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत.- सीताराम निमसे, उपाध्यक्ष,भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मुरबाड तालुका

टॅग्स :Rainपाऊस