शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

“चलो मंत्रालय”च्या घोषणांनी ठाण्यात आदिवासींची धडक; उद्या मंत्रालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 17:07 IST

आपल्या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा मंत्रालयाकडे रवाना होणार असून आज दिवसभर ठाण्यात ठाण मांडून तो उद्या मुंबई गाठणार आहे.

ठाणे “चलो मंत्रालय” या घोषणांनी आज ठाणे शहर दणाणून गेले. शाहापूरहून निघालेला आदिवासी समाजाचा विशाल मोर्चा आज महामार्गावरील वाहतुकीला चांगलाच अडथळा निर्माण करत ठाण्यात दाखल झाला. आपल्या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा मंत्रालयाकडे रवाना होणार असून आज दिवसभर ठाण्यात ठाण मांडून तो उद्या मुंबई गाठणार आहे.

शाहापूरहून सुरू झालेला हा मोर्चा ठाण्यात येईपर्यंत महामार्गावरील अनेक भागात मोठा ट्रॅफिक जाम झाला. वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे ठाणे वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. तासन्तास कोंडीत अडकलेल्या वाहनांना मार्ग काढून देण्यासाठी पोलिसांना अक्षरशः जीव तोड मेहनत घ्यावी लागली.

मोर्चेकरांनी दुपारचे जेवण कॅडबरी जंक्शनजवळील सर्व्हिस रोडवरील फूटपाथवरच केले. सायंकाळनंतर हा मोर्चा कोपरी येथील आनंदनगर चेक नाक्यावर थांबवण्यात येणार असून, उद्या मंत्रालयावर धडक देण्यासाठी मोर्चेकर रवाना होणार आहेत.

दरम्यान, या मोर्च्याच्या निमित्ताने “उलगुलान जन आक्रोश मोर्चा” या नावाने आवाहन करण्यात आले आहे. १४ सप्टेंबरपासून सुरू झालेला हा मोर्चा १६ सप्टेंबर रोजी मंत्रालयावर धडक देणार आहे. आदिवासी समाजाच्या हक्क, पदभरती, शिक्षण, जात पडताळणी तसेच विविध न्याय्य मागण्यांसाठी राज्यभरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांची यादी तब्बल २६ मुद्द्यांवर आधारित आहे. यामध्ये आदिवासी सल्लागार परिषदेची बैठक घेणे, जात पडताळणी कायद्यात सुधारणा, शासकीय सेवेत प्रलंबित ८५ हजार जागा तात्काळ भरणे, संवर्गीय पदे कायम करणे, रखडलेली पदभरती पूर्ण करणे, आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, बोगस गैरआदिवासींना दिलेली जातवैधता प्रमाणपत्रे रद्द करणे अशा विविध मागण्या आहेत.

मोर्चेकऱ्यांचा संघर्षशील पवित्रा, महामार्गावरील कोंडी आणि वाहतूक पोलिसांची दमछाक पाहता उद्या मंत्रालयाच्या पायऱ्यांवर हा मोर्चा गाजणार हे निश्चित आहे.

टॅग्स :thaneठाणेMantralayaमंत्रालय