शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

ठाण्यात वाढतोय चिरलेल्या रेडिमेड भाज्यांचा ट्रेण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 2:42 AM

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ‘रेडी टू कुक’ ही संकल्पना चांगलीच रुजते आहे. पाकिटबंद वस्तुंप्रमाणेच तो ट्रेंड भाज्यांमध्येही दिसून येऊ लागला असून मंडईत मिळणाऱ्या भाज्यांप्रमाणे ठाण्यात काही मोक्याच्या ठिकाणी छान चिरलेल्या भाज्यांची पाकिटे मिळू लागली आहेत.

ठाणे : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ‘रेडी टू कुक’ ही संकल्पना चांगलीच रुजते आहे. पाकिटबंद वस्तुंप्रमाणेच तो ट्रेंड भाज्यांमध्येही दिसून येऊ लागला असून मंडईत मिळणाऱ्या भाज्यांप्रमाणे ठाण्यात काही मोक्याच्या ठिकाणी छान चिरलेल्या भाज्यांची पाकिटे मिळू लागली आहेत. त्यांना ग्राहकांचाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याने त्यासाठी पुढे आलेल्या महिलांचा हुरूप वाढतो आहे. काही तासांतच या भाज्या हातोहात संपत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.या चिरलेल्या, सोललेल्या, कापलेल्या भाज्यांच्या पाकिटासोबतच किसलेले ओले खोबरे, कोशिंबिरीचे साहित्य, चायनीजसाठी वेगळ््या आकारात कापलेल्या भाज्या, सांबारासाठी लागणाºया भाज्यांची पाकिटेही पाहायला मिळतात. त्यामुळे ठाणेकरांच्या बदलत्या खाद्यसवयी यातून दिसतात. नोकरदार स्त्रियांची घर आणि नोकरी सांभाळताना होणारी कसरत लक्षात घेत चिरलेल्या भाज्या, फळांचीही खरेदी करण्याचा ट्रेण्ड वाढतो आहे. ठाणे-डोंबिवलीसारख्या शहरात तो प्रामुख्याने दिसतो. दररोज हॉटेलचे खाणे नको वाटते. बºयाचदा ते परवडतही नाही. स्वत: घरी पदार्थ तयार करायचे असतात. पण सवड मिळत नाही. शिवाय पिशवी घेऊन बाजारात गेल्यावर भाज्या खरेदी करताकरता नाकीनऊ येतात. त्या घरी नेऊन निगुतीने साठवणे, धुवून-चिरुन ठेवण्यास वेळ लागतो. या तारेवरच्या कसरतीतून थोडा ब्रेक घेण्यासाठी स्त्री-पुरूष, ज्येष्ठ नागरिक, एकटे राहणारे चिरलेल्या भाज्यांच्या खरेदीकडे वळू लागले आहेत. यात केवळ फळभाज्याच नव्हे, तर मोड आलेली कडधान्ये, पालेभाज्या, फळेही मिळत आहेत. लोकांच्या गरजांचा विचार करून ही पाकिटे साधारण १५० ग्रॅम, २०० ग्रॅममध्ये मिळतात. साधारण २० ते ३० रुपये असा त्याचा दर आहे. फळे व कोशिंबिरीचे साहित्य साधारण ३० रुपये आणि खोवलेले खोबरे ४० रुपयांना पाकिट या दराने मिळते.सध्या कच्च्या फणसाची अधिक विक्री होते; तर आॅल टाईम फेव्हरेटमध्ये गवार, फरसबी आणि पालेभाज्या जास्त खरेदी केल्या जातात. सूपसाठी मिक्स भाज्या, चायनीजसाठी मिक्स भाज्या आणि सलाडचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होते.कडधान्यामध्ये चवळी, काबुली चणे (छोले), हिरवा वाटाणा, पांढरा वाटाणा, मूग, मटकी, मिश्र कडधान्ये, मसूर, कडवे वाल असे साधारण १५ प्रकार मिळतात. फळांमध्ये पपई, टरबूज, कलिंगड, डाळिंबाचे दाणे; तर कोशिंबिरीसाठी चोचलेली काकडी, गाजर, बीट, सलाड मिळतात. चिरलेल्या फळभाज्यांमध्ये किसलेले गाजर, काकडी, वांगी, भेंडी, कैरी, मुळा, चिरलेला मुळा, फ्लॉवर, कोबी, तोंडली, फरसबी, गवार, लाल भोपळा, सुरण, शेवग्याच्या शेंगा, मक्याचे दाणे, सिमला मिरची उपलब्ध आहेत. सिझननुसार कच्चा फणस, केळफुल मिळते.शिवाय तळण्यासाठी सुरणचे चौकोनी काप, फ्राईड राईससाठी वेगळ््या चिरलेल्या भाज्या; सूपसाठी भाज्या, मशरुम, गाजर, ब्रोकोली व काकडीचे काप मिळतात. सांबारसाठी वांगी, टोमॅटो, लाल भोपळा, दोडका, शेवग्याच्या शेंगांची पाकिटे तयार असतात. चिरलेल्या पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक, चवळी, शेपू, लाल माठ, मायाळू, अळू अशा विविध भाज्यांचे पाकीट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे रवि कुर्डेकर यांनी सांगितले.खोवलेल्या खोबºयाची दिवसाला १०० पाकिटेसंपत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. दररोज साधारण दुपारी तीन-साडेतीनला वाजता या भाज्या विक्रीसाठी उपलब्ध होण्यास सुरूवात होते. पण खरेदीसाठी सायंकाळी पाचनंतर गर्दी होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. या भाज्या सकाळी पुणे, नाशिकवरुन येतात. त्या साफ करून चिरण्याची तयारी सकाळी सहा वाजल्यापासून होते. चिरुन, वजन करुन त्यांचे पॅकिंग केले जाते, असे कुर्डेकर कुटुंबाने सांगितले. यात त्यांना मनोहर कुर्डेकर, मालन तांबे, मंगेश यादव, राजू येन्बर यांचीही मदत होते.ग्राहकांना चिरलेली भाजीत दर्जा आणि स्वच्छता या दोन गोष्टी मिळाल्या, की ते पैशांकडे पाहत नाहीत. आमच्याकडून केवळ ठाणे परिसरातून नव्हे, तर पश्चिम रेल्वेवर राहणारे ग्राहकही आठ दिवसांच्या भाज्या एकदम घेऊन जातात. सध्या प्लास्टिक बंदी केल्याने यापुढे या भाज्या कागदी पिशव्यांमध्ये दिल्या जाणार आहेत.- रवि कुर्डेकरपालिकेने माझे भाजीचे दुकान तोडल्यानंतर उपजीविकेसाठी दुसरे कोणते साधन शोधायचे असा विचार सुरू होता. एरव्ही भाजी खरेदी करताना ग्राहक कोबी-फ्लॉवर कापून मागत, घेवडा साफ करुन द्यायला सांगत ते आठवले. आपणच त्यांना या भाज्या चिरुन, सोलून किंवा कापून द्याव्या असा विचार मनात आला आणि सहा वर्षांपूर्वी तशी विक्री सुरू केली. सुरूवातीला तीन- चार दिवस प्रतिसाद नव्हता. मग त्या भाज्या आम्हीच घरी जाऊन शिजवून खात असू. त्यानंतर हळूहळू प्रतिसाद वाढला. सुरूवातीला या व्यवसायात ३०० रुपयांची गुंतवणूक केली होती. आज तेवढ्या संथ्येची भाज्यांची पाकिटेच असतात. ती सर्व संपतात.- सुरेखा कुर्डेकर

टॅग्स :thaneठाणे