शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत विषबाधेने आदिवासी शेतकऱ्याच्या तेरा बकऱ्या मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 14:58 IST

भिवंडी : तालुक्यातील सावंदे गावातील आदिवासी शेतक-याने जोडधंदा म्हणून पाळलेल्या बक-या माळरानावर चरावयास सोडल्या असता, त्यांच्या खाण्यात थायमेट विष ...

ठळक मुद्देसावंदे गावात विषबाधेने तेरा बक-या मृत्यूमुखीशेताच्या बांधावरील थायमेट खाण्यात आल्याने विषबाधासर्प येऊन नये म्हणून बांधावर टाकले जाते थायमेट

भिवंडी : तालुक्यातील सावंदे गावातील आदिवासी शेतक-याने जोडधंदा म्हणून पाळलेल्या बक-या माळरानावर चरावयास सोडल्या असता, त्यांच्या खाण्यात थायमेट विष आल्याने झालेल्या विषबाधेत १३ बक-या मृत्यूमुखी पडल्या. तर अजून चार बक-या अत्यावस्थ स्थितीत शेतक-याच्या घराबाहेर तडफडत आहेत.सावंदे ग्रामपंचायत हद्दीतील दशरथ गणपत भोईर या आदिवासी शेतक-याने शेतीस जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता. सध्या त्यांच्याकडे पंचवीस बक-या असून त्यांनी मागील महिन्यात कोन गावातील बकरी बाजारातून ६५ हजार रु पयांच्या १२ बक-या खरेदी केल्या. नेहमीप्रमाणे त्यांनी काल शनिवारी सायंकाळी घरालगतच्या माळरानावरील शेतात आपल्या बक-या चरावयास सोडल्या होत्या. त्या घरी परतल्या नंतर एका मागून एक बक-या तडफडावयास सुरवात झाली. काही कळण्याआधीच तब्बल १३ बक-या मृत्युमुखी पडल्या असून चार बक-या अत्यवस्थ अवस्थेत स्थितीत आहेत. याची माहिती रात्री उशिरा माजी सरपंच शरद ठाकरे यांना दिल्यावर श्रमजीवी संघटनेचे तालुका पदाधिकारी मोतीराम नामखुडा यांनी घटनास्थळी संपर्क साधल्यावर सकाळी पंचायत समिती पशुधन अधिकारी आर आर पाटील यांनी शेलार पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. पानसरे याना घटनास्थळी उपचारासाठी रवाना केले. त्यांनी केलेल्या पाहणीत या बक-यांना थायमेट या विषारी औषधाची लागण झाल्याचे प्राथमिक निरीक्षणातून नोंदविले आहे.ग्रामिण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावलेल्या भाजीपाल्यावर सर्प येऊ नयेत यासाठी ब-याच ठिकाणी थायमेट या विषारी औषधाची मात्रा बांधावर टाकतात. बक-यांनी चरताना बांधावरील गवत खाताना त्यांच्या खाण्यात थायमेट आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. एकाच वेळी बक-या मेल्याने शेतकरी दशरथ भोईर यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना पंचायत समिती व आदिवासी प्रकल्प,शहापूर मार्फत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी माजी सरपंच शरद ठाकरे यांनी केली आहे .

टॅग्स :BhiwandiभिवंडीDeathमृत्यू