शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

रात्री दोन वाजेर्पयत निवडणुकीचे कर्तव्य बजावण-या शिक्षकांना मतदानानंतर हवीय सुटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 17:34 IST

लोकसभेच्या निवडणुकीसाठी 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या आधीच्या दिवसापासूनच शिक्षक व शिक्षकेत्तर शालेय कर्मचा-यांना निवडणूक कामांची जबाबदार चोखपणे पार पाडावी लागते. मतदानाच्या आदल्या दिवशीच त्यांना दिलेल्या मतदान केंद्राचा ताबा घ्यावा लागतो. दिलेले साहित्या जबाबदारीने सांभाळत  त्याच्या जवळच झोपावे लागते.

ठळक मुद्देलोकसभेच्या निवडणुकीसाठी 29 एप्रिल रोजी मतदान त्यानंतर घरी येण्यास बहुतांशी शिक्षकाना 30 एप्रिलची पहाट उजाडणारसतत दोन दिवस कामाचा ताण घेतलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना 30 एप्रिल रोजी सुटी

ठाणे : मतदानाच्या आदल्या दिवसापासून ते मतदान झाल्यानंतरही रात्री सुमारे 2 वाजेर्पयत निवडणूक कामात गुंतून राहणा-या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना   दुस-या दिवशी सुटी देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी  ठाणोसह पालघर, रायगड आदी कोकणातील जिल्ह्यांमधील शिक्षकांनी केली. त्यास अनुसरून ठाणोसह संबंधीत माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिका-यांना लेखी निवेदनाव्दारे साकडे घातले आहे, असे ठाणे  जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले.     लोकसभेच्या निवडणुकीसाठी 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या आधीच्या दिवसापासूनच शिक्षक व शिक्षकेत्तर शालेय कर्मचा-यांना निवडणूक कामांची जबाबदार चोखपणे पार पाडावी लागते. मतदानाच्या आदल्या दिवशीच त्यांना दिलेल्या मतदान केंद्राचा ताबा घ्यावा लागतो. दिलेले साहित्या जबाबदारीने सांभाळत  त्याच्या जवळच झोपावे लागते. जोखमीची ही जबाबदारी संबंधीत शिक्षक, कर्मचा-यांना दुस-या दिवसाच्या मध्यरात्री म्हणजे दोन वाजेर्पयत साहित्य निवडणूक आयोगाकडे जमा होईर्पयत पार पाडावी लागते. त्यानंतर घरी येण्यास बहुतांशी शिक्षकाना 30 एप्रिलची पहाट उजाडणार आहे.यामुळे  सतत दोन दिवस कामाचा ताण घेतलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना 30 एप्रिल रोजी सुटी देणो क्रमप्राप्त होईल, याची शिक्षणाधिका-यांना निवेदनाव्दारे जाणीव करून दिल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. या सुटीसाठी शिक्षणाधिका-यां प्रमाणोच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचे त्यांनी निदर्शनात आणून दिले.    माध्यमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींना निवडणुकीच्या सर्वात महत्वाच्या म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवरील कामासाठी मोठय़ाप्रमाणात घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील सहा हजार 715 मतदान केंद्रांवर सुमारे 47 हजारपेक्षा जास्त कर्मचारी निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे निवडणूक यंत्रणोसाठी लागत आहे. त्यात सर्वाधिक माध्यमिक, प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठय़ाप्रमाणात जबाबदारी पार पडत आहे. मतदान केंद्रांवर दोन दिवस तणावाखाली असणा-या व रात्री उशिरार्पयत जाबाबदारी निवडण-या या शिक्षकांनी ठाणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या नेतृत्वाखाली सुटीची मागणी लावून धरली आहे. यावर प्रशासन काय निर्णय घेणार याकडे त्यांचे लक्ष लागून आहे

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक