शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कांद्याचे भाव जाणार साठीच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 00:22 IST

कांद्याचा भाव वाढण्यास सुरुवात झाली असून काही दिवसांनी कांद्याचे दर ६० रुपये प्रतिकिलोवर जाण्याची शक्यता असल्याचे कांद्याच्या व्यापाऱ्यांनी सांगितले.

ठाणे : कांद्याचा भाव वाढण्यास सुरुवात झाली असून काही दिवसांनी कांद्याचे दर ६० रुपये प्रतिकिलोवर जाण्याची शक्यता असल्याचे कांद्याच्या व्यापाऱ्यांनी सांगितले. ठाण्यात सध्या कांदा किरकोळ दराने ४० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. दरवाढीच्या भीतीने लोकांनी आतापासूनच कांदा साठवण्यास सुरुवात केली आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने त्याचा परिणाम नवीन येणाºया कांद्याच्या उत्पादनावर होणार आहे. यावर्षी जुना कांदा भरपूर आहे, परंतु पावसाच्या अभावामुळे नवीन कांदा कमी प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच कांद्याचे भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी माल कमी आणि पाऊस जास्त झाल्याने कांदा सडून त्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे गेल्या वर्षीही कांद्याने सर्वसामान्यांना रडवले होते. कांद्याचे दर सत्तरीवर गेले होते, अशी माहिती कांद्याचे व्यापारी संदीप चौधरी यांनी लोकमतला दिली. कांदा महाग होण्याआधी किरकोळ बाजारात २० ते २५ रुपये प्रतिकिलो, तर होलसेल बाजारात कांदा १३ ते १४ रुपये प्रतिकिलोने विकला जात होता. गेल्या काही दिवसांपासून किरकोळ बाजारात ४० रुपये प्रतिकिलो, तर होलसेल बाजारात कांदा २८ ते ३० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. काही दिवसांत कांद्याचे दर पुन्हा वाढणार असून जानेवारीपर्यंत ६० रुपये प्रतिकिलो असे दर राहतील. तसेच, दुसºया राज्यात कांद्याचे उत्पादन झाले, तर महाराष्ट्रात नवीन कांदा येईल आणि जानेवारीनंतर दर कमी होतील, असे चौधरी यांनी सांगितले. कांद्याचे दर वाढतील आणि नवीन कांदा ओला असल्याने त्याला चव नसते, म्हणून एक ते दोन किलो कांदा घेणारे ग्राहक सात ते आठ किलो कांदा घेत आहेत, असे निरीक्षण ठाण्यातील बाजारपेठांतील विक्रेत्यांनी नोंदवले.>ज्या भागांत कांदा पिकतो, तिथे कांद्यांची लागवड कमी झाली आहे. त्यामुळे पुढे उत्पादन कमी होणार असल्याने अर्थात कांद्याचे दर चालू भावापेक्षा २० रुपयांनी वाढतील.- संदीप चौधरी, कांद्याचे व्यापारी

टॅग्स :onionकांदा