शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुचाकी अपघातात तीन ठार, एक वर्षाचा मुलगा सुखरूप; शहापूर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 15:26 IST

वेगावर नियंत्रण न आल्याने अपघात  प्राथमिक अंदाज.

कसारा/ भातसानगर - शहापूर तालुक्यातील भातसानगर येथील भातसा धरणाकडे जाणाऱ्या उताऱ्यावरी खिंडीत आज सकाळी झालेल्या दुचाकीच्या अपघातात दुचाकी वरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर या दुचाकीवरील एक वर्षाच्या मुलगा मात्र सुखरूप आहे.

तालुक्यातील सारंगपूरी गावाजवळील भातसा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या मुरबीचा पाडा येथील सोमनाथ दत्तू वाख आपल्या मुलगा व पत्नीसह सासुरवाडीस गेला होता आज सकाळी तो आपली पत्नी मुलगा व मेहुणा यांच्या समवेत भातसा नगर साजीवली मार्गाने भातसा नगर धरणाच्या उतारावरील हनुमान मंदिराच्या पुढील खिंडीत दुचाकी वहानाचा वेग न आवरल्याने वा दुचाकीचा ब्रेक फेल झाल्याने झालेल्या विचित्र अपघातात सोमनाथ दत्तू वाख ( 35),जिजा सोमनाथ वाख (25),राजू काळू मांगे (रा.विंचूपाडा )यांचा जागीच मृत्यू झाला.

विशेष म्हणजे हे तिघेही अस्तव्यस्त अवस्थेत इतरत्र फेकले गेले होते .मात्र याच दुचाकीवरील स्वप्नील सोमनाथ वाख हा एक वर्षाचा मुलगा मात्र सुखरुप आहे.त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. स्थनिकांच्या मदतीने हे मृत देह बाहेर काढण्यात येऊन ते शल्यचिकित्से साठी उपजिल्ह्या रुग्णालय शहापूर येथे पाठविण्यात आले असून खर्डी पोलिसांत अपघाती मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. या अपघाताची माहिती या दुचाकीवरील एक वर्षाच्या स्वप्नील नावाच्या लहानमुलाच्या रडण्याने आल्याने येथून प्रवास करणाऱ्यांनी येथील सरपंच बाळू वेगळे यांना देताच त्यांनी खर्डी पोलिसांना या घटनेची  माहिती दिली हा अपघात अति वेगाने दुचाकी कंट्रोल मध्ये न आल्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अतिशय घातक आशा वळणाच्या उतारावर आता पर्यंत भातसा धरणाचे काम सुरू झाल्यापासून आता पर्यंत अपघात झाले असून अनेक जण जीवनास मुकले आहेत.

टॅग्स :Accidentअपघात