शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

टोलमुक्ती आमच्या आंदोलनामुळेच; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 14:18 IST

राज ठाकरे हे खासगी कार्यक्रमानिमित्त ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी ठाण्यातील मामलेदार मिसळची सहकुटुंब चव चाखली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केले. टोलमुक्ती आंदोलन हे काय घरचे सत्यनारायण होते का?, ती लोकांसाठी केलेली गोष्ट होती. त्यामुळे आता टोलमुक्ती झाल्याने सर्वच खूश आहेत.

ठाणे : टोलमुक्ती ही इतकी वर्षे केलेल्या आंदोलनाचे यश असल्याचे मत मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी व्यक्त केले. टोलमुक्तीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर त्यांच्यावर केसेस दाखल होत्या; परंतु आता टोलमुक्ती झाली असल्याने केसेसही मागे घ्यायला हव्यात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

राज ठाकरे हे खासगी कार्यक्रमानिमित्त ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी ठाण्यातील मामलेदार मिसळची सहकुटुंब चव चाखली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केले. टोलमुक्ती आंदोलन हे काय घरचे सत्यनारायण होते का?, ती लोकांसाठी केलेली गोष्ट होती. त्यामुळे आता टोलमुक्ती झाल्याने सर्वच खूश आहेत. त्यामुळे केसेस मागे घेतल्याच पाहिजेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. इतकी वर्षे जी काय टोलधाड पडली होती, त्याला डकैती म्हणता येईल. किती पैसे आले, किती जमा झाले, कोणाकडे आले, काय झाले, कशाचाच कशाला पत्ता नव्हता, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

दुसरीकडे यावेळी भंडार आळीत झालेल्या विनयभंग प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी राज यांची भेट घेऊन निवेदन दिले; तसेच आरोपीला अटक करावी, अशी मागणी केली. यावेळी अशा प्रकारचे कृत्य करणारा माणूस हा कोणत्याही पक्षाचा असू दे, त्याला पंखाखाली घालणे योग्य नसल्याचे मत राज यांनी व्यक्त केले. त्या मुलीचा पुन्हा जबाब घेण्यास मी पोलिसांनी सांगितले असून, तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला अटक करा, अशा सूचनाही पोलिसांना दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेtollplazaटोलनाकाMNSमनसे