शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

पावसाच्या दमदार हजेरीने लोकांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:47 AM

मंगळवारी रात्रभरात १६९ मिमी पाऊस : झाडे उन्मळून पडली, ठिकठिकाणी झाली वाहतूककोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मागील काही दिवसापासून पावसाचा जोर ओसरला होता. मात्र मंगळवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी ८ वाजेपर्यंत शहरात १६९ मिमी पावसाची नोंद झाली तर बुधवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४३ मिमी पाऊस झाला. पावसामुळे शहरातील ठिकठिकाणी पाणी साचले, तीन ठिकाणी वृक्ष तर मुंब्य्रात एका घराची भिंत कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला होता. सांयकाळच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी बरसत होत्या. परंतु हवामान खात्याने २१ आणि २२ सप्टेंबर रोजी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. २२ तारखेला रात्री साडेदहाच्या सुमारास शहरात पाऊस बरसण्यास सुरवात झाली. सुरुवातीला हलक्या सरी बरसत होत्या. मात्र रात्री १२ नंतर पावसाने दमदार हजेरी लावली. रात्री ११.३० ते १२.३० या एका तासात ४५.४७ मिमी पावसाची नोंद झाली. मध्यरात्री १ ते २.३० या काळात ४१.१५ मिमी पाऊस पडला. पहाटे साडेतीननंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. पहाटे ५.३० ते ६.३० या कालावधीत केवळ ५.५९ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी ८.३० पर्यंत १६९.१८ मिमी पावसाची नोंद झाली.

बुधवारी दिवसभर अनेक शहरांत सूर्यदर्शन झाले नव्हते. ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी कोसळत होत्या. संध्याकाळी साडेपाचपर्यंत ४३ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत ठाणे शहरात ३५९९ मिमी पाऊस झाला असून मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत ४३१९.९१ मिमी पाऊस झाला होता. मंगळवारीरात्री पडलेल्या पावसामुळे कळवा स्टेशन जवळील ‘सत्यम शिवम सुदंरम’ इमारतीच्या परिसरात पाणी साचले होते. चिखलवाडी, नौपाडा, राजहंस सोसायटी कळवा, जगदाळे वाडी कोपरी, सिध्दार्थ नगर कोपरी, गणपती मंदिर कोळीवाडा आदी भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. येथील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते, पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या गटारे तुडूंब भरली होती. त्यामुळे पावसाळ््यापूर्वी नालेसफाई केली की, नाही, असा प्रश्न केला जात आहे. मुंब्य्रात एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. तीन ठिकाणी वृक्ष कोसळले. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही.बुधवारी सांयकाळी समुद्राला भरती असल्याने ४.०८ मीटर उंच लाटा उसळणार होत्या.ठाण्यात ठिकठिकाणी साचले पाणी : मुसळधार पावसामुळे बुधवारी शहरात ठिकठिकाणी पाणी साचून वाहनधारकांची प्रचंड गैरसोय झाली. पाणी तुंबल्याचे प्रकार शहरात जवळपास दहा ठिकाणी झाले. धोधो पाऊस आल्याने पुरेशा प्रमाणात पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. परिणामी पाणी रस्त्यांवर तुंबले. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडीही झाली. ठाण्यात पाणी तुंबणार नाही, असा दावा दरवर्षी पालिकेकडून केला जातो. मात्र दरवर्षी हा दावा फोल असल्याचे सिद्ध होते. कोरोना काळातही लोकांकडून कराची अपेक्षा करणाऱ्या महानगरपालिकेने अशा मुलभूत समस्यांपासून लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यापार्श्वभूमीवर होत आहे.पावसाने उभेपीक केले उद्ध्वस्त... अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मांगरूळ, शिरवली आदी ग्रामीण भागात बहरून आलेले भातपीक कापणीच्या आधीच पावसाने पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.