शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडीवर रेल्वेसह जलवाहतुकीचा उतारा; रेल्वेने मालवाहतुकीचे दर केले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:56 IST

उरण येथील जेएनपीटी बंदरातून होणारी अवजड वाहतुकीमुळे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई शहरांत कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

ठाणे : जवाहरलाल नेहरूपोर्ट ट्रस्टमधून होणाऱ्या मालवाहतुकीचा वेग आणि प्रमाण यांच्यातील वाढीचा परिणाम ठाणे शहरातून येजा करणाºया ट्रक व अन्य अवजड वाहनांच्या वाहतुकीवर होत आहे. यावर उपायासाठी केंद्र सरकारमधील रेल्वे, जहाजबांधणी-नौकानयन आणि वाणिज्य ही खाती एकत्र आली आहेत. त्यानुसार, आता मालाची वाहतूक ट्रकऐवजी रेल्वेतून करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली.

पूर्वी होणारा खर्च हा कमी केला असून त्याची अंमलबजावणी तीन ते चार महिन्यांत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण काहीअंशी कमी होईल, असा दावा त्यांनी केला. ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. उरण येथील जेएनपीटी बंदरातून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात मालवाहतूक ही मुंबई-आग्रा तसेच मुंबई-अहमदाबाद या दोन महामार्गांवरून सुरू असते. त्यामुळे नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे शहरात अवजड वाहनांचा भार वाढून कोंडी होत आहे. दिवसेंदिवस या वाहनांच्या संख्येत वाढ होत असून यामुळे शहरांमधील कोंडीची समस्या अधिक बिकट होत आहे. ती सोडविण्यासाठी रेल्वे आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी दिल्लीत एक नुकतीच बैठक घेऊन त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. रेल्वे, जहाजबांधणी-नौकानयन आणि वाणिज्य या तीन विभागांच्या माध्यमांतून शहरातील कोंडी सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.रेल्वेची टनामागे दोन हजार रु पयांची कपातजेएनपीटी बंदरातील मालाची चढउतार करण्यासाठी हाताळणी शुल्क आकारले जाते. रेल्वेचे शुल्क महाग असल्यामुळे व्यापारी ट्रकवाहतुकीला पसंती देतात. रेल्वे मालवाहतुकीला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने या शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. यानुसार, मालगाडीचे शुल्क ट्रक वाहतुकीपेक्षा टनामागे दोन हजार रु पयांनी कमी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.रो-रो वाहतूकसेवेतील अडचणी दूर करणारउरण येथील जेएनपीटी बंदरातून होणारी अवजड वाहतुकीमुळे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई शहरांत कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी कोकण रेल्वेच्या मार्गावर रो-रो वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार असून त्यासाठी मध्यंतरी २०१७ मध्ये वसई ते कोलाडपर्यंत चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. त्या कशा प्रकारे दूर करता येऊ शकतात, याबाबतही बैठकीत चर्चा झाली आहे. त्यानुसार, याला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जलवाहतुकीसाठी मागविले देकारजेएनपीटी बंदरात येणाºया मालाची साठवणूक भिवंडीतील गोदामांमध्ये करण्यात येते. त्यासाठी जेएनपीटी बंदरातून भिवंडीच्या दिशेने अवजड वाहतूक सुरू असते तसेच भिवंडीच्या गोदामातून इतर ठिकाणीही अन्य वाहनांमार्फत वाहतूक सुरू असते. मात्र, नौकानयन विभागाने आता जेएनपीटी ते मुंबई पोर्ट ट्रस्ट या मार्गावर जलवाहतुकीला चालना देण्यासाठी देकार मागविले आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी