शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

आरोग्यसेवेचे वाजले उल्हासनगरमध्ये तीनतेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 3:24 AM

शहराचे आणि तेथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य सृदृढ ठेवण्याची जबाबदारी पालिकेची असते.

- सदानंद नाईकशहराचे आणि तेथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य सृदृढ ठेवण्याची जबाबदारी पालिकेची असते. मात्र, उल्हासनगर पालिकेला याचा विसर पडलेला आहे. केंद्रातील भाजपा सरकार आरोग्यासाठी विविध योजना राबवत आहे. मात्र, उल्हासनगर पालिकेत सत्तेत असलेली भाजपा आरोग्याच्या दृष्टीने कुठलीच पावले उचलताना दिसत नाही. हाच का पारदर्शक कारभार, असा प्रश्न शहरातील नागरिक विचारत आहे.औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या उल्हासनगरमधील आरोग्यसेवा कागदावरच असल्याने शहरच व्हेंटिलेटरवर आहे. नऊ लाख लोकसंख्येसाठी पालिकेचे एकही मोठे रुग्णालय नसून आरोग्याची सर्व मदार आरोग्य केंद्रावर आहे. सहापैकी दोन आरोग्य केंदे्र बंद असून इतरांची दुरवस्था झाली आहे. तेथील चित्र पाहिले तर ही आरोग्य केंदे्र नसून कचराकुंडी वाटावी इतकी तिथे घाण, दुर्गंधी पसरलेली आहे.महापालिकेने अत्याधुनिक व सर्व सुविधा असलेले रूग्णालय उभारण्यासाठी महासभेत अनेकदा प्रस्ताव मंजूर केले. मात्र, रुग्णालयासाठी मंजूर केलेली जागा कालांतराने भूमाफियांनी घशात घातली. सत्ताधाºयांसह विरोधी पक्ष याविरोधात आवाज उठवत नसल्याने रुग्णालय उभे राहू शकले नाही. यातूनच सामान्यांबद्दल नेते, प्रशासन यांना काहीही वाटत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.राज्य सरकारच्या दबावापोटी लोकसंंख्येच्या प्रमाणात महापालिका आरोग्य विभागाने सहा ठिकाणी आरोग्य केंदे्र सुरू केली, तर चार ठिकाणी प्रस्तावित आरोग्य केंदे्र असून काही ठिकाणी केंद्रांच्या इमारतींचे काम सुरू आहे. आरोग्य केंद्रात नागरिकांवर प्राथमिक उपचार केले जातात. सहापैकी दोन आरोग्य केंदे्र तर खंडहर बनली असूनही ते कागदावर सुरू असल्याचे दाखवले जात आहे. राज्य सरकारच्या मध्यवर्ती रुग्णालयामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत आहेत, इतकेच काय ते समाधान. पावसाळ्यात साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवत असते. मात्र, राज्य सरकारच्या कर्मचारी, डॉक्टर व मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. महापालिकेकडे फक्त तीन डॉक्टर, तीन परिचारिका व इतर कर्मचारी स्थायी स्वरूपाचे असून इतर कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका ठोस वेतनावर घेतले आहेत. आरोग्य, औषधखरेदी व आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी सुविधा पुरवण्याचे काम महापालिका आरोग्य विभागाचे आहे. मात्र, विभागाचे बजेट जेमतेम एक ते दीड कोटीचे आहे. एवढ्या कमी बजेटमध्ये शहरातील नऊ लाख लोकसंख्येला कशी आरोग्य सुविधा पुरविणार, हा खरा प्रश्न आहे. पावसाळ्यात आपत्कालीन कक्षाची स्थापना महापालिकेला मध्यवर्ती रुग्णालयात करावी लागते. तसेच इतर सुविधांसाठी मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते, अशी दयनीय अवस्था पालिकेच्या आरोग्य विभागाची झाली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर