शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

टोरंट कंपनीला मिळणार स्थगिती? ऊर्जामंत्र्यांकडे आज बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 01:25 IST

टोरंट कंपनीला कळवा, मुंब्रा, दिवा, शीळ भागांत प्रवेश देण्यापूर्वी जनसुनावणी घेण्यात यावी, ही आ. जितेंद्र आव्हाड यांची मागणी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मान्य केली आहे.

ठाणे : टोरंट कंपनीला कळवा, मुंब्रा, दिवा, शीळ भागांत प्रवेश देण्यापूर्वी जनसुनावणी घेण्यात यावी, ही आ. जितेंद्र आव्हाड यांची मागणी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मान्य केली आहे. त्यामुळे आता टोरंट कंपनीला स्थगिती मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात येत्या १७ जुलै रोजी ऊर्जामंत्री यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे मंगळवारी होणारे बंद आंदोलन स्थगित केले आहे.कळवा-मुंब्रा, दिवा, शीळ-डायघर परिसरांत वीजवितरणचे खासगीकरण करून टोरंट कंपनी लादली जात आहे. त्याविरोधात राष्ट्रवादीने यापूर्वीही आंदोलन केले होते. कळव्यासह या पट्ट्यातील ग्राहकांनी टोरंटला तीव्र विरोध दाखवल्यानंतरही या विभागाचे खासगीकरण झाले असून टोरंट पॉवर कंपनीला या परिसरात वीजवितरणाचे हक्क पुढील २० वर्षांसाठी देण्यात आले आहेत. या परिसरातील वीजवितरणाचे खाजगीकरण केले जाणार असल्याचे जाहीर केल्यापासून त्याला विरोध केला जात होता. मात्र, हा विरोध डावलून महावितरणने शीळ, मुंब्रा आणि कळवा या परिसरांच्या वीजवितरणाचे काम टोरंट पॉवर कंपनीला पुढील २० वर्षांसाठी दिले आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे. २४ जूनपर्यंत जर टोरंटचा ठेका रद्द केला नाही, तर २५ जून रोजी कळवा-मुंब्रा, दिवा, शीळ-डायघर बंद करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला होता.यासंदर्भात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कळवा-मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान आणि नगरसेवक शानू पठाण यांच्यासमवेत भेट घेऊन जनसुनावणीची मागणी केली होती. त्यावर ऊर्जामंत्र्यांनी ती मान्य केली असून १७ जुलै रोजी एका बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे टोरंट कंपनीला स्थगिती मिळते की आधीचाच निर्णय कायम राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.इशा-यानंतर निर्णयदरम्यान, सरकार जबरदस्ती करणार असेल आणि यातून जर हिंसा झाली, तर त्यास सर्वस्वी सरकारच जबाबदार असेल. म्हणून, सरकारने प्रेमाने संवाद साधावा.सर्व नागरिकांना विश्वासात घ्यावे. त्यांचे म्हणणे ऐकून निर्णय घ्यावा. एकतर्फी निर्णय लादला गेल्यास प्रचंड विरोध करण्यात येईल, असा इशारा आ. आव्हाड यांनी दिला होता.

टॅग्स :electricityवीजthaneठाणे