शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

ठाणे स्थानकात तिकीट दलालांचा सुळसुळाट; तीन वर्षांत ८६ आरोपी पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 06:43 IST

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून लोंढेच्या लोंढे येताना दिसत आहेत. ते मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात येऊन वास्तव्यात राहत आहेत.

ठाणे : ठाणेरेल्वेस्थानकात परराज्यांत जाणाऱ्या प्रवाशांना कन्फ र्म तिकीट देण्याचे आमिष दाखवून लुटणाºया ८६ दलालांना मागील तीन वर्षांत ठाणे रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) जेरबंद केले आहे. या आकडेवारीवरून ठाणे रेल्वेस्थानकात तिकीट दलालांचा सुळसुळाट असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, तीन वर्षांत केलेल्या कारवाईमुळे आता ठाण्यात एकही तिकीट दलाल नसल्याचा दावा ठाणे आरपीएफने केला आहे. तसेच बिहारमधील प्रवाशांना या तिकीट दलालांनी सर्वाधिक लुटल्याचे दिसून आले आहे.

नोकरीधंद्यांसाठी बºयाच राज्यांतून स्वप्ननगरी असलेल्या मुंबईत गेल्या काही वर्षांपासून लोंढेच्या लोंढे येताना दिसत आहेत. ते मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात येऊन वास्तव्यात राहत आहेत. त्यामुळे मुंबईतून बाहेरगावी येजा करणाºया गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्या गाडीचे कन्फर्म तिकीट नसलेल्या प्रवाशांना लक्ष्य करून हे दलाल त्यांना कन्फर्म तिकीट मिळवून देण्याचे आमिष दाखवून लुटतात. ठाणे रेल्वेस्थानकात मागील तीन वर्षांत अशा ८० घटना समोर आल्या आहे. या घटनांमध्ये ८३ जणांना जेरबंद केले आहे. ही कारवाई ठाणे आरपीएफने केली आहे. यामध्ये २०१७ मध्ये १४ घटनांमध्ये १४ जणांना पकडले आहे. त्यानंतर, २०१८ मध्ये या घटनांत वाढ होऊन ती संख्या ३९ वर गेली आहे. त्या घटनांमध्ये ४० जणांना पकडले आहे. मात्र, २०१९ मध्ये हे प्रमाण पुन्हा कमी करण्यात ठाणे आरपीएफला यश आले आहे. या वर्षभरात २७ घटनांमध्ये ३२ जणांना पकडले. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले जाते.दलालांना बसला ब्रेकबिहार राज्यात येजा करणाºया बºयाच गाड्यांना प्रचंड गर्दी असते. त्यामुळे तिकडील प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. त्यामुळे ते कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी पैसे मोजण्यास तयार असतात. ही बाब लक्षात घेऊन ही मंडळी अव्वाच्या सव्वा पैसे सांगून त्यांना लुटत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वारंवार होणाºया कारवायांमुळे सद्य:स्थितीत ठाण्यात दलालांना आता ब्रेक बसला असून त्यांची रेल्वे प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांशी हातमिळवणी नसल्याचा दावा आरपीएफने केला आहे.

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वे