शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

ठप्प लोकलसेवेमुळे होतेय महामार्गावर वाहतूककोंडी; चाकरमान्यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 1:16 AM

लाखोंच्या संख्येने वाहने रस्त्यांवर, प्रदूषणाच्या पातळीत वाढ

पारोळ : कोरोना महामारीमुळे साडेपाच महिन्यांपासून लोकल सेवा ठप्प असल्याने सामान्य चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. लाखोंनी प्रवासी एकट्या लोकलसेवेमुळे मुंबईत पोहोचवले जातात, मात्र साडेपाच महिन्यांपासून लोकलसेवा ठप्प असल्याने त्याचा भार मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आला आहे. लाखोंच्या संख्येने वाहने महामार्गावर येत असल्याने प्रचंड वाहतूककोंडीचा ताण महामार्गावर येत आहे.

महामार्गावर नेहमीच होत असलेल्या वाहतूककोंडीमुळे कामावर ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांची पुरती दमछाक होऊ लागली आहे. लोकलसेवा कधी सुरू होईल आणि चाकरमान्यांचा जीव कधी भांड्यात पडेल, याचा नेम नसल्याने चाकरमानी धास्तावला आहे. तसेच एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यांवर उतरत असल्याने प्रदूषणाच्या पातळीतदेखील वाढ झाली आहे.

शासनाने लॉकडाऊन शिथिल केले असले तरी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा अद्याप ठप्पच आहे. सेवा ठप्प असल्याने चाकरमान्यांना एस.टी. महामंडळ आणि खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच लॉकडाऊनमुळे बºयाच कर्मचाऱ्यांचे पगार कमी करण्यात आले आहेत. त्यात खाजगी वाहनांनी लांबवरचा प्रवास करताना पगारातील मोठा हिस्सा प्रवासावरखर्च होतो. अशा वेळी उरलेल्या पगारात महिनाभर कुटुंबाचा खर्च भागवण्याची कसरत चाकरमान्यांना करावी लागत आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सध्या वाहतुकीचा प्रचंड ताण येत असल्याने नेहमीच वाहतूककोंडीची समस्या उद्भवू लागली आहे. वाहनांच्या धुरामुळे हवेतील प्रदूषणात वाढ झाली आहे. सुरुवातीला कडक लॉकडाऊन असल्याने प्रदूषणाच्या पातळीचा थर खाली आला होता, मात्र लोकल सेवा ठप्प असल्याने आता पुन्हा वाहनांच्या प्रचंड ताणामुळे महामार्गावरील प्रदूषणात वाढ झाली आहे. तसेच दररोज होत असलेल्या वाहतूककोंडीमुळे कोरोना संसर्गाचा धोकादेखील वाढला आहे. बरेचसे चाकरमानी आपल्याकडील दुचाकी, चारचाकीने मुंबईसारख्या ठिकाणी कामावर जातात. अशा वेळी कामावर लवकर पोहोचण्याच्या बेतात ही मंडळी मिळेल तसा शॉर्टकट मारतात आणि वाहतूककोंडीचे विघ्न वाढवून ठेवतात. महामार्गावरील वाढती प्रचंड वाहतूककोंडी अनेक समस्यांना आव्हान देणारी ठरली आहे.

सद्य:स्थितीत शासनाने लोकलसेवा ठप्पच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने त्याचा फटका चाकरमान्यांना बसत आहे. कामाच्या ठिकाणी जाताना त्यांना अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. लांबवरचा प्रवास असल्याने खर्चदेखील दुप्पट होतो. गंभीर आजाराच्या रुग्णांनादेखील अत्यावश्यक लोकलसेवेत प्रवेश नसल्याने त्यांच्या हालात भर पडत आहे. शासनाने निदान त्यांना तरी लोकलसेवेमध्ये प्रवेश द्यावा. तसेच शासनाला जितक्या लवकरात लवकर लोकल सेवा सुरू करता येईल, तितके ते सर्वसामान्य नागरिकांच्या भल्याचे राहील. तसेच कोरोनावर कधी लस विकसित होईल, ते निश्चित सांगता येत नाही. अशा काळात चाकरमानी बेरोजगार होऊ नये, यासाठी शासनाने वेळीच पावले उचलून लोकलसेवा सुरू केली पाहिजे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी