शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

घरांची रेकी करून मुंबईसह ठाण्यात चोरी करणारे त्रिकूट गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 22:10 IST

ठाणे, मुंबई परिसरात घरफोड्या करणारे अट्टल चोरटे कोपरी भागात येणार असल्याची ‘टीप’ ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली होती. त्याआधारे त्रिकुटाला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ठाण्यातील ११ चोऱ्या उघड झाल्या आहेत.

ठळक मुद्देदोन लाखांचा माल हस्तगत१४ घरफोड्यांची कबुलीठाणे गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिटची कामगिरी

ठाणे : मुंबईसह ठाण्यातील घरांची ‘रेकी’ करून नंतर त्याठिकाणी चो-या करणा-या रोहित शेवाळे (३४, रा. कांजूरमार्ग, मुंबई), संजू शेट्टी (३३, विरार, पालघर) आणि भूषण बांदेकर (२४, चारकोप, मुंबई) या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट-५ ने अटक केली आहे. त्यांनी १४ ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली असून त्यातील ठाण्यातील ११ गुन्हे उघड झाले आहेत. त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ठाणे, मुंबई परिसरात घरफोड्या करणारे अट्टल चोरटे कोपरी भागात येणार असल्याची ‘टीप’ युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली रणवरे यांच्या पथकाने ठाण्यातील कोपरी येथील आनंद सिनेमा भागात १९ आॅक्टोबर रोजी सापळा लावून रोहितसह तिघांना अटक केली. त्यांच्या कसून चौकशीमध्ये कोपरीतील एक, श्रीनगर भागातील आठ, वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील तीन आणि मुंबईतील नवघर पोलीस ठाण्याच्या परिसरातील दोन अशा १४ ठिकाणी घरफोड्या केल्याची त्यांनी कबुली दिली. तिघेही अट्टल चोरटे असून त्यांच्यावर ठाणे, मुंबई परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी रोहितवर मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये ‘मकोका’अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता. त्याच्या ताब्यातून घरफोडीच्या गुन्ह्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख सात हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या आरोपींकडून आणखीही घरफोडीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी