शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

टोलमुक्ती आमच्या आंदोलनामुळेच; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 14:18 IST

राज ठाकरे हे खासगी कार्यक्रमानिमित्त ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी ठाण्यातील मामलेदार मिसळची सहकुटुंब चव चाखली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केले. टोलमुक्ती आंदोलन हे काय घरचे सत्यनारायण होते का?, ती लोकांसाठी केलेली गोष्ट होती. त्यामुळे आता टोलमुक्ती झाल्याने सर्वच खूश आहेत.

ठाणे : टोलमुक्ती ही इतकी वर्षे केलेल्या आंदोलनाचे यश असल्याचे मत मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी व्यक्त केले. टोलमुक्तीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर त्यांच्यावर केसेस दाखल होत्या; परंतु आता टोलमुक्ती झाली असल्याने केसेसही मागे घ्यायला हव्यात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

राज ठाकरे हे खासगी कार्यक्रमानिमित्त ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी ठाण्यातील मामलेदार मिसळची सहकुटुंब चव चाखली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केले. टोलमुक्ती आंदोलन हे काय घरचे सत्यनारायण होते का?, ती लोकांसाठी केलेली गोष्ट होती. त्यामुळे आता टोलमुक्ती झाल्याने सर्वच खूश आहेत. त्यामुळे केसेस मागे घेतल्याच पाहिजेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. इतकी वर्षे जी काय टोलधाड पडली होती, त्याला डकैती म्हणता येईल. किती पैसे आले, किती जमा झाले, कोणाकडे आले, काय झाले, कशाचाच कशाला पत्ता नव्हता, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

दुसरीकडे यावेळी भंडार आळीत झालेल्या विनयभंग प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी राज यांची भेट घेऊन निवेदन दिले; तसेच आरोपीला अटक करावी, अशी मागणी केली. यावेळी अशा प्रकारचे कृत्य करणारा माणूस हा कोणत्याही पक्षाचा असू दे, त्याला पंखाखाली घालणे योग्य नसल्याचे मत राज यांनी व्यक्त केले. त्या मुलीचा पुन्हा जबाब घेण्यास मी पोलिसांनी सांगितले असून, तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला अटक करा, अशा सूचनाही पोलिसांना दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेtollplazaटोलनाकाMNSमनसे