शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

दुचाकी अपघातात तीन ठार, एक वर्षाचा मुलगा सुखरूप; शहापूर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 15:26 IST

वेगावर नियंत्रण न आल्याने अपघात  प्राथमिक अंदाज.

कसारा/ भातसानगर - शहापूर तालुक्यातील भातसानगर येथील भातसा धरणाकडे जाणाऱ्या उताऱ्यावरी खिंडीत आज सकाळी झालेल्या दुचाकीच्या अपघातात दुचाकी वरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर या दुचाकीवरील एक वर्षाच्या मुलगा मात्र सुखरूप आहे.

तालुक्यातील सारंगपूरी गावाजवळील भातसा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या मुरबीचा पाडा येथील सोमनाथ दत्तू वाख आपल्या मुलगा व पत्नीसह सासुरवाडीस गेला होता आज सकाळी तो आपली पत्नी मुलगा व मेहुणा यांच्या समवेत भातसा नगर साजीवली मार्गाने भातसा नगर धरणाच्या उतारावरील हनुमान मंदिराच्या पुढील खिंडीत दुचाकी वहानाचा वेग न आवरल्याने वा दुचाकीचा ब्रेक फेल झाल्याने झालेल्या विचित्र अपघातात सोमनाथ दत्तू वाख ( 35),जिजा सोमनाथ वाख (25),राजू काळू मांगे (रा.विंचूपाडा )यांचा जागीच मृत्यू झाला.

विशेष म्हणजे हे तिघेही अस्तव्यस्त अवस्थेत इतरत्र फेकले गेले होते .मात्र याच दुचाकीवरील स्वप्नील सोमनाथ वाख हा एक वर्षाचा मुलगा मात्र सुखरुप आहे.त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. स्थनिकांच्या मदतीने हे मृत देह बाहेर काढण्यात येऊन ते शल्यचिकित्से साठी उपजिल्ह्या रुग्णालय शहापूर येथे पाठविण्यात आले असून खर्डी पोलिसांत अपघाती मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. या अपघाताची माहिती या दुचाकीवरील एक वर्षाच्या स्वप्नील नावाच्या लहानमुलाच्या रडण्याने आल्याने येथून प्रवास करणाऱ्यांनी येथील सरपंच बाळू वेगळे यांना देताच त्यांनी खर्डी पोलिसांना या घटनेची  माहिती दिली हा अपघात अति वेगाने दुचाकी कंट्रोल मध्ये न आल्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अतिशय घातक आशा वळणाच्या उतारावर आता पर्यंत भातसा धरणाचे काम सुरू झाल्यापासून आता पर्यंत अपघात झाले असून अनेक जण जीवनास मुकले आहेत.

टॅग्स :Accidentअपघात