शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

पत्रीपुलावरील वाहतूक ऐन गणेशोत्सवात बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 00:47 IST

१९ ते २४ आॅगस्टदरम्यान, म्हणजे ऐन गणेशोत्सवात सहा दिवस रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

कल्याण : कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा जुना पत्रीपूल पाडल्यानंतर तेथे नवीन पूल उभारण्याचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. या पुलाचा गर्डर ठेवण्यासाठी पत्रीपुलाशेजारील पुलावर भली मोठी क्रेन ठेवून काम केले जाणार आहे. हे काम करण्यासाठी १९ ते २४ आॅगस्टदरम्यान, म्हणजे ऐन गणेशोत्सवात सहा दिवस रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.नवीन पुलाच्या कामामुळे कल्याण-शीळकडे पत्रीपूलमार्गे ये-जा करण्यासाठी कल्याण-भिवंडी बायपास सर्कलनजीक राजनोली नाक्यावर प्रवेश बंद असणार आहे. वाहनांनी खारेगाव टोलनाका, मुंब्रा बायपासमार्गे इच्छीत स्थळी जावे. कल्याण शहरातून कल्याण-शीळमार्गे पत्रीपुलावरून वाहतूक करणाऱ्यांना दुर्गामाता चौक येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने आधारवाडी चौक, खडकपाडा सर्कल, भवानी चौक, नेताजी सुभाष चौक, वालधुनी रेल्वे उड्डाणपुलावरून आनंद दिघे पुलाकडे जाऊन इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.>पूर्व-पश्चिमेला सूचकनाक्याहून जाता येणारकल्याण-नगर रोडवरून पत्रीपुलाकडे जाणाºया वाहनांना नेताजी सुभाष चौकात प्रवेश बंदी असेल. ही वाहने वालधुनी रेल्वे उड्डाणपुलावरून इच्छीत जातील. कल्याण-शीळफाटा रोडवरून कल्याण पूर्व व पश्चिमेकडे वाहतूक करणाºया सर्व प्रकारच्या वाहनांना कल्याण सूचनाका येथे प्रवेश बंदी केली जाणार आहे.कल्याण पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी सर्व वाहने सूचकनाका येथे वळण घेऊन इच्छित स्थळी जातील.कल्याण फाट्याकडून कल्याण पश्चिमेत येणारी वाहने खारेगाव टोलनाक्याकडून इच्छित स्थळी रवाना होतील. ही अधिसूचना वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी काढली आहे. ही अधिसूचना सात दिवस अमलात राहणार आहे.