शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरांच्या घराला हजारो आदिवासी शेतक-यांचा घेराव

By admin | Updated: October 3, 2016 16:57 IST

आदिवासी शेतकरी, देवस्थान शेतकरी व जंगल निवासी जनतेचे जीवन मरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या घराला

ऑनलाइन लोकमत 

पालघर, दि. 3 - आदिवासी शेतकरी, देवस्थान शेतकरी  व जंगल निवासी जनतेचे जीवन मरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या घराला आज ११ वाजल्या पासून हजारो शेतक-यांनी बेमुदत घेराव घातला आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभा सत्याग्रहाचे नेतृत्व करीत आहे.  सत्याग्रहामुळे वाडा शहराची संपूर्ण कोंडी झाली असून आदिवासी विकास मंत्री यांच्या निवास स्थानाचा शहराशी असलेला संपर्क सत्याग्रही शेतक-यांनी तोडून टाकला आहे.
 
आदिवासी शेतकरी, देवस्थान शेतकरी व जंगल निवासी जनतेचे प्रश्न अत्यंत गंभीर बनले आहेत. आदिवासी भागात बालमृत्यूचे थैमान सुरु आहे. येथील जनता जगण्यासाठी मोठ्या प्रमाणात शहरांकडे व बागायती पटट्याकडे स्थलांतर करीत आहे. दुर्लक्ष व भ्रष्टाचारामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे व युवकांचे शिक्षण व रोजगाराचे प्रश्न अत्यंत तीव्र बनले आहेत. देवस्थान जमीन कसणा-या शेतक-यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेतल्या जात आहेत. आदिवासी विकास विभाग व आदिवासी विकास मंत्री शेतक-यांचे हे प्रश्न अत्यंत असंवेदनशीलपणे हाताळत आहे. परिणामतः जनतेच्या मनात या बाबत अत्यंत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
 
अशा या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नेतृत्वाखाली आदिवासी शेतकरी व देवस्थान शेतक-यांनी दिनांक तीन ऑक्टोबर रोजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या घराला लाखोंच्या संख्येने एकत्र येत बेमुदत महाघेराव घालण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
 
शेतक-यांच्या या महाघेराव सत्याग्रहाला जनवादी महिला संघटना व भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (डी.वाय.एफ.आय.) ने आपला सक्रीय पाठींबा जाहीर केला आहे. महाघेरावच्या तयारीसाठी किसान सभेने राज्यव्यापी जागृती अभियान राबविले होते. राज्यातील आदिवासी बहुल सर्व जिल्ह्यांमध्ये अभियाना अंतर्गत सभा, मेळावे व कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. त्यास प्रतिसाद देत पन्नास हजाराच्या वर आदिवासी शेतकरी, देवस्थान शेतकरी व जंगल निवासी सत्याग्रहात सामील झाले आहेत.  किसान सभेचे केंद्रीय नेते डॉ. अशोक ढवळे, माजी राज्य अध्यक्ष आ.जे.पी.गावीत, जेष्ठ कामगार नेते नरसय्या आडाम, राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉ अजित नवले व कार्याध्यक्ष अर्जुन आडे सिटू कामगार संघटनेचे सरचिटणीस एम.एच.शेख सत्याग्रहाचे नेतृत्व करीत आहेत.
 
महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या  वतीने राज्यभरातील शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नाशिक येथे मार्च महिन्यात भव्य महामुक्काम सत्याग्रह करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्याग्रहाची दखल घेऊन किसान सभेने उपस्थित केलेल्या शेतक-यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने किसान सभेने या महाघेराव सत्याग्रहाची हाक दिली आहे.
 
आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या पालघर जिल्ह्यातील वाडा येथील निवास स्थानाला राज्यभरातून आलेले हजारो शेतक-यांनी  बेमुदत घेराव घातला आहे. सक्षम अधिका-यांना बोलावून मागण्या मान्य केल्या शिवाय सत्याग्रह मागे घेणार नसल्याचे किसान सभेने जाहीर केले आहे.
 
कसत असलेल्या वन जमिनी आदिवासी व जंगल निवासींच्या नांवे करा. वनाधिकार कायद्याची योग्य अंमलबजावणी करा. कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना करा. आदिवासींच्या जमिनी सपाट करून देण्यासाठी असलेल्या पडकई योजने अंतर्गत  कामे केलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या कामाचे पैसे तातडीने  द्या. पडकई योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा.  आदिवासी भागातील धरणाचा उपयोग येथील जनतेला पिण्याचे व सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी करा. शेतकरी कसत असलेली देवस्थान जमीन, वरकस जमीन, कुळाची जमीन कसणारांच्या नांवे करा. सर्व प्रकारच्या शेत जमिनीवरील पीक पाहणी कसणारांच्या नांवे लावा. आदिवासी भागात रेशन, रोजगार, निवारा व शिक्षणाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्या. आदिवासी समुदायामध्ये बिगर आदिवासींना आदिवासी म्हणून घुसविण्याचे षड्यंत्र बंद करा. खोट्या दाखल्यांच्या आधारे आदिवासींच्या सवलती घेणा-यांचा शोध घ्या व त्यांच्यावर कठोर कारवाई करा. आदिवासींमध्ये सर्व प्रकारची घुसखोरी रोखण्यासाठी कठोर व प्रभावी उपाय योजना करा. भात, वरई, नागली, सावा, हिरडा व इतर पिके व वन उपजांना रास्त भाव द्या. सर्व आदिवासींना जातीचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड घर पोहोच उपलब्ध करून द्या, आदिवासी विकास योजनांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी कडक उपाय योजना करा, भ्रष्टाचारांच्या सर्व आरोपांची चौकशी करा. दोषींवर कडक कारवाई करा. योजनांचे लाभार्थी ग्रामसभेत निवडण्याच्या धोरणाची कडक अंमलबजावणी करा आदी मागण्या महाघेराव सत्याग्रहात उपस्थित केल्या गेल्या आहेत.