शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

ठाणे स्थानकात तिकीट दलालांचा सुळसुळाट; तीन वर्षांत ८६ आरोपी पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 06:43 IST

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून लोंढेच्या लोंढे येताना दिसत आहेत. ते मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात येऊन वास्तव्यात राहत आहेत.

ठाणे : ठाणेरेल्वेस्थानकात परराज्यांत जाणाऱ्या प्रवाशांना कन्फ र्म तिकीट देण्याचे आमिष दाखवून लुटणाºया ८६ दलालांना मागील तीन वर्षांत ठाणे रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) जेरबंद केले आहे. या आकडेवारीवरून ठाणे रेल्वेस्थानकात तिकीट दलालांचा सुळसुळाट असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, तीन वर्षांत केलेल्या कारवाईमुळे आता ठाण्यात एकही तिकीट दलाल नसल्याचा दावा ठाणे आरपीएफने केला आहे. तसेच बिहारमधील प्रवाशांना या तिकीट दलालांनी सर्वाधिक लुटल्याचे दिसून आले आहे.

नोकरीधंद्यांसाठी बºयाच राज्यांतून स्वप्ननगरी असलेल्या मुंबईत गेल्या काही वर्षांपासून लोंढेच्या लोंढे येताना दिसत आहेत. ते मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात येऊन वास्तव्यात राहत आहेत. त्यामुळे मुंबईतून बाहेरगावी येजा करणाºया गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्या गाडीचे कन्फर्म तिकीट नसलेल्या प्रवाशांना लक्ष्य करून हे दलाल त्यांना कन्फर्म तिकीट मिळवून देण्याचे आमिष दाखवून लुटतात. ठाणे रेल्वेस्थानकात मागील तीन वर्षांत अशा ८० घटना समोर आल्या आहे. या घटनांमध्ये ८३ जणांना जेरबंद केले आहे. ही कारवाई ठाणे आरपीएफने केली आहे. यामध्ये २०१७ मध्ये १४ घटनांमध्ये १४ जणांना पकडले आहे. त्यानंतर, २०१८ मध्ये या घटनांत वाढ होऊन ती संख्या ३९ वर गेली आहे. त्या घटनांमध्ये ४० जणांना पकडले आहे. मात्र, २०१९ मध्ये हे प्रमाण पुन्हा कमी करण्यात ठाणे आरपीएफला यश आले आहे. या वर्षभरात २७ घटनांमध्ये ३२ जणांना पकडले. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले जाते.दलालांना बसला ब्रेकबिहार राज्यात येजा करणाºया बºयाच गाड्यांना प्रचंड गर्दी असते. त्यामुळे तिकडील प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. त्यामुळे ते कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी पैसे मोजण्यास तयार असतात. ही बाब लक्षात घेऊन ही मंडळी अव्वाच्या सव्वा पैसे सांगून त्यांना लुटत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वारंवार होणाºया कारवायांमुळे सद्य:स्थितीत ठाण्यात दलालांना आता ब्रेक बसला असून त्यांची रेल्वे प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांशी हातमिळवणी नसल्याचा दावा आरपीएफने केला आहे.

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वे