शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

आदिवासीपाड्यांच्या घशाला कोरड; हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 02:25 IST

भिवंडी तालुक्यातील चित्र; टंचाईकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

- रोहिदास पाटील अनगाव: भिवंडी तालुक्यातील कांबे ग्रुपग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील पागीपाडा, वळणाचापाडा, गवणीपाडा, दामूचापाडा या चार आदिवासीपाड्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असून टंचाईकडे भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.ठाणे जिल्हा परिषद व भिवंडी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत येणाºया तालुक्यातील कांबे पंचायतीच्या या पाड्यात ऐन उन्हाळ्यात टंचाई निर्माण झाली आहे. बोअरवेललाही पाणी येत नसल्याने हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाणीपुरवठा विभागाकडे टँकरची मागणी केली आहे. प्रशासनातील अधिकारी मात्र आमच्यापर्यंत तक्रारी आलेल्या नसल्याने पाणीटंचाई नसल्याचा दावा करत असल्यामुळे महिला संतापल्या आहेत.या पाड्यात बोअरवेल आहेत, परंतु पाणी नाही. पागीपाड्यातील बोअरवेलला दूषित पाणी येत असून दुर्गंधीही येते. पर्याय नसल्याने हे पाणी नागरिक पीत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विहीरही कोरडी पडली आहे. कांबेगावामधून पाणी सोडले जाते. पण, ते पाड्यांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे येथील शेकडो आदिवासी कुटुंबांवर टंचाईचे संकट ओढवले आहे. याकडे ना अधिकारी, ना लोकप्रतिनिधी लक्ष देत, अशी व्यथा आदिवासींनी मांडली आहे.एप्रिल महिन्याच्या प्रांरभीच पाणीटंचाई जाणवू लागल्याने भिवंडी पंचायत समिती, पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता, शाखा अभियंता यांना याची माहितीही नाही. दरवर्षी तालुक्यातील गावपाड्यांत पाणीटंचाई निर्माण होते. त्यावेळी नागरिक तक्र ारी करतात, तेव्हाच अधिकाºयांना जाग येते. प्रत्येक गट, गणांसाठी शाखा अभियंत्यांची नेमणूक केली आहे. ते पाड्यांवर फिरून आढावा का घेत नाहीत, सरपंच ग्रामसेवकांकडून पाणीटंचाईचा अहवाल का घेत नाहीत, ग्रामसेवकांनी माहिती दिलेली असते, मात्र येथील अधिकारी त्याकडे का दुर्लक्ष करतात, अशा कामचुकार अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाºयांनी केली आहे. भिवंडी तालुक्यात पाणीटंचाई जाणवत असतानाही अधिकारी मात्र नसल्याचे सांगतात. गेल्यावर्षी ‘लोकमत’ने टंचाईचे वृत्त प्रसिद्ध केल्यावर यंत्रणांची अक्षरश: पळापळ झाली होती.गेल्यावर्षीही तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाणीटंचाईबाबत गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के, पाणीपुरवठा उपअभियंता राऊत, शाखा अभियंता सुदेश भास्करराव यांना निवेदन दिले होते. त्यानंतरही त्यांनी दुर्लक्ष केले होते. अखेर, श्रमजीवी संघटनेने हंडा मोर्चा काढल्यावर अधिकाºयांना जाग आली.- मोतीराम नामकुडा, सचिव, श्रमजीवी संघटनायासंबंधी माहिती घेऊन टंचाईची पाहणी करून ती दूर करण्यात येईल.- अशोक सोनटक्के, गटविकास अधिकारी

टॅग्स :water shortageपाणीटंचाईbhiwandiभिवंडी