शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

जीवन प्राधिकरणाच्या आशीर्वादाने टँकर माफियांची चांदी, काँग्रेस शहर अध्यक्षांनी उघड केला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 19:15 IST

अंबरनाथमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि टँकर लॉबीची चांगलीच युती झालेली आहे. 100 ते 200 रुपये जीवन प्राधिकरणाला भरून टँकर चालक संपूर्ण टँकर पाण्याने भरून त्या टँकरची विक्री तीन हजार रुपयांमध्ये करीत आहे.

अंबरनाथ : अंबरनाथमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि टँकर लॉबीची चांगलीच युती झालेली आहे. 100 ते 200 रुपये जीवन प्राधिकरणाला टँकर चालक संपूर्ण टँकर पाण्याने भरून त्या टँकरची विक्री तीन हजार रुपयांमध्ये करीत आहे. हा प्रकार अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनीच उघड केला असून, त्यांनी या टँकर माफियांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. पाटील यांनी हा प्रकार उघड केल्यावर लागलीच टँकच चालकांना जीवन प्राधिकरणाने पाणी देणे बंद केले आहे.अंबरनाथची टँकर लॉबी ही जीवन प्राधिकरणाला अंधारात ठेवत मोठ्या प्रमाणात पाण्याचा व्यवसाय करीत आहे. जीवन प्राधिकरणाच्या पश्चिम भागातील कार्यालयासमोरून पाणी भरून ते पाणी शहरातील सोसायटींना विकण्याचा व्यवसाय करीत आहेत. जीवन प्राधिकरणाला 4 हजार लिटरच्या टँकरसाठी 100 रुपये तर 8 हजाराच्या टँकरसाठी 200 रुपये भरत आहे. हे भरलेले टँकर शहरातील सोसायटींना तब्बल 2 ते 3 हजारांत विकण्याचे काम करीत आहेत.जीवन प्राधिकरणाला या पाण्याच्या मोबदल्यात केवळ 100 रुपये मिळत आहे, तर टँकर मालक प्रत्येक टँकरमागे दीड ते दोन हजार रुपये कमावित आहे. एवढेच नव्हे तर जीवन प्राधिकरणाची जबाबदारी ही सर्व शहराला पाणीपुरवठा करण्याची आहे. त्यातही ज्या भागात पाणीपुरवठा होत नाही त्या भागापुरती पाण्याचे टँकर माफक दरात देणे गरजेचे आहे. मात्र टँकर मालकांनी पाण्याचा मोठा व्यापार तयार केला असून, दररोज एक टँकर पाच ते सहा फे-या मारून मोठ्या प्रमाणात पाण्याचा व्यवसाय करीत आहेत. अंबरनाथ पश्चिम भागात पाणीपुरवठा अनियमित होत असताना टँकर चालकांना मात्र मुबलक पाणी दिले जात आहे.पश्चिम भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची कमतरता भासत असताना टँकर चालकांना मात्र कसे पाणी दिले जाते, याची विचारणा प्रदीप पाटील यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी टँकरला पाणीपुरवठा केला जातो, त्या ठिकाणी पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भेट दिली असता 8 ते 10 टँकर हे पाण्याच्या रांगेत उभे होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात टँकरला पाणी दिले जात असल्याने त्यांनी या प्रकरणाला आक्षेप घेत अधिका-यांना जाब विचारला. ही बाब वरिष्ठ अधिका-यांना कळताच त्यांनी देखील टँकरचा पाणीपुरवठा बंद केला आहे.अंबरनाथ शहराला एमआयडीसी, बॅरेज आणि एमजीपी यांच्याकडून एकूण 62 एमएमडी पाणी पुरवठा करण्यात येत असतो. मात्र शहरात वाढते गृह प्रकल्प आणि त्यामुळे शहराची वाढती लोकसंख्या यामुळे शहरात पाण्याची मोठी मागणी वाढत आहे. त्यामुळे शहरात एकीकडे 72 कोटी रूपयांचा वाढीव पाणी पुरवठा योजनाही शासकीय लाल फीतीच्या कारभारात खोळंबली आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांना आज पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र एकीकडे अपु-या पाणी पुरवठयाचे कारण नागरीकांना एमजीपी देत असली तरी शहरात टँकल लॉबीला मात्र एमजीपीकडून मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येत असतो. अंबरनाथ पश्चिम भागातील एमजीपीच्या बुस्टींग पंपिंग स्टेशनमध्ये 2 लाख 72 हजार लिटर पाण्याचा साठा करण्यात येत असतो. याच केंद्रातून शहरातील पश्चिम भागाला पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र शहरात एकीकडे अनेक भाग पाणी टंचाईने त्नस्त असतांना, या एमजीपीच्या बुस्टींग पंपिग केंद्रातून दिवसाला 50 खासगी टँकरला पाणीपुरवठा करण्यात येत असतो. त्यामुळे एकीकडे शहरातील अनेक रहिवासी भाग पाणीटंचाईने त्रस्त असताना नागरिकांच्या हक्काच्या पाण्यासाठी हा सुरू असलेला बाजार टँकर लॉबीला सदन करण्याचा प्रकार असून, नागरिकांच्या हक्काचे पाणी बांधकाम व्यावसायिकांना पुरवले जात आहे.मात्र शहरातील काही बड्या राजकीय व्यक्तींचे हे सर्व टँकर असल्याने या विरोधात कुणी आवाज उठवत नहीत. माष पाटील यांनी या प्रकरणाला वाचा फोडल्याने टँकर लॉबीला पूर्ण विराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे अधिका-यांना विचारणा केली असता तक्रार येताच टँकरनं पाणीपुरवठा बंद केल्याचे स्पष्ट केले आहे.