शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 02:48 IST

गटबाजीला उधाण : ज्योती कलानींच्या शहर जिल्हाध्यक्षपदाच्या दावेदारीला गंगोत्रींचा विरोध

सदानंद नाईक ।उल्हासनगर : आमदार ज्योती कलानी यांची शहर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाल्यास पक्षाचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असा इशारा पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी दिला आहे. पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना बाजूला सारण्याऐवजी पक्षनेतृत्व पाठीशी घालत असल्याची टीका गंगोत्री यांनी केली.उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिकार कलानी कुटुंबाकडे दिले होते. शहरात राष्ट्रवादी म्हणजे कलानी असे समीकरण झाले होते. मात्र, गेल्या पालिका निवडणुकीत ओमी कलानी यांनी त्याला तडा दिला. पप्पू कलानी याला जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर पक्षाची सूत्रे पडद्याआडून ओमी चालवत होते व ज्योती कलानी या नामधारी शहर जिल्हाध्यक्षा होत्या. ओमी यांनी आपली उमेदवारांची टीम पालिका निवडणुकीत उतरवून भाजपासोबत महाआघाडी केली. ओमी टीमचे नगरसेवक चक्क भाजपाच्या निशाणीवर लढले. गंगोत्री गट सोडून राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते ओमी यांच्यासोबत गेले.ज्योती आमदार असल्याने नावालाच शहराध्यक्ष राहिल्या असून गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी पक्षासाठी काही काम केले नसल्याचा आरोप गंगोत्री यांनी केला. महापालिका प्रभाग क्र.-१७ च्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या सुमन सचदेव यांचा प्रचार न करता, ज्योती यांनी भाजपाच्या तिकिटावर रिंगणात उतरलेल्या साक्षी पमनानी यांचा प्रचार केला. पक्षाचे स्थानिक नगरसेवक सतरामदास जेसवानी यांनी बंडखोरी करून भाजपाच्या साक्षी पमनानी यांचा प्रचार केल्याबद्दल जेसवानी यांचा ज्योती यांनी सत्कार केला. ओमी उल्हासनगरात जे करतात, त्याला ज्योती यांचा आशीर्वाद असल्याचा आरोपही गंगोत्री यांनी केला.ज्योती यांच्या फेरनिवडीचे संकेत?राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्षपदाचे आपण मुख्य दावेदार असल्याचे गंगोत्री यांचे म्हणणे आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल ज्योती कलानी यांच्यावर कारवाईची मागणी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. नवी मुंबईतील एका वरिष्ठ नेत्याने कलानी यांच्याकरिता मोर्चेबांधणी सुरू केल्याने कार्यकारिणीत नाराजी आहे. कलानी यांची फेरनिवड झाल्यास पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देतील, असे स्पष्ट संकेत गंगोत्री यांनी दिले.ओमी यांनी पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात नेऊन उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेसला अस्तित्वहीन केले. काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्ष जिवंत ठेवला असून महापालिकेत राष्ट्रवादीचे चार नगरसेवक निवडून आणले. मात्र, पक्षविरोधी कारवाया करणाºया ज्योती कलानी यांची फेरनिवड केल्यास पक्षाचे शहरातील अस्तित्व संपून जाईल. ही बाब मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणली आहे. - भरत गंगोत्री, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून शहरातील समस्या विधानसभेत मांडण्याचे काम केले आहे. शहर विकास आराखड्यातील त्रुटी, जीन्स कारखान्यांचे प्रदूषण, प्लास्टिक पिशव्याबंदी, बेकायदा बांधकामे आदी प्रश्नांबाबत विधानसभेत आवाज उठवून, पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांचे हात बळकट केले असल्याने शहर जिल्हाध्यक्षपदाच्या स्पर्धेतील आपण मुख्य दावेदार आहोत.- ज्योती कलानी, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस