शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

मीरा-भार्इंदर पालिकेवर आज आदिवासींचा बि-हाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:40 IST

काशिमीरा येथील जनतानगरमध्ये राहणाऱ्या आदिवासींना पालिकेने बीएसयूपी योजनेंतर्गत पक्की घरे देण्याच्या आश्वासनावर त्यांची घरे पाच वर्षांपूर्वी तोडली. त्यांचे तात्पुरते पुनर्वसन पत्र्यांच्या शेडमध्ये केले.

भार्इंदर : काशिमीरा येथील जनतानगरमध्ये राहणाऱ्या आदिवासींना पालिकेने बीएसयूपी योजनेंतर्गत पक्की घरे देण्याच्या आश्वासनावर त्यांची घरे पाच वर्षांपूर्वी तोडली. त्यांचे तात्पुरते पुनर्वसन पत्र्यांच्या शेडमध्ये केले. पालिकेने त्यांना पक्की घरे न दिल्याने अद्याप बेघर ठेवल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आदिवासींचा उद्या बिºहाडी मोर्चा पालिका मुख्यालयावर धडकणार आहे.पालिकेने जनतानगरमधील झोपडपट्टीधारकांना बीएसयूपी योजनेत सामावून घेत त्यांना सुमारे ३६० चौरस फुटांची पक्की घरे देण्यासाठी २००९ पासून योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत गेल्या वर्षी एकच आठ मजली इमारत बांधली असून त्यात १७९ लाभार्थ्यांना प्राधान्यक्रमाने सामावून घेण्यात आले आहे.या योजनेच्या सुरुवातीला अनेक लाभार्थ्यांसह तेथील सुमारे ७० आदिवासी कुटुंबांनी योजनेलाच विरोध दर्शवला होता. परिणामी, योजना रेंगाळू लागली. अखेर, योजनेला हळूहळू प्रतिसाद मिळवण्यात पालिकेला यश आल्यानंतर पाच वर्षांपूर्वी त्या आदिवासी कुटुंबांनीही योजनेला प्रतिसाद दिला. त्यामुळे पालिकेने त्यांची घरे तोडून पत्र्यांच्या सुमारे १०० चौरस फुटांच्या घरात तात्पुरते पुनर्वसन केले. त्यावेळी त्यांना इतर लाभार्थ्यांप्रमाणेच दरमहा भाडे दिले जाईल, असे आश्वासन पालिकेने दिले होते. परंतु, पाच वर्षांत पालिकेने या आदिवासी कुटुंबांना एक छदामही दिला नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यांना त्यांच्या घराच्याच ठिकाणी पक्की घरे बांधून देण्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले होते. त्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या.पालिका लाभार्थी आदिवासींना घराचा करारनामा करून देणार होती. तो करारनामाही अद्याप प्रतीक्षेत असून गेल्या सात ते आठ वर्षांत पालिकेने केवळ एकच इमारत बांधली. त्यातही त्या आदिवासी कुटुंबांना सामावून घेण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली होती. त्यालाही पालिकेने अमान्य केल्याने त्यांची बोळवण केल्याचा आरोप केला जात आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर