शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
2
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
3
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
4
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
5
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
6
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
7
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
8
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
9
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
10
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
11
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
12
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
13
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
14
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
15
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
16
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीची चळवळ हरित क्रांती घडवेल - मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:43 IST

भारताच्या इतिहासातील नवीन विक्रम करणारा आजचा दिवस आहे. वृक्षलागवडीचा कार्यक्रम आता केवळ सरकारचा राहिलेला नसून तो लोकचळवळीचा भाग बनला आहे.

कल्याण : भारताच्या इतिहासातील नवीन विक्रम करणारा आजचा दिवस आहे. वृक्षलागवडीचा कार्यक्रम आता केवळ सरकारचा राहिलेला नसून तो लोकचळवळीचा भाग बनला आहे. भावी पिढीसमोर जल, जंगल, जमीन वाचवण्याचे आव्हान उभे ठाकले असताना वृक्षलागवडीची लोकचळवळ महाराष्ट्रात हरित क्रांती घडवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.१३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेच्या राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम रविवारी कल्याणजवळील वरप येथील राधास्वामी सत्संग आश्रमामागील वनविभागाच्या जागेवर पार पडला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, वनराज्यमंत्री राजे अंबरिश आत्राम, सपना मुनगंटीवार, खासदार कपिल पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, ज्योती कलानी, जि. प. अध्यक्ष मंजूषा जाधव, सद्गुरू जग्गी वासुदेव, सिनेदिग्दर्शक सुभाष घई, आचार्य बाळकृष्ण, मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्पना २०१६ मध्ये मांडण्यात आली. सुरुवातीला इतरांना हे दिवास्वप्न वाटत होते. २०१६ ला तीन कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली. गेल्या वर्षी पाच कोटींपेक्षा अधिक वृक्ष लागले. यंदा १३ कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे; पण त्याहून अधिक वृक्षांची लागवड केली जाईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.वृक्षलागवडीची संकल्पना आता सरकारी राहिलेली नाही, तर ती लोकचळवळ बनली आहे आणि जेव्हा जनतेचे आंदोलन सुरू होते, तेव्हा त्याला कोणीही थांबवू शकत नाही. या चळवळीतूनच हरित महाराष्ट्राचे पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार असल्याचे फडणवीस म्हणाले. केवळ वृक्ष लावून आपण थांबणार नाहीत. दुसऱ्या टप्प्यात जिओ टॅनिंग करण्यात येणार असून प्रामाणिकपणे प्रत्येक रोपाच्या वाढीची नोंद होणार आहे. आता वाढदिवशी आणि मंगलप्रसंगी रोपे लावण्याची प्रथा जनतेमध्ये रुजत आहे, ही चांगल्या बदलाची सुरुवात आहे, असेही फडणवीस म्हणाले.नागरिकच होणार आॅडिटरनुसते खड्डे केले आणि झाडे लावली, असे आता होणार नाही. तुम्ही प्रत्यक्ष व्हिडीओ क्लिप्सद्वारे प्रत्येक कालावधीतील रोपांची वाढ पाहू शकता. एक प्रकारे नागरिकच या मोहिमेचे आॅडिटर असतील, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांतील प्रयत्नांमुळे महाराष्ट्र देशात वनसंपदा वाढवण्यात अग्रेसर ठरत असून २७३ स्कवेअर किलोमीटर वनक्षेत्र वाढले आहे. ५० टक्के मॅन्ग्रोव्हची वाढ झाली असून चार हजार ४६५ स्क्वेअर किमी बांबू क्षेत्र वाढत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.मुनगंटीवार यांचे कौतुकआजपर्यंतच्या सर्व वनमंत्र्यांमध्ये सुधीरभाऊ यांना पहिला क्रमांक दिला पाहिजे. लावलेली झाडे मोठी होताना पाहणे, हे मुनगंटीवार यांच्यासाठी मोठे समाधान असेल, अशा शब्दांत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आपल्या भाषणात मुनगंटीवार यांचा उल्लेख ग्रीन वॉरिअर असा केला. यावेळी सुभाष घई आणि आचार्य बाळकृष्ण यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस