शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी ठाणे महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या बिकट ; जिप सदस्यांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 17:48 IST

भिवंडी ठाणे महामार्गावर सध्या एमएमआरडीए प्रशासनाच्या वतीने ठाणे भिवंडी कल्याण असे मेट्रोचे काम सुरु आहे . मात्र या मेट्रोच्या कामात कोणतेही नियोजन नसल्याने या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे .

भिवंडी ( दि २५ ) भिवंडीठाणे महामार्गावर सध्या एमएमआरडीए प्रशासनाच्या वतीने ठाणे भिवंडी कल्याण असे मेट्रोचे काम सुरु आहे . मात्र या मेट्रोच्या कामात कोणतेही नियोजन नसल्याने या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे . या वाहतूक कोंडीबाबत स्थानिक नागरिक वारंवार तक्रारी करत आहेत मात्र वाहतूक पोलीस प्रशासनासह या मार्गावर तोल वसुली करणाऱ्या कंपनीचे व एमएमआरडीए प्राधिकरणाचे एकसूत्रीपणा नसल्याने या मार्गावर रोज वाहतूक कोंडी होत आहे.

अनेक विण्यांतल्या अर्ज करूनही या वाहतूक कोंडीवर संबंधित विभागाने कोणताही पर्याय शोधला नसल्याने आजही या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने या वाहतूक कोंडी बाबत ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सपना राजेंद्र भोईर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून येत्या दहा दिवसात या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढला नाही तर स्थानिक महिला व नागरिकांसह कशेळी टोल नाका येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील सपना भोईर यांनी आपल्या लेखी निवेदनात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांना दिला आहे. यावेळी भिवंडी पंचायत समितीच्या सभापती ललिता प्रताप पाटील देखील उपस्थित होत्या.

ठाणे भिवंडी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर गोदाम पट्टा असल्याने या भागात वाहनांची नेहमी ये जा असते . त्यातच भिवंडीतील कानाकोपऱ्यातून नागरिक रोजगारासाठी या मार्गावरून रोज प्रवास करत असतात. तायतच आता कोरोना संकट काही प्रमाणात आटोकयंत आल्याने मुलांच्या शाळा देखील सुरु असल्याने या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर बसत आहे. त्यातच लॉक डाऊन नंतर आता सर्व व्यवस्थापन सुरु झाल्याने या मार्गावर वाहनांची गर्दी वाढली असून रस्त्याच्या मध्यभागी एमएमआरडीए प्राधिकरणाने मेट्रो ट्रेनचे काम हाती घेतले आहे . मात्र हे काम करण्या आधी या रस्त्यावर असलेली अतिक्रमणे हटविणे गरजेचे असतानाची त्याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे . 

या वाहतूक कोंडीने कशेळी, काल्हेर , पूर्णा, राहणाल येथे रोजगारासाठी जाणाऱ्या कामगारांना तसेच भिवंडी ठाणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येल्क सोमोरे जावे लागत आहे . या मार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे मात्र रस्त्यावरील अतिक्रमणे अजूनही हटविली नसल्याने तसेच रस्त्यावर स्थानिक नागरिक तसेच व्यावसायिक आपली वाहने बेदरकारपणे पार्क करून ठेवत असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे . ज्याकडे संबंधित यंत्रणा पुरता डोळेझाक करत आहे. विशेष म्हणजे काल्हेर ते राहनाळ या भागात रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत त्याच बरोबर कोपर ते राहनाळ या भागात रस्त्यावर तोल कंपनीने कोणतेही गटार व्यवस्थापन केले नसल्याने गटाराचे पाणी मुख्य महामार्गावर येत असल्याने या मार्गात चिखल मिश्रित गुडघाभर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे . तर या चिखल मिश्रित पाण्यात दुचाकी स्वार घसरून पडल्याने अनेक अपघात या ठिकाणी होत असल्याने येत्या दहा दिवसात या वाहतूक कोंडीच्या समस्येतून नागरिकांची सुटका केली नाही तर कशेळी टोल नाका येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात ईऊल असा ठाणे जिप सदस्या सपना भोईर यांनी दिला आहे 

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणेTrafficवाहतूक कोंडी