शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

अत्रे कट्ट्यावर उलगडला सामान्यातील असामान्य व्यक्तींच्या कार्याचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 17:21 IST

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रवास उलगडण्यात आला.

ठळक मुद्दे अत्रे कट्ट्यावर उलगडला सामान्यातील असामान्य व्यक्तींच्या कार्याचा प्रवासआचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने मुलाखत अद्वितीय कार्य ठाणेकरांसमोर आणले

ठाणे: अत्रे कट्टयावर ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामान्यातील असामान्य व्यक्तींच्या कार्याचा प्रवास त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडण्यात आला. ठाण्यातील पुरूषोत्तम प्रभू, राजश्री भावे, सुधा गोखले, शंकर आपटे या चारही ज्येष्ठ नागरिक आपल्या या वयातही सामाजिक कायार्ची आवड जोपासत असून ते समाजासाठी कसे धडपडत आहे हे त्यांनी यावेळी अनेक प्रसंग, किस्से आणि अनुभवातून सांगितले.           आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने अत्रे कट्ट्यावर संपदा वागळे यांनी या चारही ज्येष्ठांची मुलाखत घेऊन त्यांचे अद्वितीय कार्य ठाणेकरांसमोर आणले. वृद्धांना घराबाहेरील कामासाठी नेण्यासाठी स्वयंसेवक माया केअर या संस्थेमार्फत पुरविण्यात येतात. या संस्थेत सुधा गोखले यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. गेली दहा वर्षे ते या संस्थेत समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. या माया केअरचा त्यांनी प्रवास उलगडला तसेच, २०१२ पासून चैतन्य वृद्धाश्रमात त्या काम करीत असून तेथील कार्याबद्दलही माहिती दिली. ज्या वृद्धांना मदतीसाठी स्वयंसेवक हवे असल्यास त्यांनी माया केअरशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. राष्ट्रीय पुरस्कारासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा प्रस्ताव दिल्लीला पाठविणाºया शंकर आपटे यांनी त्यांना आलेले अनेक कटु - चांगले अनुभव सांगितले. ठाण्यात काही दिवसांपुर्वी एक महिला स्पीड ब्रेकरवरुन पडली असता तेथील दोन वाहतूक पोलीसांनी तिला मदत केली. अशा पोलीसांना सरकारी योजनेत मदत मिळते हे मला माहित असल्याने त्यांचा सन्मान व्हावा यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या अनेक योजना असतात त्याबद्दल काहींना माहीत असतात तर काहींना नाही आणि ज्यांना माहित असतात ते इतरांना सांगण्याचे कष्टही घेत नसल्याची खंत आपटे यांनी व्यक्त केली. ठाणे पुर्व येथील मरगळीस आलेला विरंगुळा केंद्राचे अध्यक्षपद घेतल्यावर त्या केंद्राला पुनर्जीवन देण्याचे काम केले. त्यानंतर आता अनेक ज्येष्ठांच्या करमणूकीचे कार्यक्रम तेथे होत असून बरेच कट्टेकरी तेथे येतात असे प्रभू यांनी सांगितले. रोज ठाणे ते कल्याण असा प्रवास करीत असताना अनेक लहान मुले हरवितात किंवा अनेकांची महत्त्वाची कागदपत्रे हरवितात, ती सुखरुप पोहोचविण्याचे काम करणाºया भावे यांनी आपल्याला या कामात आलेले अनेक चांगले वाईट प्रसंग सांगितले. तसेच, रस्त्यावर कोपºयात, झाडांच्या आजूबाजूला देवाचे फोटो, मुर्ती, देव्हारे ठेवलेले असतात ते पर्यावरणपद्धतीने विसर्जन केले जाते या कार्याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या हे काम चांगले की वाईट याचा मी कधीच विचार केला नाही. परंतू सुरूवातीला मी हे देव गोळा करीत असताना मला वाटायचे हे देव रस्त्यावर का? सुरूवातीला तीन ते चार वर्षे कल्याण येथील गणेशघाटात विसर्जन करायची. मग पर्यावरण ही संकल्पना राबविली जाऊ लागली, त्यावेळी वाटले आपण हे विसर्जन करताना काही चुकतंय का़? अशा पद्धतीचे विसर्जन पर्यावरणाला घातक असल्याचे लक्षात आल्यावर मग हे देव घरी आणून पर्यावरणपुरक पद्धतीने विसर्जन करु लागले. कोणतेही कार्य करताना वय, वजन, उंची हे आड येत नसते. फक्त तुमचे मन चांगले हवे, प्रामाणिकपणे काम करणे आणि देवाला घाबरता कामा नये.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक