शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या लेखकांना हा काळ कळत नाही; ज्येष्ठ लेखक, पत्रकार निळू दामले यांची मुलाखत रंगली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 08:49 IST

कोरम मॉलमध्ये शनिवारी ‘ठाणे साहित्य महोत्सव' सुरु झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आताच्या काळात माझ्यासमोर जे साहित्य येते त्यात आजच्या काळातील साहित्य आणि नाटककारांचे चिंतन मला त्यात दिसत नाही. आजच्या लेखकांना हा काळ कळत नाही, हे कारण असू शकेल. कदाचित हा केवळ लेखकांचा दोष नसेलही. राजकारण, अर्थकारण किंवा समाजाची घडण ज्या कालखंडात घडते त्याचा प्रभाव त्यावर पडतो. त्यामुळेही असे होत असावे, असे मत ज्येष्ठ पत्रकार, लेखक निळू दामले यांनी  ‘ठाणे साहित्य महोत्सवा’त मांडले.   

कोरम मॉलमध्ये शनिवारी सकाळी शं. ना. नवरे सांस्कृतिक मंचावर ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, ज्येष्ठ पत्रकार व लेखक निळू दामले, अभिनेते मंगेश देसाई, ख्यातनाम समीक्षक व लेखक डॉ. अनंत देशमुख, जेव्हीएम स्पेसचे संचालक मंथन मेहता, कोरम मॉलचे प्रमुख विकास लध्धा, ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, ‘लोकमत’चे उपाध्यक्ष विजय शुक्ला यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी या मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून कविवर्य कुसुमाग्रज ग्रंथ दालनातील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

तरुणांच्या हातात त्यांचा काळ राहिलेला नाही तरुण लेखक आपल्याला लिहिताना दिसतात; पण, मला सध्याच्या तरुणांबद्दल दया वाटते. ज्या काळात तरुण सापडलेले आहेत, तो काळ त्यांच्या हातात राहिलेला नाही. या काळाशी कसे जुळवून घ्यावे, हेच तरुणांना समजत नाही. तरुण भारताचे भवितव्य आहे, असे बाेलण्याची फॅशन असली, तरी मला हे भवितव्य फार कठीण दिसते. याचे कारण ज्या पद्धतीने विविध प्रश्नांना तरुण पिढीला तोंड द्यावे लागते, हे प्रश्न यापूर्वी नव्हते. 

 १९९० नंतरचे जग आणि त्यापूर्वीचे जग यामध्ये जमीन - अस्मानाचा फरक आहे. जुन्या गोष्टी वाचून आणि मंथन करून माणसाला काही उपयाेग होईल, अशीही आजची स्थिती नाही.  तुमचे-आमचे जगणे तुमच्या आमच्या हातात नाही. आपली पोरं आणि आई-बाप आपल्या हातात नाहीत, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा अंदाज अजून कोणाला आलेला नाही.

 सगळे विचारवंत थकले आहेत. अशा परिस्थितीत तरुणांबद्दल मला दया येते. काहीतरी करून त्यांनी यातून बाहेर पडावे, असे वाटते. वाचनासारख्या गोष्टीकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. त्यांच्या डोळ्यासमोर एक कोटी आणि दहा लाखांची पॅकेजेस् असतात. त्यांना एक कोटीचे काय करायचे हेच समजत नाही. फ्रान्समध्ये ५६ टक्के लग्न मोडतात. भारतामधील तरुण पिढीत घटस्फोटाचे प्रमाण २० टक्के आहे. पैसे मिळवायचे आणि भांडायचे. हे पैसे कोणावर खर्च करायचे, काय करायचे, असे खूप प्रश्न आहेत. या जीवनसंघर्षात तरुणांचे वाचनाकडे दुर्लक्ष झाले तर त्यात काही नवल नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Lokmatलोकमत