शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

भिवंडी ठाणे महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या बिकट ; जिप सदस्यांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 17:48 IST

भिवंडी ठाणे महामार्गावर सध्या एमएमआरडीए प्रशासनाच्या वतीने ठाणे भिवंडी कल्याण असे मेट्रोचे काम सुरु आहे . मात्र या मेट्रोच्या कामात कोणतेही नियोजन नसल्याने या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे .

भिवंडी ( दि २५ ) भिवंडीठाणे महामार्गावर सध्या एमएमआरडीए प्रशासनाच्या वतीने ठाणे भिवंडी कल्याण असे मेट्रोचे काम सुरु आहे . मात्र या मेट्रोच्या कामात कोणतेही नियोजन नसल्याने या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे . या वाहतूक कोंडीबाबत स्थानिक नागरिक वारंवार तक्रारी करत आहेत मात्र वाहतूक पोलीस प्रशासनासह या मार्गावर तोल वसुली करणाऱ्या कंपनीचे व एमएमआरडीए प्राधिकरणाचे एकसूत्रीपणा नसल्याने या मार्गावर रोज वाहतूक कोंडी होत आहे.

अनेक विण्यांतल्या अर्ज करूनही या वाहतूक कोंडीवर संबंधित विभागाने कोणताही पर्याय शोधला नसल्याने आजही या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने या वाहतूक कोंडी बाबत ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सपना राजेंद्र भोईर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून येत्या दहा दिवसात या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढला नाही तर स्थानिक महिला व नागरिकांसह कशेळी टोल नाका येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील सपना भोईर यांनी आपल्या लेखी निवेदनात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांना दिला आहे. यावेळी भिवंडी पंचायत समितीच्या सभापती ललिता प्रताप पाटील देखील उपस्थित होत्या.

ठाणे भिवंडी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर गोदाम पट्टा असल्याने या भागात वाहनांची नेहमी ये जा असते . त्यातच भिवंडीतील कानाकोपऱ्यातून नागरिक रोजगारासाठी या मार्गावरून रोज प्रवास करत असतात. तायतच आता कोरोना संकट काही प्रमाणात आटोकयंत आल्याने मुलांच्या शाळा देखील सुरु असल्याने या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर बसत आहे. त्यातच लॉक डाऊन नंतर आता सर्व व्यवस्थापन सुरु झाल्याने या मार्गावर वाहनांची गर्दी वाढली असून रस्त्याच्या मध्यभागी एमएमआरडीए प्राधिकरणाने मेट्रो ट्रेनचे काम हाती घेतले आहे . मात्र हे काम करण्या आधी या रस्त्यावर असलेली अतिक्रमणे हटविणे गरजेचे असतानाची त्याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे . 

या वाहतूक कोंडीने कशेळी, काल्हेर , पूर्णा, राहणाल येथे रोजगारासाठी जाणाऱ्या कामगारांना तसेच भिवंडी ठाणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येल्क सोमोरे जावे लागत आहे . या मार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे मात्र रस्त्यावरील अतिक्रमणे अजूनही हटविली नसल्याने तसेच रस्त्यावर स्थानिक नागरिक तसेच व्यावसायिक आपली वाहने बेदरकारपणे पार्क करून ठेवत असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे . ज्याकडे संबंधित यंत्रणा पुरता डोळेझाक करत आहे. विशेष म्हणजे काल्हेर ते राहनाळ या भागात रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत त्याच बरोबर कोपर ते राहनाळ या भागात रस्त्यावर तोल कंपनीने कोणतेही गटार व्यवस्थापन केले नसल्याने गटाराचे पाणी मुख्य महामार्गावर येत असल्याने या मार्गात चिखल मिश्रित गुडघाभर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे . तर या चिखल मिश्रित पाण्यात दुचाकी स्वार घसरून पडल्याने अनेक अपघात या ठिकाणी होत असल्याने येत्या दहा दिवसात या वाहतूक कोंडीच्या समस्येतून नागरिकांची सुटका केली नाही तर कशेळी टोल नाका येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात ईऊल असा ठाणे जिप सदस्या सपना भोईर यांनी दिला आहे 

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणेTrafficवाहतूक कोंडी