शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीची चळवळ हरित क्रांती घडवेल - मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:43 IST

भारताच्या इतिहासातील नवीन विक्रम करणारा आजचा दिवस आहे. वृक्षलागवडीचा कार्यक्रम आता केवळ सरकारचा राहिलेला नसून तो लोकचळवळीचा भाग बनला आहे.

कल्याण : भारताच्या इतिहासातील नवीन विक्रम करणारा आजचा दिवस आहे. वृक्षलागवडीचा कार्यक्रम आता केवळ सरकारचा राहिलेला नसून तो लोकचळवळीचा भाग बनला आहे. भावी पिढीसमोर जल, जंगल, जमीन वाचवण्याचे आव्हान उभे ठाकले असताना वृक्षलागवडीची लोकचळवळ महाराष्ट्रात हरित क्रांती घडवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.१३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेच्या राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम रविवारी कल्याणजवळील वरप येथील राधास्वामी सत्संग आश्रमामागील वनविभागाच्या जागेवर पार पडला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, वनराज्यमंत्री राजे अंबरिश आत्राम, सपना मुनगंटीवार, खासदार कपिल पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, ज्योती कलानी, जि. प. अध्यक्ष मंजूषा जाधव, सद्गुरू जग्गी वासुदेव, सिनेदिग्दर्शक सुभाष घई, आचार्य बाळकृष्ण, मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्पना २०१६ मध्ये मांडण्यात आली. सुरुवातीला इतरांना हे दिवास्वप्न वाटत होते. २०१६ ला तीन कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली. गेल्या वर्षी पाच कोटींपेक्षा अधिक वृक्ष लागले. यंदा १३ कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे; पण त्याहून अधिक वृक्षांची लागवड केली जाईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.वृक्षलागवडीची संकल्पना आता सरकारी राहिलेली नाही, तर ती लोकचळवळ बनली आहे आणि जेव्हा जनतेचे आंदोलन सुरू होते, तेव्हा त्याला कोणीही थांबवू शकत नाही. या चळवळीतूनच हरित महाराष्ट्राचे पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार असल्याचे फडणवीस म्हणाले. केवळ वृक्ष लावून आपण थांबणार नाहीत. दुसऱ्या टप्प्यात जिओ टॅनिंग करण्यात येणार असून प्रामाणिकपणे प्रत्येक रोपाच्या वाढीची नोंद होणार आहे. आता वाढदिवशी आणि मंगलप्रसंगी रोपे लावण्याची प्रथा जनतेमध्ये रुजत आहे, ही चांगल्या बदलाची सुरुवात आहे, असेही फडणवीस म्हणाले.नागरिकच होणार आॅडिटरनुसते खड्डे केले आणि झाडे लावली, असे आता होणार नाही. तुम्ही प्रत्यक्ष व्हिडीओ क्लिप्सद्वारे प्रत्येक कालावधीतील रोपांची वाढ पाहू शकता. एक प्रकारे नागरिकच या मोहिमेचे आॅडिटर असतील, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांतील प्रयत्नांमुळे महाराष्ट्र देशात वनसंपदा वाढवण्यात अग्रेसर ठरत असून २७३ स्कवेअर किलोमीटर वनक्षेत्र वाढले आहे. ५० टक्के मॅन्ग्रोव्हची वाढ झाली असून चार हजार ४६५ स्क्वेअर किमी बांबू क्षेत्र वाढत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.मुनगंटीवार यांचे कौतुकआजपर्यंतच्या सर्व वनमंत्र्यांमध्ये सुधीरभाऊ यांना पहिला क्रमांक दिला पाहिजे. लावलेली झाडे मोठी होताना पाहणे, हे मुनगंटीवार यांच्यासाठी मोठे समाधान असेल, अशा शब्दांत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आपल्या भाषणात मुनगंटीवार यांचा उल्लेख ग्रीन वॉरिअर असा केला. यावेळी सुभाष घई आणि आचार्य बाळकृष्ण यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस