शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धांजली वाहिली, पण सुरक्षा उपाययोजनांचे काय?; जवानांचा जीव लागला टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 00:10 IST

अग्निशमन केंद्राच्या वास्तू झाल्या जीर्ण : दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष

कल्याण : पूर्वेतील चक्कीनाका परिसरात बचाव कार्यासाठी गेलेले केडीएमसीतील अग्निशमन दलातील प्रमोद वाघचौडे आणि अनंत शेलार या दोन जवानांचा विहिरीतील विषारी वायुमूळे मृत्यू झाल्याची घटना १ नोव्हेंबर २०१८ ला घडली होती. या दोघांना शुक्रवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर केडीएमसी प्रशासनाने कोणताही धडा घेतल्याचे दिसत नाही. अग्निशमन केंद्राच्या वास्तूही सुस्थितीत नाहीत. त्या जीर्ण झाल्याने येथील जवानांचा जीव टांगणीला लागला आहे.

मंजूर पदे आणि कार्यरत मनुष्यबळ, यातील तफावतीमुळे अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची होणारी परवड आणि अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत असताना शहरात घडण्याºया दुर्घटनांमध्ये जवानांचे बळीही गेल्याचे मागील वर्षी पाहायला मिळाले. विहीर दुर्घटनेत वाघचौडे आणि शेलार यांचा बळी गेल्याची घटना १ नोव्हेंबर २०१८ ला घडली होती. त्यानंतर २९ नोव्हेंबरला मध्यरात्री चायनीज खाद्यपदार्थांच्या दुकानाला लागलेली आग विझविताना लीडिंग फायरमन जगन आमले यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनानंतरही जवानांच्या सुरक्षेची योग्य प्रकारे काळजी घेतली जात नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजही अग्निशमन दलातील जवान सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. शहरात धोकादायक इमारतींचे सज्जे आणि घरातील छताचे प्लास्टर कोसळून जीवितहानी होत असताना दुसरीकडे अशा दुर्घटनेवेळी धावून जाणाºया जवानांचे जीवही धोक्यात आहेत. डोंबिवलीतील अग्निशमन केंद्रातील छताला असलेल्या प्लास्टरची पडझड झाल्याची घटना आॅगस्टमध्ये घडली होती. यामध्ये कोणालाही इजा झालेली नसली तरी केंद्राची अवस्था पाहता जीव मुठीत धरूनच वावरावे लागत आहे. या केंद्रात बहुतांश ठिकाणी भिंतीमधून पावसाचे पाणी झिरपत आहे. त्यामुळे अन्य ठिकाणचे प्लास्टर कोसळण्याच्या स्थितीत आहे. यासंदर्भात ९ जून २०१९ ला मुख्य अग्निशमन अधिकारी, संबंधित खात्याचे उपायुक्त आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.दुसरीकडे पश्चिमेतील आधारवाडीतील मुख्य केंद्राची धोकादायक अवस्थेत असलेली इमारत दुरुस्त करावी, यासंदर्भात तीन वर्षांपासून नगरसेवक मोहन उगले यांचा पाठपुरावा सुरू आहे. याबाबत कामाची फाइलही बनवली, पण अंमलबजावणीच नाही. या धोकादायक अवस्थेतील केंद्रातील मुख्यालय चिकणघर परिसरात हलवले आहे. पण केंद्र आधारवाडीला जैसे थे ठेवले आहे.लवकरच कार्यवाही होईलआधारवाडी येथील केंद्राच्या ठिकाणी नवीन इमारत बांधली जाणार आहे. यासंदर्भात बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. तळमजल्यावर अग्निशमन केंद्राची वाहने, पहिल्या मजल्यावर संबंधित विभागाचे मुख्य कार्यालय तर दुसºया व तिसºया मजल्यावर ‘क’ प्रभागाचे कार्यालय असेल, असे नियोजन आहे. डोंबिवली केंद्रच्या दुरुस्तीचा प्रस्तावही पाठवला आहे. त्याबाबतही कार्यवाही होईल, असे केडीएमसीचे मुख्य अग्शिमन अधिकारी दिलीप गुंड यांनी सांगितले.

टॅग्स :fireआगkdmcकल्याण डोंबिवली महापालिका