शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीन हजार घरे, ४१४ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 06:30 IST

ठाणे महापालिकेने आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली आहेत. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल काही महिन्यांपूर्वीच मंजूर झाला असून उच्च, मध्यम आणि अत्यल्प उत्पन्न गटांसाठी तब्बल तीन हजार घरे बांधली जाणार आहेत.

- अजित मांडकेठाणे  - ठाणे महापालिकेने आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली आहेत. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल काही महिन्यांपूर्वीच मंजूर झाला असून उच्च, मध्यम आणि अत्यल्प उत्पन्न गटांसाठी तब्बल तीन हजार घरे बांधली जाणार आहेत. यासाठी शासनाने दिव्यातील चार ठिकाणी ही योजना कार्यान्वित करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी ४१४.०९ कोटींचा खर्च अपेक्षित असून येत्या महिनाभरात या जागा महापालिकेकडे हस्तांतरित केल्या जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.ठाणे महापालिका हद्दीत यापूर्वी बीएसयूपी योजनेंतर्गत सुमारे नऊ हजार घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ आता प्रधानमंत्री आवास योजनेचा नारळ येत्या काही महिन्यांत वाढवला जाणार आहे.ही योजना पूर्णपणे पीपीपी तत्त्वावर राबवली जाणार असून यासाठी दिव्यातील बेतवडे येथे दोन तसेच म्हातार्डी व डवलेगाव येथे प्रत्येकी एक योजना म्हणजेच चार ठिकाणी या योजनेतून घरे उभारली जाणार आहेत. त्यानुसार, उच्च उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी १०८८, मध्यम उत्पन्न गटासाठी १२८४ आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी ६२८ घरे उभारली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाºयांनी दिली. या योजनेतील दोन जागांचा सर्व्हे जिल्हाधिकारी आणि महापालिकेच्या माध्यमातून नुकताच झाला आहे. लवकरच, सर्व्हेनुसार या जागा महापालिकेकडे हस्तांतरित केल्या जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.तर, उर्वरित जागांचादेखील सर्व्हे करून त्यादेखील पालिकेकडे हस्तांतरित केल्या जाणार आहेत. २८ मार्च २०१६ रोजी महासभेने या योजनेला मंजुरी दिली आहे. तसेच ९ जून २०१७ रोजी राज्य शासनाच्या सुकाणू समिती आणि केंद्र सरकारच्या समितीनेदेखील या योजनेला मंजुरी दिली आहे.दरम्यान, पीपीपी म्हणजे प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपअंतर्गत ही योजना राबवली जाणार असल्याने तिचा आर्थिक भार हा पालिकेला सहन करावा लागणार नसून यामुळे लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध होणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.या घरांच्या किमतीदेखील म्हाडा योजनेनुसारच निश्चित केल्या जाणार असून उत्पन्न गटही त्यानुसारच ठरवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या योजनेसाठी प्रतिघरासाठी राज्य शासनाकडून एक लाख आणि केंद्र शासनाकडून १.५० लाखाचे अनुदानदेखील उपलब्ध होणार आहे. त्यानुसार, लवकरात लवकर ती राबवण्याच्या दृष्टीने पालिकेने आता जोरदार हालचाली सुरूकेल्या आहेत.यापूर्वी ही योजना स्थानिक स्वराज्य संस्थांनाच राबवण्याची संधी उपलब्ध होत होती. परंतु, आता तिची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी शासनाने नवा अध्यादेशदेखील जारी केला आहे.या नव्या अध्यादेशानुसार खाजगी विकासकालादेखील या योजनेत सहभागी होता येणार आहे. या योजनेत खाजगी विकासक सहभागी झाला, तर चांगल्या दर्जाची घरे तीही वाजवी दरात उपलब्ध होतील, असा कयास लावला जात आहे.या योजनेच्या बदल्यात खाजगी विकासकाला एफएसआय मिळणार आहे. शिवाय, खाजगी जमिनीवरदेखील ही योजना राबवली जाऊ शकते. त्यानुसार, पालिकेने आता पावले उचलण्यास सुरुवात केली असून त्यासाठी खाजगी विकासकांना सहभागी करण्यासाठी पाचारण केले जाणार आहे.

टॅग्स :Homeघरthaneठाणे