शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

भिवंडीत विषबाधेने आदिवासी शेतकऱ्याच्या तेरा बकऱ्या मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 14:58 IST

भिवंडी : तालुक्यातील सावंदे गावातील आदिवासी शेतक-याने जोडधंदा म्हणून पाळलेल्या बक-या माळरानावर चरावयास सोडल्या असता, त्यांच्या खाण्यात थायमेट विष ...

ठळक मुद्देसावंदे गावात विषबाधेने तेरा बक-या मृत्यूमुखीशेताच्या बांधावरील थायमेट खाण्यात आल्याने विषबाधासर्प येऊन नये म्हणून बांधावर टाकले जाते थायमेट

भिवंडी : तालुक्यातील सावंदे गावातील आदिवासी शेतक-याने जोडधंदा म्हणून पाळलेल्या बक-या माळरानावर चरावयास सोडल्या असता, त्यांच्या खाण्यात थायमेट विष आल्याने झालेल्या विषबाधेत १३ बक-या मृत्यूमुखी पडल्या. तर अजून चार बक-या अत्यावस्थ स्थितीत शेतक-याच्या घराबाहेर तडफडत आहेत.सावंदे ग्रामपंचायत हद्दीतील दशरथ गणपत भोईर या आदिवासी शेतक-याने शेतीस जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता. सध्या त्यांच्याकडे पंचवीस बक-या असून त्यांनी मागील महिन्यात कोन गावातील बकरी बाजारातून ६५ हजार रु पयांच्या १२ बक-या खरेदी केल्या. नेहमीप्रमाणे त्यांनी काल शनिवारी सायंकाळी घरालगतच्या माळरानावरील शेतात आपल्या बक-या चरावयास सोडल्या होत्या. त्या घरी परतल्या नंतर एका मागून एक बक-या तडफडावयास सुरवात झाली. काही कळण्याआधीच तब्बल १३ बक-या मृत्युमुखी पडल्या असून चार बक-या अत्यवस्थ अवस्थेत स्थितीत आहेत. याची माहिती रात्री उशिरा माजी सरपंच शरद ठाकरे यांना दिल्यावर श्रमजीवी संघटनेचे तालुका पदाधिकारी मोतीराम नामखुडा यांनी घटनास्थळी संपर्क साधल्यावर सकाळी पंचायत समिती पशुधन अधिकारी आर आर पाटील यांनी शेलार पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. पानसरे याना घटनास्थळी उपचारासाठी रवाना केले. त्यांनी केलेल्या पाहणीत या बक-यांना थायमेट या विषारी औषधाची लागण झाल्याचे प्राथमिक निरीक्षणातून नोंदविले आहे.ग्रामिण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावलेल्या भाजीपाल्यावर सर्प येऊ नयेत यासाठी ब-याच ठिकाणी थायमेट या विषारी औषधाची मात्रा बांधावर टाकतात. बक-यांनी चरताना बांधावरील गवत खाताना त्यांच्या खाण्यात थायमेट आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. एकाच वेळी बक-या मेल्याने शेतकरी दशरथ भोईर यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना पंचायत समिती व आदिवासी प्रकल्प,शहापूर मार्फत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी माजी सरपंच शरद ठाकरे यांनी केली आहे .

टॅग्स :BhiwandiभिवंडीDeathमृत्यू