शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

टोलमुक्ती आमच्या आंदोलनामुळेच; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 14:18 IST

राज ठाकरे हे खासगी कार्यक्रमानिमित्त ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी ठाण्यातील मामलेदार मिसळची सहकुटुंब चव चाखली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केले. टोलमुक्ती आंदोलन हे काय घरचे सत्यनारायण होते का?, ती लोकांसाठी केलेली गोष्ट होती. त्यामुळे आता टोलमुक्ती झाल्याने सर्वच खूश आहेत.

ठाणे : टोलमुक्ती ही इतकी वर्षे केलेल्या आंदोलनाचे यश असल्याचे मत मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी व्यक्त केले. टोलमुक्तीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर त्यांच्यावर केसेस दाखल होत्या; परंतु आता टोलमुक्ती झाली असल्याने केसेसही मागे घ्यायला हव्यात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

राज ठाकरे हे खासगी कार्यक्रमानिमित्त ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी ठाण्यातील मामलेदार मिसळची सहकुटुंब चव चाखली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केले. टोलमुक्ती आंदोलन हे काय घरचे सत्यनारायण होते का?, ती लोकांसाठी केलेली गोष्ट होती. त्यामुळे आता टोलमुक्ती झाल्याने सर्वच खूश आहेत. त्यामुळे केसेस मागे घेतल्याच पाहिजेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. इतकी वर्षे जी काय टोलधाड पडली होती, त्याला डकैती म्हणता येईल. किती पैसे आले, किती जमा झाले, कोणाकडे आले, काय झाले, कशाचाच कशाला पत्ता नव्हता, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

दुसरीकडे यावेळी भंडार आळीत झालेल्या विनयभंग प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी राज यांची भेट घेऊन निवेदन दिले; तसेच आरोपीला अटक करावी, अशी मागणी केली. यावेळी अशा प्रकारचे कृत्य करणारा माणूस हा कोणत्याही पक्षाचा असू दे, त्याला पंखाखाली घालणे योग्य नसल्याचे मत राज यांनी व्यक्त केले. त्या मुलीचा पुन्हा जबाब घेण्यास मी पोलिसांनी सांगितले असून, तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला अटक करा, अशा सूचनाही पोलिसांना दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेtollplazaटोलनाकाMNSमनसे