शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

‘बंद’ काळात टीएमटीचे १५ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 06:21 IST

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शहरातही उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. परंतु, काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागल्याने त्यामध्ये दोन दिवसांत ठाणे परिवहन सेवेच्या ११ बसचे नुकसान झाले आहे.

ठाणे - भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शहरातही उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. परंतु, काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागल्याने त्यामध्ये दोन दिवसांत ठाणे परिवहन सेवेच्या ११ बसचे नुकसान झाले आहे. त्यातही प्रशासनाने अद्यापही बसचा विमा न काढल्याने हा खर्च टीएमटीलाच उचलावा लागणार आहे. तसेच बुधवारी बंदच्या काळात परिवहन सेवेचे सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी ठाण्यातही सकाळपासूनच आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला. यातही सकाळी ठाणे परिवहन सेवेमार्फत २५६ बस रस्त्यावर सोडण्यात आल्या होत्या. सकाळी ९ वाजेपर्यंत ही सेवा सुरळीत सुरू होती. परंतु, काही बसेसच्या काचा फोडण्यात आल्याने परिवहनने ११ वाजता बस सोडणे बंद केले. परंतु, या काळात परिवहनच्या ६ बसच्या काचा फोडण्यात आल्या असून यामध्ये दोन बसचे खूप नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. मंगळवारी सायंकाळीदेखील परिवहनच्या पाच बसला टार्गेट करण्यात आले होते. दोन दिवसांत परिवहनच्या ११ बसच्या काचा फोडण्यात आल्या असून यामध्ये जुन्याच बसेसचा समावेश आहे.दरम्यान, या बसचे झालेले नुकसान परिवहनलाच सोसावे लागणार आहे. एका काचेसाठी पाच हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार, हा खर्च लाखांच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, परिवहनने अद्यापही बसचा विमा काढलेला नसल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे. मागील कित्येक वेळेला अशा प्रकारे आंदोलने असोत किंवा इतर काही घटना असोत, अशा वेळी परिवहनच्या बस टार्गेट केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. असे असतानादेखील बसचा अद्यापही विमा काढण्यात आलेला नाही. दुसरीकडे नव्याने घेण्यात आलेल्या बसचा विमा काढण्याचा प्रस्ताव मंजूर जरी झाला असला, तरी त्याची अंमलबजावणी मात्र अद्यापही झालेली नाही.सेवा कोलमडलीबुधवारच्या बंदच्या काळात परिवहनच्या बस सकाळी ११ पासून बंद केल्या होत्या. सायंकाळी ६ वा.नंतर बसेसची सेवा हळूहळू पूर्वपदावर आली. परंतु, तोपर्यंत परिवहनचे १५ लाखांच्या आसपास नुकसान झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदthaneठाणे