शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीन हजार घरे, ४१४ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 06:30 IST

ठाणे महापालिकेने आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली आहेत. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल काही महिन्यांपूर्वीच मंजूर झाला असून उच्च, मध्यम आणि अत्यल्प उत्पन्न गटांसाठी तब्बल तीन हजार घरे बांधली जाणार आहेत.

- अजित मांडकेठाणे  - ठाणे महापालिकेने आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली आहेत. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल काही महिन्यांपूर्वीच मंजूर झाला असून उच्च, मध्यम आणि अत्यल्प उत्पन्न गटांसाठी तब्बल तीन हजार घरे बांधली जाणार आहेत. यासाठी शासनाने दिव्यातील चार ठिकाणी ही योजना कार्यान्वित करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी ४१४.०९ कोटींचा खर्च अपेक्षित असून येत्या महिनाभरात या जागा महापालिकेकडे हस्तांतरित केल्या जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.ठाणे महापालिका हद्दीत यापूर्वी बीएसयूपी योजनेंतर्गत सुमारे नऊ हजार घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ आता प्रधानमंत्री आवास योजनेचा नारळ येत्या काही महिन्यांत वाढवला जाणार आहे.ही योजना पूर्णपणे पीपीपी तत्त्वावर राबवली जाणार असून यासाठी दिव्यातील बेतवडे येथे दोन तसेच म्हातार्डी व डवलेगाव येथे प्रत्येकी एक योजना म्हणजेच चार ठिकाणी या योजनेतून घरे उभारली जाणार आहेत. त्यानुसार, उच्च उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी १०८८, मध्यम उत्पन्न गटासाठी १२८४ आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी ६२८ घरे उभारली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाºयांनी दिली. या योजनेतील दोन जागांचा सर्व्हे जिल्हाधिकारी आणि महापालिकेच्या माध्यमातून नुकताच झाला आहे. लवकरच, सर्व्हेनुसार या जागा महापालिकेकडे हस्तांतरित केल्या जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.तर, उर्वरित जागांचादेखील सर्व्हे करून त्यादेखील पालिकेकडे हस्तांतरित केल्या जाणार आहेत. २८ मार्च २०१६ रोजी महासभेने या योजनेला मंजुरी दिली आहे. तसेच ९ जून २०१७ रोजी राज्य शासनाच्या सुकाणू समिती आणि केंद्र सरकारच्या समितीनेदेखील या योजनेला मंजुरी दिली आहे.दरम्यान, पीपीपी म्हणजे प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपअंतर्गत ही योजना राबवली जाणार असल्याने तिचा आर्थिक भार हा पालिकेला सहन करावा लागणार नसून यामुळे लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध होणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.या घरांच्या किमतीदेखील म्हाडा योजनेनुसारच निश्चित केल्या जाणार असून उत्पन्न गटही त्यानुसारच ठरवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या योजनेसाठी प्रतिघरासाठी राज्य शासनाकडून एक लाख आणि केंद्र शासनाकडून १.५० लाखाचे अनुदानदेखील उपलब्ध होणार आहे. त्यानुसार, लवकरात लवकर ती राबवण्याच्या दृष्टीने पालिकेने आता जोरदार हालचाली सुरूकेल्या आहेत.यापूर्वी ही योजना स्थानिक स्वराज्य संस्थांनाच राबवण्याची संधी उपलब्ध होत होती. परंतु, आता तिची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी शासनाने नवा अध्यादेशदेखील जारी केला आहे.या नव्या अध्यादेशानुसार खाजगी विकासकालादेखील या योजनेत सहभागी होता येणार आहे. या योजनेत खाजगी विकासक सहभागी झाला, तर चांगल्या दर्जाची घरे तीही वाजवी दरात उपलब्ध होतील, असा कयास लावला जात आहे.या योजनेच्या बदल्यात खाजगी विकासकाला एफएसआय मिळणार आहे. शिवाय, खाजगी जमिनीवरदेखील ही योजना राबवली जाऊ शकते. त्यानुसार, पालिकेने आता पावले उचलण्यास सुरुवात केली असून त्यासाठी खाजगी विकासकांना सहभागी करण्यासाठी पाचारण केले जाणार आहे.

टॅग्स :Homeघरthaneठाणे