शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडीवर रेल्वेसह जलवाहतुकीचा उतारा; रेल्वेने मालवाहतुकीचे दर केले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:56 IST

उरण येथील जेएनपीटी बंदरातून होणारी अवजड वाहतुकीमुळे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई शहरांत कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

ठाणे : जवाहरलाल नेहरूपोर्ट ट्रस्टमधून होणाऱ्या मालवाहतुकीचा वेग आणि प्रमाण यांच्यातील वाढीचा परिणाम ठाणे शहरातून येजा करणाºया ट्रक व अन्य अवजड वाहनांच्या वाहतुकीवर होत आहे. यावर उपायासाठी केंद्र सरकारमधील रेल्वे, जहाजबांधणी-नौकानयन आणि वाणिज्य ही खाती एकत्र आली आहेत. त्यानुसार, आता मालाची वाहतूक ट्रकऐवजी रेल्वेतून करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली.

पूर्वी होणारा खर्च हा कमी केला असून त्याची अंमलबजावणी तीन ते चार महिन्यांत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण काहीअंशी कमी होईल, असा दावा त्यांनी केला. ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. उरण येथील जेएनपीटी बंदरातून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात मालवाहतूक ही मुंबई-आग्रा तसेच मुंबई-अहमदाबाद या दोन महामार्गांवरून सुरू असते. त्यामुळे नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे शहरात अवजड वाहनांचा भार वाढून कोंडी होत आहे. दिवसेंदिवस या वाहनांच्या संख्येत वाढ होत असून यामुळे शहरांमधील कोंडीची समस्या अधिक बिकट होत आहे. ती सोडविण्यासाठी रेल्वे आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी दिल्लीत एक नुकतीच बैठक घेऊन त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. रेल्वे, जहाजबांधणी-नौकानयन आणि वाणिज्य या तीन विभागांच्या माध्यमांतून शहरातील कोंडी सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.रेल्वेची टनामागे दोन हजार रु पयांची कपातजेएनपीटी बंदरातील मालाची चढउतार करण्यासाठी हाताळणी शुल्क आकारले जाते. रेल्वेचे शुल्क महाग असल्यामुळे व्यापारी ट्रकवाहतुकीला पसंती देतात. रेल्वे मालवाहतुकीला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने या शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. यानुसार, मालगाडीचे शुल्क ट्रक वाहतुकीपेक्षा टनामागे दोन हजार रु पयांनी कमी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.रो-रो वाहतूकसेवेतील अडचणी दूर करणारउरण येथील जेएनपीटी बंदरातून होणारी अवजड वाहतुकीमुळे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई शहरांत कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी कोकण रेल्वेच्या मार्गावर रो-रो वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार असून त्यासाठी मध्यंतरी २०१७ मध्ये वसई ते कोलाडपर्यंत चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. त्या कशा प्रकारे दूर करता येऊ शकतात, याबाबतही बैठकीत चर्चा झाली आहे. त्यानुसार, याला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जलवाहतुकीसाठी मागविले देकारजेएनपीटी बंदरात येणाºया मालाची साठवणूक भिवंडीतील गोदामांमध्ये करण्यात येते. त्यासाठी जेएनपीटी बंदरातून भिवंडीच्या दिशेने अवजड वाहतूक सुरू असते तसेच भिवंडीच्या गोदामातून इतर ठिकाणीही अन्य वाहनांमार्फत वाहतूक सुरू असते. मात्र, नौकानयन विभागाने आता जेएनपीटी ते मुंबई पोर्ट ट्रस्ट या मार्गावर जलवाहतुकीला चालना देण्यासाठी देकार मागविले आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी