शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
4
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
5
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
6
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
7
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
8
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
9
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
10
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
11
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
12
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
13
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
14
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
15
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
16
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
17
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
18
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
19
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
20
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार

तीन दिवसांनी मध्यरेल्वे रुळावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 21:48 IST

चाकरमान्यांची तोबा गर्दी : कोपर, मुंब्रा स्थानकात बाधितांचे ठाण 

डोंबिवली: मुसळधार पावसामुळे शुक्रवारपासून रखडत धावणारी मध्यरेल्वे सोमवारी दुपारपासून काहीशी रुळावर आली. सकाळच्या पहिल्या सत्रमध्ये कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल सेवा सुरु होती. त्यातही जलद मार्गावरची वाहतूक बराच वेळ बंद होती. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, दिवा स्थानकांमधील धिम्या मार्गावरील फलाट क्रमांक 1,2 आणि 3 या ठिकाणी प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली होती. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठांचे हाल झाले. सोमवारी सकाळी 8.3क् नंतर धिम्या मार्गावरची वाहतूक पंधरा मिनिटांसाठी दुतर्फा खोळंबली होती. बदलापूर, टिटवाळा आसनगाव येथून सकाळी 9 र्पयत लोकल वाहतूक सुरु नव्हती. त्यामुळे तेथील प्रवाशांचे सोमवारीही हाल झाले. कल्याण -डोंबिवली परिवहनने दोन बसफे:या सोडल्याने बदलापूर ते कल्याण मार्गावर शेकडो प्रवाशांची सोय झाल्याची माहिती बदलापूरचे रहिवासी संजय मेस्त्री यांनी दिली. सकाळी बदलापूर, अंबरनाथ रेल्वे मार्गदेखील सुस्थितीत असल्याचा हिरवा कंदिल रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाकडून मिळाल्यावर सकाळी 1क् वाजून 17 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने या मार्गावर पहिली लोकल धावली. त्यादरम्यान टिटवाळा, आसनगाव, कसारा आदी स्थानकांमधूनही टप्प्याटप्प्याने लोकल सेवा सुरु झाली. बदलापूर ते कर्जत हा मार्ग सोमवारी संध्याकाळीही बंदच होता. दिवा, मुंब्रा मार्गावर रेल्वे रुळानजीक पाणी भरल्याने तेथे वाहतुकीचा वेग मंदावला होता. सोमवारी दिवसभर तुरळक सरी पडल्या. त्यामुळे कुठेही पाणी तुंबले नाही. दुपारनंतर लोकल वाहतूक सुरळीत झाली होती. जलद मार्गावरील वाहतुकीलाही सुरुवात झाली होती. अडीच वाजल्यानंतर साधारणपणो पंधरा मिनिटे विलंबाने लोकल धावल्या. कोपर रेल्वे स्थानकानजीक पूर्वेकडील चाळींमध्ये खाडीचे पाणी गेल्याने काहींनी रविवारची रात्र कोपर स्थानकात, तसेच पादचारी पुलावरच काढली. सोमवारीही काही बाधित फलाटातच पथारी मांडून बसले होते. मुंब्रा स्थानकात पश्चिमेला असलेल्या घरांमध्येही खाडीचे पाणी गेल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर आले. त्यामुळे त्यापैकी काहींनी सध्या काम सुरु असलेल्या फलाटांमध्येच संसार मांडला होता. बाधितांच्या घरचे बहुतांश सामान फलाटात ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, ठाणो रेल्वेस्थानकातदेखील प्रवाशांनी लोकल रोखून धरत संताप व्यक्त केला. फलाट क्रमांक 3 वर लोकल येताच प्रवाशांनी ती तात्काळ मुंबईला सोडण्याचा आग्रह केला. पण रेल्वे प्रशासनाने काही न ऐकल्याने प्रवासी नाराज झाले. त्यांनी तातडीने स्थानक प्रबंधकांचे कार्यालय गाठून त्रगा केला. त्यानुसार रेल्वे अधिका:यांनी प्रवाशांच्या मागणीखातर विशेष लोकल सोडण्यासंदर्भात वरिष्ठांशी संपर्क केला आणि अखेरीस गाडी सोडण्यात आल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेlocalलोकल