शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

श्रद्धांजली वाहिली, पण सुरक्षा उपाययोजनांचे काय?; जवानांचा जीव लागला टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 00:10 IST

अग्निशमन केंद्राच्या वास्तू झाल्या जीर्ण : दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष

कल्याण : पूर्वेतील चक्कीनाका परिसरात बचाव कार्यासाठी गेलेले केडीएमसीतील अग्निशमन दलातील प्रमोद वाघचौडे आणि अनंत शेलार या दोन जवानांचा विहिरीतील विषारी वायुमूळे मृत्यू झाल्याची घटना १ नोव्हेंबर २०१८ ला घडली होती. या दोघांना शुक्रवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर केडीएमसी प्रशासनाने कोणताही धडा घेतल्याचे दिसत नाही. अग्निशमन केंद्राच्या वास्तूही सुस्थितीत नाहीत. त्या जीर्ण झाल्याने येथील जवानांचा जीव टांगणीला लागला आहे.

मंजूर पदे आणि कार्यरत मनुष्यबळ, यातील तफावतीमुळे अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची होणारी परवड आणि अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत असताना शहरात घडण्याºया दुर्घटनांमध्ये जवानांचे बळीही गेल्याचे मागील वर्षी पाहायला मिळाले. विहीर दुर्घटनेत वाघचौडे आणि शेलार यांचा बळी गेल्याची घटना १ नोव्हेंबर २०१८ ला घडली होती. त्यानंतर २९ नोव्हेंबरला मध्यरात्री चायनीज खाद्यपदार्थांच्या दुकानाला लागलेली आग विझविताना लीडिंग फायरमन जगन आमले यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनानंतरही जवानांच्या सुरक्षेची योग्य प्रकारे काळजी घेतली जात नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजही अग्निशमन दलातील जवान सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. शहरात धोकादायक इमारतींचे सज्जे आणि घरातील छताचे प्लास्टर कोसळून जीवितहानी होत असताना दुसरीकडे अशा दुर्घटनेवेळी धावून जाणाºया जवानांचे जीवही धोक्यात आहेत. डोंबिवलीतील अग्निशमन केंद्रातील छताला असलेल्या प्लास्टरची पडझड झाल्याची घटना आॅगस्टमध्ये घडली होती. यामध्ये कोणालाही इजा झालेली नसली तरी केंद्राची अवस्था पाहता जीव मुठीत धरूनच वावरावे लागत आहे. या केंद्रात बहुतांश ठिकाणी भिंतीमधून पावसाचे पाणी झिरपत आहे. त्यामुळे अन्य ठिकाणचे प्लास्टर कोसळण्याच्या स्थितीत आहे. यासंदर्भात ९ जून २०१९ ला मुख्य अग्निशमन अधिकारी, संबंधित खात्याचे उपायुक्त आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.दुसरीकडे पश्चिमेतील आधारवाडीतील मुख्य केंद्राची धोकादायक अवस्थेत असलेली इमारत दुरुस्त करावी, यासंदर्भात तीन वर्षांपासून नगरसेवक मोहन उगले यांचा पाठपुरावा सुरू आहे. याबाबत कामाची फाइलही बनवली, पण अंमलबजावणीच नाही. या धोकादायक अवस्थेतील केंद्रातील मुख्यालय चिकणघर परिसरात हलवले आहे. पण केंद्र आधारवाडीला जैसे थे ठेवले आहे.लवकरच कार्यवाही होईलआधारवाडी येथील केंद्राच्या ठिकाणी नवीन इमारत बांधली जाणार आहे. यासंदर्भात बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. तळमजल्यावर अग्निशमन केंद्राची वाहने, पहिल्या मजल्यावर संबंधित विभागाचे मुख्य कार्यालय तर दुसºया व तिसºया मजल्यावर ‘क’ प्रभागाचे कार्यालय असेल, असे नियोजन आहे. डोंबिवली केंद्रच्या दुरुस्तीचा प्रस्तावही पाठवला आहे. त्याबाबतही कार्यवाही होईल, असे केडीएमसीचे मुख्य अग्शिमन अधिकारी दिलीप गुंड यांनी सांगितले.

टॅग्स :fireआगkdmcकल्याण डोंबिवली महापालिका