शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

“चलो मंत्रालय”च्या घोषणांनी ठाण्यात आदिवासींची धडक; उद्या मंत्रालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 17:07 IST

आपल्या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा मंत्रालयाकडे रवाना होणार असून आज दिवसभर ठाण्यात ठाण मांडून तो उद्या मुंबई गाठणार आहे.

ठाणे “चलो मंत्रालय” या घोषणांनी आज ठाणे शहर दणाणून गेले. शाहापूरहून निघालेला आदिवासी समाजाचा विशाल मोर्चा आज महामार्गावरील वाहतुकीला चांगलाच अडथळा निर्माण करत ठाण्यात दाखल झाला. आपल्या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा मंत्रालयाकडे रवाना होणार असून आज दिवसभर ठाण्यात ठाण मांडून तो उद्या मुंबई गाठणार आहे.

शाहापूरहून सुरू झालेला हा मोर्चा ठाण्यात येईपर्यंत महामार्गावरील अनेक भागात मोठा ट्रॅफिक जाम झाला. वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे ठाणे वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. तासन्तास कोंडीत अडकलेल्या वाहनांना मार्ग काढून देण्यासाठी पोलिसांना अक्षरशः जीव तोड मेहनत घ्यावी लागली.

मोर्चेकरांनी दुपारचे जेवण कॅडबरी जंक्शनजवळील सर्व्हिस रोडवरील फूटपाथवरच केले. सायंकाळनंतर हा मोर्चा कोपरी येथील आनंदनगर चेक नाक्यावर थांबवण्यात येणार असून, उद्या मंत्रालयावर धडक देण्यासाठी मोर्चेकर रवाना होणार आहेत.

दरम्यान, या मोर्च्याच्या निमित्ताने “उलगुलान जन आक्रोश मोर्चा” या नावाने आवाहन करण्यात आले आहे. १४ सप्टेंबरपासून सुरू झालेला हा मोर्चा १६ सप्टेंबर रोजी मंत्रालयावर धडक देणार आहे. आदिवासी समाजाच्या हक्क, पदभरती, शिक्षण, जात पडताळणी तसेच विविध न्याय्य मागण्यांसाठी राज्यभरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांची यादी तब्बल २६ मुद्द्यांवर आधारित आहे. यामध्ये आदिवासी सल्लागार परिषदेची बैठक घेणे, जात पडताळणी कायद्यात सुधारणा, शासकीय सेवेत प्रलंबित ८५ हजार जागा तात्काळ भरणे, संवर्गीय पदे कायम करणे, रखडलेली पदभरती पूर्ण करणे, आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, बोगस गैरआदिवासींना दिलेली जातवैधता प्रमाणपत्रे रद्द करणे अशा विविध मागण्या आहेत.

मोर्चेकऱ्यांचा संघर्षशील पवित्रा, महामार्गावरील कोंडी आणि वाहतूक पोलिसांची दमछाक पाहता उद्या मंत्रालयाच्या पायऱ्यांवर हा मोर्चा गाजणार हे निश्चित आहे.

टॅग्स :thaneठाणेMantralayaमंत्रालय