शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

वृक्ष लागवडीची चळवळ हरित क्रांती घडवेल - मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:43 IST

भारताच्या इतिहासातील नवीन विक्रम करणारा आजचा दिवस आहे. वृक्षलागवडीचा कार्यक्रम आता केवळ सरकारचा राहिलेला नसून तो लोकचळवळीचा भाग बनला आहे.

कल्याण : भारताच्या इतिहासातील नवीन विक्रम करणारा आजचा दिवस आहे. वृक्षलागवडीचा कार्यक्रम आता केवळ सरकारचा राहिलेला नसून तो लोकचळवळीचा भाग बनला आहे. भावी पिढीसमोर जल, जंगल, जमीन वाचवण्याचे आव्हान उभे ठाकले असताना वृक्षलागवडीची लोकचळवळ महाराष्ट्रात हरित क्रांती घडवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.१३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेच्या राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम रविवारी कल्याणजवळील वरप येथील राधास्वामी सत्संग आश्रमामागील वनविभागाच्या जागेवर पार पडला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, वनराज्यमंत्री राजे अंबरिश आत्राम, सपना मुनगंटीवार, खासदार कपिल पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, ज्योती कलानी, जि. प. अध्यक्ष मंजूषा जाधव, सद्गुरू जग्गी वासुदेव, सिनेदिग्दर्शक सुभाष घई, आचार्य बाळकृष्ण, मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्पना २०१६ मध्ये मांडण्यात आली. सुरुवातीला इतरांना हे दिवास्वप्न वाटत होते. २०१६ ला तीन कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली. गेल्या वर्षी पाच कोटींपेक्षा अधिक वृक्ष लागले. यंदा १३ कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे; पण त्याहून अधिक वृक्षांची लागवड केली जाईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.वृक्षलागवडीची संकल्पना आता सरकारी राहिलेली नाही, तर ती लोकचळवळ बनली आहे आणि जेव्हा जनतेचे आंदोलन सुरू होते, तेव्हा त्याला कोणीही थांबवू शकत नाही. या चळवळीतूनच हरित महाराष्ट्राचे पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार असल्याचे फडणवीस म्हणाले. केवळ वृक्ष लावून आपण थांबणार नाहीत. दुसऱ्या टप्प्यात जिओ टॅनिंग करण्यात येणार असून प्रामाणिकपणे प्रत्येक रोपाच्या वाढीची नोंद होणार आहे. आता वाढदिवशी आणि मंगलप्रसंगी रोपे लावण्याची प्रथा जनतेमध्ये रुजत आहे, ही चांगल्या बदलाची सुरुवात आहे, असेही फडणवीस म्हणाले.नागरिकच होणार आॅडिटरनुसते खड्डे केले आणि झाडे लावली, असे आता होणार नाही. तुम्ही प्रत्यक्ष व्हिडीओ क्लिप्सद्वारे प्रत्येक कालावधीतील रोपांची वाढ पाहू शकता. एक प्रकारे नागरिकच या मोहिमेचे आॅडिटर असतील, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांतील प्रयत्नांमुळे महाराष्ट्र देशात वनसंपदा वाढवण्यात अग्रेसर ठरत असून २७३ स्कवेअर किलोमीटर वनक्षेत्र वाढले आहे. ५० टक्के मॅन्ग्रोव्हची वाढ झाली असून चार हजार ४६५ स्क्वेअर किमी बांबू क्षेत्र वाढत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.मुनगंटीवार यांचे कौतुकआजपर्यंतच्या सर्व वनमंत्र्यांमध्ये सुधीरभाऊ यांना पहिला क्रमांक दिला पाहिजे. लावलेली झाडे मोठी होताना पाहणे, हे मुनगंटीवार यांच्यासाठी मोठे समाधान असेल, अशा शब्दांत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आपल्या भाषणात मुनगंटीवार यांचा उल्लेख ग्रीन वॉरिअर असा केला. यावेळी सुभाष घई आणि आचार्य बाळकृष्ण यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस