शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 02:48 IST

गटबाजीला उधाण : ज्योती कलानींच्या शहर जिल्हाध्यक्षपदाच्या दावेदारीला गंगोत्रींचा विरोध

सदानंद नाईक ।उल्हासनगर : आमदार ज्योती कलानी यांची शहर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाल्यास पक्षाचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असा इशारा पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी दिला आहे. पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना बाजूला सारण्याऐवजी पक्षनेतृत्व पाठीशी घालत असल्याची टीका गंगोत्री यांनी केली.उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिकार कलानी कुटुंबाकडे दिले होते. शहरात राष्ट्रवादी म्हणजे कलानी असे समीकरण झाले होते. मात्र, गेल्या पालिका निवडणुकीत ओमी कलानी यांनी त्याला तडा दिला. पप्पू कलानी याला जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर पक्षाची सूत्रे पडद्याआडून ओमी चालवत होते व ज्योती कलानी या नामधारी शहर जिल्हाध्यक्षा होत्या. ओमी यांनी आपली उमेदवारांची टीम पालिका निवडणुकीत उतरवून भाजपासोबत महाआघाडी केली. ओमी टीमचे नगरसेवक चक्क भाजपाच्या निशाणीवर लढले. गंगोत्री गट सोडून राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते ओमी यांच्यासोबत गेले.ज्योती आमदार असल्याने नावालाच शहराध्यक्ष राहिल्या असून गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी पक्षासाठी काही काम केले नसल्याचा आरोप गंगोत्री यांनी केला. महापालिका प्रभाग क्र.-१७ च्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या सुमन सचदेव यांचा प्रचार न करता, ज्योती यांनी भाजपाच्या तिकिटावर रिंगणात उतरलेल्या साक्षी पमनानी यांचा प्रचार केला. पक्षाचे स्थानिक नगरसेवक सतरामदास जेसवानी यांनी बंडखोरी करून भाजपाच्या साक्षी पमनानी यांचा प्रचार केल्याबद्दल जेसवानी यांचा ज्योती यांनी सत्कार केला. ओमी उल्हासनगरात जे करतात, त्याला ज्योती यांचा आशीर्वाद असल्याचा आरोपही गंगोत्री यांनी केला.ज्योती यांच्या फेरनिवडीचे संकेत?राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्षपदाचे आपण मुख्य दावेदार असल्याचे गंगोत्री यांचे म्हणणे आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल ज्योती कलानी यांच्यावर कारवाईची मागणी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. नवी मुंबईतील एका वरिष्ठ नेत्याने कलानी यांच्याकरिता मोर्चेबांधणी सुरू केल्याने कार्यकारिणीत नाराजी आहे. कलानी यांची फेरनिवड झाल्यास पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देतील, असे स्पष्ट संकेत गंगोत्री यांनी दिले.ओमी यांनी पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात नेऊन उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेसला अस्तित्वहीन केले. काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्ष जिवंत ठेवला असून महापालिकेत राष्ट्रवादीचे चार नगरसेवक निवडून आणले. मात्र, पक्षविरोधी कारवाया करणाºया ज्योती कलानी यांची फेरनिवड केल्यास पक्षाचे शहरातील अस्तित्व संपून जाईल. ही बाब मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणली आहे. - भरत गंगोत्री, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून शहरातील समस्या विधानसभेत मांडण्याचे काम केले आहे. शहर विकास आराखड्यातील त्रुटी, जीन्स कारखान्यांचे प्रदूषण, प्लास्टिक पिशव्याबंदी, बेकायदा बांधकामे आदी प्रश्नांबाबत विधानसभेत आवाज उठवून, पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांचे हात बळकट केले असल्याने शहर जिल्हाध्यक्षपदाच्या स्पर्धेतील आपण मुख्य दावेदार आहोत.- ज्योती कलानी, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस