शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

‘बंद’ काळात टीएमटीचे १५ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 06:21 IST

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शहरातही उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. परंतु, काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागल्याने त्यामध्ये दोन दिवसांत ठाणे परिवहन सेवेच्या ११ बसचे नुकसान झाले आहे.

ठाणे - भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शहरातही उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. परंतु, काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागल्याने त्यामध्ये दोन दिवसांत ठाणे परिवहन सेवेच्या ११ बसचे नुकसान झाले आहे. त्यातही प्रशासनाने अद्यापही बसचा विमा न काढल्याने हा खर्च टीएमटीलाच उचलावा लागणार आहे. तसेच बुधवारी बंदच्या काळात परिवहन सेवेचे सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी ठाण्यातही सकाळपासूनच आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला. यातही सकाळी ठाणे परिवहन सेवेमार्फत २५६ बस रस्त्यावर सोडण्यात आल्या होत्या. सकाळी ९ वाजेपर्यंत ही सेवा सुरळीत सुरू होती. परंतु, काही बसेसच्या काचा फोडण्यात आल्याने परिवहनने ११ वाजता बस सोडणे बंद केले. परंतु, या काळात परिवहनच्या ६ बसच्या काचा फोडण्यात आल्या असून यामध्ये दोन बसचे खूप नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. मंगळवारी सायंकाळीदेखील परिवहनच्या पाच बसला टार्गेट करण्यात आले होते. दोन दिवसांत परिवहनच्या ११ बसच्या काचा फोडण्यात आल्या असून यामध्ये जुन्याच बसेसचा समावेश आहे.दरम्यान, या बसचे झालेले नुकसान परिवहनलाच सोसावे लागणार आहे. एका काचेसाठी पाच हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार, हा खर्च लाखांच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, परिवहनने अद्यापही बसचा विमा काढलेला नसल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे. मागील कित्येक वेळेला अशा प्रकारे आंदोलने असोत किंवा इतर काही घटना असोत, अशा वेळी परिवहनच्या बस टार्गेट केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. असे असतानादेखील बसचा अद्यापही विमा काढण्यात आलेला नाही. दुसरीकडे नव्याने घेण्यात आलेल्या बसचा विमा काढण्याचा प्रस्ताव मंजूर जरी झाला असला, तरी त्याची अंमलबजावणी मात्र अद्यापही झालेली नाही.सेवा कोलमडलीबुधवारच्या बंदच्या काळात परिवहनच्या बस सकाळी ११ पासून बंद केल्या होत्या. सायंकाळी ६ वा.नंतर बसेसची सेवा हळूहळू पूर्वपदावर आली. परंतु, तोपर्यंत परिवहनचे १५ लाखांच्या आसपास नुकसान झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदthaneठाणे