शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणातील तीन पोलिसांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 00:34 IST

तब्बल सहा महिन्यांनंतर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याच्या आवारात एका अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी सोमवारी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक केली. अर्थात, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड होणार का, असा सवाल भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देमुख्य सूत्रधाराला अटक कधी होणार?भाजप आमदार निरंजन डावखरे यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्याच्या आवारात अनंत करमुसे या अभियंत्याला झालेल्या कथित मारहाण प्रकरणातील सुरक्षा रक्षक विभागातील तीन पोलिसांना वर्तकनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. या तिघांचीही जामीनावर सुटका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यातील घोडबंदर रोड भागात राहणाºया करमुसे यांनी गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्यासंदर्भात फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यातूनच संतप्त झाल्याने आव्हाड यांच्या १० ते १५ समर्थकांसह पोलीस सुरक्षा रक्षकांनीही त्यांना जबर मारहाण केली होती. करमुसे यांना त्यांच्या घरातून नेऊन आव्हाड यांच्या बंगल्याच्या आवारात ही मारहाण केल्याबाबत करमुसे यांनी नंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला याप्रकरणी काही जणांना अटक झाली होती. चौकशीमध्ये करमुसे यांच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज मध्ये करमुसे यांना आव्हाड यांचे पोलीस अंगरक्षक लिप्ट मधून नेत असल्याचे उघड झाले होते. याच प्रकरणाची थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेही करमुसे कुटूंबीयांनी तक्रार केली होती. घटनेला सहा महिने उलटल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने या प्रकरणातील तीन पोलिसांना सोमवारी अटक केली. याच प्रकरणातील अन्य एकाला तीन दिवसांपूर्वी अटक झाली होती. ५ एप्रिल २०२० रोजी रात्री ११.५० वाजण्याच्या सुमारास झालेल्या या प्रकरणात दोन खाकी तर दोन साध्या गणवेषातील पोलिसांनी घरी येऊन पोलीस ठाण्यात नेण्याच्या नावाखाली आव्हाड यांच्या ‘नाथ’ बंगल्यावर नेले. तिथेच १५ ते २० जणांनी पोलिसांची फायबर काठी तुटेपर्यत मारहाण केल्याचे करमुसे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. अटक केलेल्या तिघांची नावे उघड करण्यात पोलिसांनी असमर्थता दर्शविली.* अभियंता करमुसे यांच्या मारहाण प्रकरणात तीन पोलीस शिपायांवर अटकेची कारवाई केल्याबद्दल ठाणे पोलिसांचे भाजपचे आमदार तथा ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी अभिनंदन केले आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड होणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.अटकेतील तिन्ही पोलीस शिपायांचे करमुसे यांच्याबरोबर वैयक्तिक वाद नाहीत. त्यांनी करमुसे यांना कोणाच्या आदेशावरु न घरातून आणले. या संदर्भात कसून चौकशी होण्याची गरज आहे. त्यातून या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराचा छडा लावण्याची आवश्यकता असल्याचेही डावखरे यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक