शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासीपाड्यांच्या घशाला कोरड; हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 02:25 IST

भिवंडी तालुक्यातील चित्र; टंचाईकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

- रोहिदास पाटील अनगाव: भिवंडी तालुक्यातील कांबे ग्रुपग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील पागीपाडा, वळणाचापाडा, गवणीपाडा, दामूचापाडा या चार आदिवासीपाड्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असून टंचाईकडे भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.ठाणे जिल्हा परिषद व भिवंडी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत येणाºया तालुक्यातील कांबे पंचायतीच्या या पाड्यात ऐन उन्हाळ्यात टंचाई निर्माण झाली आहे. बोअरवेललाही पाणी येत नसल्याने हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाणीपुरवठा विभागाकडे टँकरची मागणी केली आहे. प्रशासनातील अधिकारी मात्र आमच्यापर्यंत तक्रारी आलेल्या नसल्याने पाणीटंचाई नसल्याचा दावा करत असल्यामुळे महिला संतापल्या आहेत.या पाड्यात बोअरवेल आहेत, परंतु पाणी नाही. पागीपाड्यातील बोअरवेलला दूषित पाणी येत असून दुर्गंधीही येते. पर्याय नसल्याने हे पाणी नागरिक पीत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विहीरही कोरडी पडली आहे. कांबेगावामधून पाणी सोडले जाते. पण, ते पाड्यांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे येथील शेकडो आदिवासी कुटुंबांवर टंचाईचे संकट ओढवले आहे. याकडे ना अधिकारी, ना लोकप्रतिनिधी लक्ष देत, अशी व्यथा आदिवासींनी मांडली आहे.एप्रिल महिन्याच्या प्रांरभीच पाणीटंचाई जाणवू लागल्याने भिवंडी पंचायत समिती, पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता, शाखा अभियंता यांना याची माहितीही नाही. दरवर्षी तालुक्यातील गावपाड्यांत पाणीटंचाई निर्माण होते. त्यावेळी नागरिक तक्र ारी करतात, तेव्हाच अधिकाºयांना जाग येते. प्रत्येक गट, गणांसाठी शाखा अभियंत्यांची नेमणूक केली आहे. ते पाड्यांवर फिरून आढावा का घेत नाहीत, सरपंच ग्रामसेवकांकडून पाणीटंचाईचा अहवाल का घेत नाहीत, ग्रामसेवकांनी माहिती दिलेली असते, मात्र येथील अधिकारी त्याकडे का दुर्लक्ष करतात, अशा कामचुकार अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाºयांनी केली आहे. भिवंडी तालुक्यात पाणीटंचाई जाणवत असतानाही अधिकारी मात्र नसल्याचे सांगतात. गेल्यावर्षी ‘लोकमत’ने टंचाईचे वृत्त प्रसिद्ध केल्यावर यंत्रणांची अक्षरश: पळापळ झाली होती.गेल्यावर्षीही तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाणीटंचाईबाबत गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के, पाणीपुरवठा उपअभियंता राऊत, शाखा अभियंता सुदेश भास्करराव यांना निवेदन दिले होते. त्यानंतरही त्यांनी दुर्लक्ष केले होते. अखेर, श्रमजीवी संघटनेने हंडा मोर्चा काढल्यावर अधिकाºयांना जाग आली.- मोतीराम नामकुडा, सचिव, श्रमजीवी संघटनायासंबंधी माहिती घेऊन टंचाईची पाहणी करून ती दूर करण्यात येईल.- अशोक सोनटक्के, गटविकास अधिकारी

टॅग्स :water shortageपाणीटंचाईbhiwandiभिवंडी