शहरं
Join us  
Trending Stories
1
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
2
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
3
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
4
भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
5
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
6
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
7
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
9
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
10
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
11
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
12
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
13
Supreme Court: भटक्या कुत्र्यांवरील निर्णय ऐकून महिला वकील कोर्टातच ढसाढसा रडली, म्हणाली...
14
‘काँग्रेस म्हणजेच मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस’, रेवंत रेड्डीच्या विधानावरून वाद 
15
घर नावावर कर म्हणत युट्यूबरने आईला मारहाण केली; व्हिडीओही झाला व्हायरल! कोण आहे वंशिका हापूर?
16
Lenskart IPO: लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
17
Samudra Shastra: दातात फट असणारे श्रीमंत असतात? दाताच्या ठेवणीवरून वाचा भाकीत!
18
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
19
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेशी महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
20
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'

विदारक आणि भयंकर परिस्थिती; ठाण्याच्या जवळ राहतो मात्र घोटभर पाण्यासाठी जीव जातो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 05:21 IST

बोअरवेलला मातीचे पाणी, उलट्या, जुलाब, त्वचा विकाराने घराघरात माणसे आजारी

अजित मांडकेठाणे : मुंबई ठाण्यात काय कमी असे राज्यभर वाटते. मात्र या दोन शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या आदिवासी महिलांना कित्येक वर्षापासून डबक्यातील पाणी प्यावे लागत आहे. बोरवेल मधून येणारे पाणी लाल रंगाचे असते. जमिनीतून मिळणाऱ्या पाण्याद्वारे अनेक आजार शरीरात येतात. पुढच्या २५ वर्षाची पाण्याच्या नियोजनाची ब्ल्यू प्रिंट तयार असल्याचा दावा महापालिका करते. त्यात आम्ही कुठे आहोत का? या प्रश्नावर मात्र सरकारकडे उत्तर नाही.

वस्तुस्थिती अत्यंत विदारक आणि भयंकर आहे. डोंगरावरील अत्यंत अरुंद व अवघड वाटेवरून या महिला मागील कित्येक वर्षांपासून डबक्यातील पाणी पीत आहेत. पानखंडा, देवाचा पाडा, बदानी पाडा येथील दीड दोन हजार लोक वस्ती असलेल्या रहिवाशांना पाण्यासाठी तीन बोअरवेलवर अवंलबून आहेत; मात्र त्यांना गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत असून, त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.

या आदिवासी पाड्यांत दीड ते दोन हजारांची लोकवस्ती आहे. कित्येक वर्षांपासून हे रहिवासी पाण्यासाठी लढा देत आहेत. गढूळ पाण्यामुळे लहान मुलांना जुलाब, उलट्या, कावीळ आदी आजारांना सामोरे जावे लागते. महिलांना त्वचा विकारांना सामोरे जावे लागते. बोअरवेलला फडके बांधून पाणी भरले, तरी स्टीलचे हंडे माती साठून आतून लाल झाले आहेत. या भागात शाळा आणि आपला दवाखाना असून, त्यांना देखील बोअरवेलच्या किंवा डबक्यातील पाण्यावर अवंलबून राहावे लागते. बोअरवेल पाणी कमी असल्याने येथील महिलांना डोंगराची वेडीवाकडी वळणे एक किमी चढून पाणी आणावे लागते. येथील वाटा अतिशय धोकादायक आहेत; परंतु महिला आपल्या जीवाची पर्वा न करता डोक्यावर वेळप्रसंगी दोन-दोन हंडे घेऊन पाणी आणत आहेत.

पाण्यासाठी चालढकलदोन वर्षांपूर्वी या भागात शाळेपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली; परंतु त्याला अद्यापही पाणी आले नाही. जाब विचारला तर वनविभाग परवानगी देत नाही असे पालिका सांगते. तर, वन विभाग महापालिकेकडे बोट दाखवते असे ग्रामस्थ सांगतात.

बसची सुविधा नाहीओवळा नाक्यापासून आदिवासी पाड्यावर जाण्यासाठी वाहनाची सुविधा नाही. विद्यार्थी दोन किमी चालत जात नाक्यावरून बस पकडतात. पाड्यामध्ये स्मशानभूमी बांधून दिली जात नसल्याने रहिवाशांना तीन ते चार किमी पायपीट करीत मोघरपाड्याला जावे लागते. जिवंतपणे पाणी नाही आणि मेल्यावर स्मशानभूमी नाही अशी यांची अवस्था आहे.

पानखंडा भागात शाळेपासून पुढील भागात पाण्याची समस्या आहे. या भागात जलवाहिन्या टाकल्या, पाण्याच्या टाक्याही बसविल्या; मात्र वन विभागाची अडचण असल्याने पाणी समस्या मार्गी लागलेली नाही; मात्र पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. - विनोद पवार, उपनगर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, ठामपा

टॅग्स :Waterपाणी