शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

तीन तरुण कवींनी सादर केले त्यांचे वाचनानुभव, कविता आत मुरावी लागते -  गीतेश शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:18 IST

दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर होणारा इंद्रधनुचा शब्दयात्रा हा कार्यक्रम म्हणजे अशा वाचनवेड्यांसाठी एक पर्वणीच असते. यावेळी तीन तरुण कवींनी त्यांचे वाचनानुभव सादर केले.

ठळक मुद्देतीन तरुण कवींनी सादर केले त्यांचे वाचनानुभवकविता आत मुरावी लागते -  गीतेश शिंदेआजचे कवी काय वाचतात उपक्रम

ठाणे : 'कविता आकृती बंधाने लहान असते त्यामुळे वाचून पटकन होते पण तिचे आकलन व्हायला मात्र वेळ लागतो, त्यासाठी ती आत मुरावी लागते' असे प्रतिपादन केले तरुण कवी गीतेश शिंदे यांनी केले. निमित्त होते इंद्रधनु आयोजित शब्दयात्रा अंतर्गत आजचे कवी काय वाचतात या उपक्रमाचे.

वाचनातून आपल्याला मिळालेला आनंद, संवेदना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्याविषयी व्यक्त होण्यासाठी भाषा, विषयाचे कोणतेही बंधन नसलेल्या शब्दयात्रेचा प्रयोग ठाण्यात शिवसमर्थ विद्यालयात येथे आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने आजच्या पिढीतील कवी गीतेश शिंदे, संकेत म्हात्रे, प्रथमेश पाठक यांनी आपल्या भाषणातून त्याच्या वाचन प्रेरणांचा आढावा घेतला. संकेत म्हात्रे यांनी अर्नेस्तो कार्देनाल यांच्या कॉस्मिक कँटिकल या संग्रहावर भाष्य करताना हार्ट क्रेन, चार्ल्स बॉदलेअर या जागतिक कवींचे अनुवादक गणेश कनाटे, भारती बिर्जे डिग्गीकर यांनी केलेले अनुवाद सादर केले. कोणतेही पुस्तक वाचायची एक वेळ यावी लागते. आपण पुस्तकं निवडत नसून पुस्तकं आपली निवड करतात असे यावेळी संकेतने म्हटले. तर गीतेश शिंदे यांनी बालकवींपासून ते थेट अशोक कोतवाल, योगिनी सातारकर-पांडे या जवळपास शंभर वर्षांच्या कालखंडातील मराठी कवींचा आढावा घेत सदानंद रेगे, वसंत आबाजी डहाके, नारायण सुर्वे, द.भा. धामणस्कर, प्रशांत असनारे यांच्या कवितांचे रसग्रहण केले. त्यांनी सादर केलेल्या ठोंबरे, ८ मार्चनंतरची बाई या कवितांना रसिकांची विशेष दाद मिळाली. साठोत्तरी, नव्वदोत्तरी कवितेतील सामाजिक बदल याबद्दल बोलत असतानाच जी.ए., प्रकाश नारायण संत, भालचंद्र नेमाडे, गौरी देशपांडे, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, मोनिका गजेंद्रगडकर यांच्या कथा कादंब-यांचेही अभ्यासपूर्ण दाखले गीतेशने दिले. ‘पिपात मेले ओल्या उंदिर’ आणि ‘रात्र दिव्यांनी पंक्चरलेली’ या मर्ढेकरांच्या गाजलेल्या कवितांचे मतितार्थ प्रथमेश पाठक यांनी सांगत अनंत सामंत यांच्या बेलिंदा, ओश्तोरीज, एम.टी.आयवा मारू ह्या आवडत्या पुस्तकांवर भाष्य केले. तसेच ब्लॉग्स, ई बुक्स, अॉडियो बुक्स, किंडल या माध्यमातूनही बरीच पुस्तकं वाचत असल्याचे सांगत या नव्या माध्यमांकडेही लक्ष वेधले. तर गीतेशने दिवाळी अंकांची साहित्य फराळाची परंपरा विशद करत धुळ्यातून गेली ३३ वर्षे प्रसिद्ध होणा-या कविता रती सारख्या कवितेला समर्पित वाड.मयीन अंकाच्या साहित्य चळवळीविषयी सांगून अशी नियतकालिके टिकवण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. वाचनाच्या आनंदात मनसोक्त विहार करणा-या वाचन वेड्यांसाठी शब्दयात्रेचे व्यासपीठ खुले असल्याची भावना यावेळी इंद्रधनुतर्फे व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई