शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

टोरंट कंपनीला मिळणार स्थगिती? ऊर्जामंत्र्यांकडे आज बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 01:25 IST

टोरंट कंपनीला कळवा, मुंब्रा, दिवा, शीळ भागांत प्रवेश देण्यापूर्वी जनसुनावणी घेण्यात यावी, ही आ. जितेंद्र आव्हाड यांची मागणी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मान्य केली आहे.

ठाणे : टोरंट कंपनीला कळवा, मुंब्रा, दिवा, शीळ भागांत प्रवेश देण्यापूर्वी जनसुनावणी घेण्यात यावी, ही आ. जितेंद्र आव्हाड यांची मागणी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मान्य केली आहे. त्यामुळे आता टोरंट कंपनीला स्थगिती मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात येत्या १७ जुलै रोजी ऊर्जामंत्री यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे मंगळवारी होणारे बंद आंदोलन स्थगित केले आहे.कळवा-मुंब्रा, दिवा, शीळ-डायघर परिसरांत वीजवितरणचे खासगीकरण करून टोरंट कंपनी लादली जात आहे. त्याविरोधात राष्ट्रवादीने यापूर्वीही आंदोलन केले होते. कळव्यासह या पट्ट्यातील ग्राहकांनी टोरंटला तीव्र विरोध दाखवल्यानंतरही या विभागाचे खासगीकरण झाले असून टोरंट पॉवर कंपनीला या परिसरात वीजवितरणाचे हक्क पुढील २० वर्षांसाठी देण्यात आले आहेत. या परिसरातील वीजवितरणाचे खाजगीकरण केले जाणार असल्याचे जाहीर केल्यापासून त्याला विरोध केला जात होता. मात्र, हा विरोध डावलून महावितरणने शीळ, मुंब्रा आणि कळवा या परिसरांच्या वीजवितरणाचे काम टोरंट पॉवर कंपनीला पुढील २० वर्षांसाठी दिले आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे. २४ जूनपर्यंत जर टोरंटचा ठेका रद्द केला नाही, तर २५ जून रोजी कळवा-मुंब्रा, दिवा, शीळ-डायघर बंद करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला होता.यासंदर्भात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कळवा-मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान आणि नगरसेवक शानू पठाण यांच्यासमवेत भेट घेऊन जनसुनावणीची मागणी केली होती. त्यावर ऊर्जामंत्र्यांनी ती मान्य केली असून १७ जुलै रोजी एका बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे टोरंट कंपनीला स्थगिती मिळते की आधीचाच निर्णय कायम राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.इशा-यानंतर निर्णयदरम्यान, सरकार जबरदस्ती करणार असेल आणि यातून जर हिंसा झाली, तर त्यास सर्वस्वी सरकारच जबाबदार असेल. म्हणून, सरकारने प्रेमाने संवाद साधावा.सर्व नागरिकांना विश्वासात घ्यावे. त्यांचे म्हणणे ऐकून निर्णय घ्यावा. एकतर्फी निर्णय लादला गेल्यास प्रचंड विरोध करण्यात येईल, असा इशारा आ. आव्हाड यांनी दिला होता.

टॅग्स :electricityवीजthaneठाणे