शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

औरंगाबादमध्ये मिळाला ठाण्यातून चोरीस गेलेला १५ लाखांचा ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 22:51 IST

ठाण्यातून चोरीस गेलेल्या एका ट्रकला औरंगाबाद जिल्हयातील वैजापूर येथून ताब्यात घेण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. ट्रकला असलेल्या जीपीएसमुळे ही चोरी पकडली गेली. मात्र, पोलीस मागावर असल्याचे समजल्यामुळे चोरटयाने मात्र पोबारा केला.

ठळक मुद्देकापूरबावडी पोलिसांची कामगिरीचोरटयाची हुलकावणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील माजीवडा भागातील मुंबई नाशिक मार्गावरुन चोरीस गेलेला १५ लाखांचा ट्रक औरंगाबाद जिल्हयातील वैजापूर येथील एका ढाब्यावरुन आणण्यात कापूरबावडी पोलिसांना यश आले आहे. या ट्रकच्या चोरटयाने मात्र पोलिसांना हुलकावणी दिली आहे. त्याचा अद्यापही शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.या ट्रकचे चालक बंधू भाटकर यांनी १७ आॅक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुंबई -नाशिक राष्ट्रीय मार्गावरील माजीवडा उड्डाणपूलाच्याजवळ हा ट्रक उभा केला होता. १८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ते ट्रकजवळ गेले. तेंव्हा तिथून ट्रक चोरीस गेल्याचे आढळले. याप्रकरणी भाटकर यांनी तात्काळ कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने या चोरीचा तपास सुरु केला. तेंव्हा ट्रकला असलेल्या जीपीएस यंत्रणेच्या आधारे तो औरंगाबाद जिल्हयातील वैजापूरपासून जवळच असलेल्या एका ढाब्याच्या ठिकाणी उभा असल्याचे आढळले. ठाणे पोलिसांनी वैजापूर पोलिसांच्या मदतीने हा ट्रक १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतला. मात्र, ट्रक चोरी करणाऱ्याने तिथून पलायन केले होते. हा ट्रक आता मुळ मालकाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. ट्रकची चोरी करणाºयाचा मात्र अजूनही शोध घेण्यात येत असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी