शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

“चलो मंत्रालय”च्या घोषणांनी ठाण्यात आदिवासींची धडक; उद्या मंत्रालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 17:07 IST

आपल्या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा मंत्रालयाकडे रवाना होणार असून आज दिवसभर ठाण्यात ठाण मांडून तो उद्या मुंबई गाठणार आहे.

ठाणे “चलो मंत्रालय” या घोषणांनी आज ठाणे शहर दणाणून गेले. शाहापूरहून निघालेला आदिवासी समाजाचा विशाल मोर्चा आज महामार्गावरील वाहतुकीला चांगलाच अडथळा निर्माण करत ठाण्यात दाखल झाला. आपल्या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा मंत्रालयाकडे रवाना होणार असून आज दिवसभर ठाण्यात ठाण मांडून तो उद्या मुंबई गाठणार आहे.

शाहापूरहून सुरू झालेला हा मोर्चा ठाण्यात येईपर्यंत महामार्गावरील अनेक भागात मोठा ट्रॅफिक जाम झाला. वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे ठाणे वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. तासन्तास कोंडीत अडकलेल्या वाहनांना मार्ग काढून देण्यासाठी पोलिसांना अक्षरशः जीव तोड मेहनत घ्यावी लागली.

मोर्चेकरांनी दुपारचे जेवण कॅडबरी जंक्शनजवळील सर्व्हिस रोडवरील फूटपाथवरच केले. सायंकाळनंतर हा मोर्चा कोपरी येथील आनंदनगर चेक नाक्यावर थांबवण्यात येणार असून, उद्या मंत्रालयावर धडक देण्यासाठी मोर्चेकर रवाना होणार आहेत.

दरम्यान, या मोर्च्याच्या निमित्ताने “उलगुलान जन आक्रोश मोर्चा” या नावाने आवाहन करण्यात आले आहे. १४ सप्टेंबरपासून सुरू झालेला हा मोर्चा १६ सप्टेंबर रोजी मंत्रालयावर धडक देणार आहे. आदिवासी समाजाच्या हक्क, पदभरती, शिक्षण, जात पडताळणी तसेच विविध न्याय्य मागण्यांसाठी राज्यभरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांची यादी तब्बल २६ मुद्द्यांवर आधारित आहे. यामध्ये आदिवासी सल्लागार परिषदेची बैठक घेणे, जात पडताळणी कायद्यात सुधारणा, शासकीय सेवेत प्रलंबित ८५ हजार जागा तात्काळ भरणे, संवर्गीय पदे कायम करणे, रखडलेली पदभरती पूर्ण करणे, आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, बोगस गैरआदिवासींना दिलेली जातवैधता प्रमाणपत्रे रद्द करणे अशा विविध मागण्या आहेत.

मोर्चेकऱ्यांचा संघर्षशील पवित्रा, महामार्गावरील कोंडी आणि वाहतूक पोलिसांची दमछाक पाहता उद्या मंत्रालयाच्या पायऱ्यांवर हा मोर्चा गाजणार हे निश्चित आहे.

टॅग्स :thaneठाणेMantralayaमंत्रालय