शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
6
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
7
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
8
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
9
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
10
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
11
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
12
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
13
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
14
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
15
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
16
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
17
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
18
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
19
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
20
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 

आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरांच्या घराला हजारो आदिवासी शेतक-यांचा घेराव

By admin | Updated: October 3, 2016 16:57 IST

आदिवासी शेतकरी, देवस्थान शेतकरी व जंगल निवासी जनतेचे जीवन मरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या घराला

ऑनलाइन लोकमत 

पालघर, दि. 3 - आदिवासी शेतकरी, देवस्थान शेतकरी  व जंगल निवासी जनतेचे जीवन मरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या घराला आज ११ वाजल्या पासून हजारो शेतक-यांनी बेमुदत घेराव घातला आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभा सत्याग्रहाचे नेतृत्व करीत आहे.  सत्याग्रहामुळे वाडा शहराची संपूर्ण कोंडी झाली असून आदिवासी विकास मंत्री यांच्या निवास स्थानाचा शहराशी असलेला संपर्क सत्याग्रही शेतक-यांनी तोडून टाकला आहे.
 
आदिवासी शेतकरी, देवस्थान शेतकरी व जंगल निवासी जनतेचे प्रश्न अत्यंत गंभीर बनले आहेत. आदिवासी भागात बालमृत्यूचे थैमान सुरु आहे. येथील जनता जगण्यासाठी मोठ्या प्रमाणात शहरांकडे व बागायती पटट्याकडे स्थलांतर करीत आहे. दुर्लक्ष व भ्रष्टाचारामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे व युवकांचे शिक्षण व रोजगाराचे प्रश्न अत्यंत तीव्र बनले आहेत. देवस्थान जमीन कसणा-या शेतक-यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेतल्या जात आहेत. आदिवासी विकास विभाग व आदिवासी विकास मंत्री शेतक-यांचे हे प्रश्न अत्यंत असंवेदनशीलपणे हाताळत आहे. परिणामतः जनतेच्या मनात या बाबत अत्यंत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
 
अशा या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नेतृत्वाखाली आदिवासी शेतकरी व देवस्थान शेतक-यांनी दिनांक तीन ऑक्टोबर रोजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या घराला लाखोंच्या संख्येने एकत्र येत बेमुदत महाघेराव घालण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
 
शेतक-यांच्या या महाघेराव सत्याग्रहाला जनवादी महिला संघटना व भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (डी.वाय.एफ.आय.) ने आपला सक्रीय पाठींबा जाहीर केला आहे. महाघेरावच्या तयारीसाठी किसान सभेने राज्यव्यापी जागृती अभियान राबविले होते. राज्यातील आदिवासी बहुल सर्व जिल्ह्यांमध्ये अभियाना अंतर्गत सभा, मेळावे व कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. त्यास प्रतिसाद देत पन्नास हजाराच्या वर आदिवासी शेतकरी, देवस्थान शेतकरी व जंगल निवासी सत्याग्रहात सामील झाले आहेत.  किसान सभेचे केंद्रीय नेते डॉ. अशोक ढवळे, माजी राज्य अध्यक्ष आ.जे.पी.गावीत, जेष्ठ कामगार नेते नरसय्या आडाम, राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉ अजित नवले व कार्याध्यक्ष अर्जुन आडे सिटू कामगार संघटनेचे सरचिटणीस एम.एच.शेख सत्याग्रहाचे नेतृत्व करीत आहेत.
 
महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या  वतीने राज्यभरातील शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नाशिक येथे मार्च महिन्यात भव्य महामुक्काम सत्याग्रह करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्याग्रहाची दखल घेऊन किसान सभेने उपस्थित केलेल्या शेतक-यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने किसान सभेने या महाघेराव सत्याग्रहाची हाक दिली आहे.
 
आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या पालघर जिल्ह्यातील वाडा येथील निवास स्थानाला राज्यभरातून आलेले हजारो शेतक-यांनी  बेमुदत घेराव घातला आहे. सक्षम अधिका-यांना बोलावून मागण्या मान्य केल्या शिवाय सत्याग्रह मागे घेणार नसल्याचे किसान सभेने जाहीर केले आहे.
 
कसत असलेल्या वन जमिनी आदिवासी व जंगल निवासींच्या नांवे करा. वनाधिकार कायद्याची योग्य अंमलबजावणी करा. कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना करा. आदिवासींच्या जमिनी सपाट करून देण्यासाठी असलेल्या पडकई योजने अंतर्गत  कामे केलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या कामाचे पैसे तातडीने  द्या. पडकई योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा.  आदिवासी भागातील धरणाचा उपयोग येथील जनतेला पिण्याचे व सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी करा. शेतकरी कसत असलेली देवस्थान जमीन, वरकस जमीन, कुळाची जमीन कसणारांच्या नांवे करा. सर्व प्रकारच्या शेत जमिनीवरील पीक पाहणी कसणारांच्या नांवे लावा. आदिवासी भागात रेशन, रोजगार, निवारा व शिक्षणाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्या. आदिवासी समुदायामध्ये बिगर आदिवासींना आदिवासी म्हणून घुसविण्याचे षड्यंत्र बंद करा. खोट्या दाखल्यांच्या आधारे आदिवासींच्या सवलती घेणा-यांचा शोध घ्या व त्यांच्यावर कठोर कारवाई करा. आदिवासींमध्ये सर्व प्रकारची घुसखोरी रोखण्यासाठी कठोर व प्रभावी उपाय योजना करा. भात, वरई, नागली, सावा, हिरडा व इतर पिके व वन उपजांना रास्त भाव द्या. सर्व आदिवासींना जातीचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड घर पोहोच उपलब्ध करून द्या, आदिवासी विकास योजनांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी कडक उपाय योजना करा, भ्रष्टाचारांच्या सर्व आरोपांची चौकशी करा. दोषींवर कडक कारवाई करा. योजनांचे लाभार्थी ग्रामसभेत निवडण्याच्या धोरणाची कडक अंमलबजावणी करा आदी मागण्या महाघेराव सत्याग्रहात उपस्थित केल्या गेल्या आहेत.