शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

तीन तरुण कवींनी सादर केले त्यांचे वाचनानुभव, कविता आत मुरावी लागते -  गीतेश शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:18 IST

दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर होणारा इंद्रधनुचा शब्दयात्रा हा कार्यक्रम म्हणजे अशा वाचनवेड्यांसाठी एक पर्वणीच असते. यावेळी तीन तरुण कवींनी त्यांचे वाचनानुभव सादर केले.

ठळक मुद्देतीन तरुण कवींनी सादर केले त्यांचे वाचनानुभवकविता आत मुरावी लागते -  गीतेश शिंदेआजचे कवी काय वाचतात उपक्रम

ठाणे : 'कविता आकृती बंधाने लहान असते त्यामुळे वाचून पटकन होते पण तिचे आकलन व्हायला मात्र वेळ लागतो, त्यासाठी ती आत मुरावी लागते' असे प्रतिपादन केले तरुण कवी गीतेश शिंदे यांनी केले. निमित्त होते इंद्रधनु आयोजित शब्दयात्रा अंतर्गत आजचे कवी काय वाचतात या उपक्रमाचे.

वाचनातून आपल्याला मिळालेला आनंद, संवेदना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्याविषयी व्यक्त होण्यासाठी भाषा, विषयाचे कोणतेही बंधन नसलेल्या शब्दयात्रेचा प्रयोग ठाण्यात शिवसमर्थ विद्यालयात येथे आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने आजच्या पिढीतील कवी गीतेश शिंदे, संकेत म्हात्रे, प्रथमेश पाठक यांनी आपल्या भाषणातून त्याच्या वाचन प्रेरणांचा आढावा घेतला. संकेत म्हात्रे यांनी अर्नेस्तो कार्देनाल यांच्या कॉस्मिक कँटिकल या संग्रहावर भाष्य करताना हार्ट क्रेन, चार्ल्स बॉदलेअर या जागतिक कवींचे अनुवादक गणेश कनाटे, भारती बिर्जे डिग्गीकर यांनी केलेले अनुवाद सादर केले. कोणतेही पुस्तक वाचायची एक वेळ यावी लागते. आपण पुस्तकं निवडत नसून पुस्तकं आपली निवड करतात असे यावेळी संकेतने म्हटले. तर गीतेश शिंदे यांनी बालकवींपासून ते थेट अशोक कोतवाल, योगिनी सातारकर-पांडे या जवळपास शंभर वर्षांच्या कालखंडातील मराठी कवींचा आढावा घेत सदानंद रेगे, वसंत आबाजी डहाके, नारायण सुर्वे, द.भा. धामणस्कर, प्रशांत असनारे यांच्या कवितांचे रसग्रहण केले. त्यांनी सादर केलेल्या ठोंबरे, ८ मार्चनंतरची बाई या कवितांना रसिकांची विशेष दाद मिळाली. साठोत्तरी, नव्वदोत्तरी कवितेतील सामाजिक बदल याबद्दल बोलत असतानाच जी.ए., प्रकाश नारायण संत, भालचंद्र नेमाडे, गौरी देशपांडे, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, मोनिका गजेंद्रगडकर यांच्या कथा कादंब-यांचेही अभ्यासपूर्ण दाखले गीतेशने दिले. ‘पिपात मेले ओल्या उंदिर’ आणि ‘रात्र दिव्यांनी पंक्चरलेली’ या मर्ढेकरांच्या गाजलेल्या कवितांचे मतितार्थ प्रथमेश पाठक यांनी सांगत अनंत सामंत यांच्या बेलिंदा, ओश्तोरीज, एम.टी.आयवा मारू ह्या आवडत्या पुस्तकांवर भाष्य केले. तसेच ब्लॉग्स, ई बुक्स, अॉडियो बुक्स, किंडल या माध्यमातूनही बरीच पुस्तकं वाचत असल्याचे सांगत या नव्या माध्यमांकडेही लक्ष वेधले. तर गीतेशने दिवाळी अंकांची साहित्य फराळाची परंपरा विशद करत धुळ्यातून गेली ३३ वर्षे प्रसिद्ध होणा-या कविता रती सारख्या कवितेला समर्पित वाड.मयीन अंकाच्या साहित्य चळवळीविषयी सांगून अशी नियतकालिके टिकवण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. वाचनाच्या आनंदात मनसोक्त विहार करणा-या वाचन वेड्यांसाठी शब्दयात्रेचे व्यासपीठ खुले असल्याची भावना यावेळी इंद्रधनुतर्फे व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई