शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

वाहतूककोंडीवर रेल्वेसह जलवाहतुकीचा उतारा; रेल्वेने मालवाहतुकीचे दर केले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:56 IST

उरण येथील जेएनपीटी बंदरातून होणारी अवजड वाहतुकीमुळे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई शहरांत कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

ठाणे : जवाहरलाल नेहरूपोर्ट ट्रस्टमधून होणाऱ्या मालवाहतुकीचा वेग आणि प्रमाण यांच्यातील वाढीचा परिणाम ठाणे शहरातून येजा करणाºया ट्रक व अन्य अवजड वाहनांच्या वाहतुकीवर होत आहे. यावर उपायासाठी केंद्र सरकारमधील रेल्वे, जहाजबांधणी-नौकानयन आणि वाणिज्य ही खाती एकत्र आली आहेत. त्यानुसार, आता मालाची वाहतूक ट्रकऐवजी रेल्वेतून करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली.

पूर्वी होणारा खर्च हा कमी केला असून त्याची अंमलबजावणी तीन ते चार महिन्यांत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण काहीअंशी कमी होईल, असा दावा त्यांनी केला. ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. उरण येथील जेएनपीटी बंदरातून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात मालवाहतूक ही मुंबई-आग्रा तसेच मुंबई-अहमदाबाद या दोन महामार्गांवरून सुरू असते. त्यामुळे नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे शहरात अवजड वाहनांचा भार वाढून कोंडी होत आहे. दिवसेंदिवस या वाहनांच्या संख्येत वाढ होत असून यामुळे शहरांमधील कोंडीची समस्या अधिक बिकट होत आहे. ती सोडविण्यासाठी रेल्वे आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी दिल्लीत एक नुकतीच बैठक घेऊन त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. रेल्वे, जहाजबांधणी-नौकानयन आणि वाणिज्य या तीन विभागांच्या माध्यमांतून शहरातील कोंडी सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.रेल्वेची टनामागे दोन हजार रु पयांची कपातजेएनपीटी बंदरातील मालाची चढउतार करण्यासाठी हाताळणी शुल्क आकारले जाते. रेल्वेचे शुल्क महाग असल्यामुळे व्यापारी ट्रकवाहतुकीला पसंती देतात. रेल्वे मालवाहतुकीला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने या शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. यानुसार, मालगाडीचे शुल्क ट्रक वाहतुकीपेक्षा टनामागे दोन हजार रु पयांनी कमी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.रो-रो वाहतूकसेवेतील अडचणी दूर करणारउरण येथील जेएनपीटी बंदरातून होणारी अवजड वाहतुकीमुळे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई शहरांत कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी कोकण रेल्वेच्या मार्गावर रो-रो वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार असून त्यासाठी मध्यंतरी २०१७ मध्ये वसई ते कोलाडपर्यंत चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. त्या कशा प्रकारे दूर करता येऊ शकतात, याबाबतही बैठकीत चर्चा झाली आहे. त्यानुसार, याला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जलवाहतुकीसाठी मागविले देकारजेएनपीटी बंदरात येणाºया मालाची साठवणूक भिवंडीतील गोदामांमध्ये करण्यात येते. त्यासाठी जेएनपीटी बंदरातून भिवंडीच्या दिशेने अवजड वाहतूक सुरू असते तसेच भिवंडीच्या गोदामातून इतर ठिकाणीही अन्य वाहनांमार्फत वाहतूक सुरू असते. मात्र, नौकानयन विभागाने आता जेएनपीटी ते मुंबई पोर्ट ट्रस्ट या मार्गावर जलवाहतुकीला चालना देण्यासाठी देकार मागविले आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी